Skip to main content

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६

llश्रीगणेशाय नमःll 
    llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll

 संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज यांच्या श्रीरुक्मिणीस्वयंवराच्या लिखाणाची गोडी, शब्दरचना, शब्दमाधुर्य, मांडणी, हे जणू कमळफुलातील मधुरस प्रत्यक्ष भ्रमराच्या रुपात नाथानी आपल्या हातावर द्यावा आणि तो मधुरस विरघळता विरघळत नाही आणि त्याची गोडीदेखील कमी होत नाही. जितका आस्वाद घेत जावा तितकी गोडी अवीट होत जावी. 

नाथांच्या भारुडादी प्रकारात अध्यात्म ज्ञान देता देता नाथ, आसूड देखील ओढतात. पण श्रीरुक्मिणीस्वयंवरात त्याच नाथांच्या परिसस्पर्शी भाषेला केशरयुक्त ज्ञानअमृत परिमळ मिश्रित श्रद्धेचा स्वाद आहे आणि त्याचा आस्वाद घेणं ही अध्यात्म सुखाची परमावधीच आहे. म्हणजे शरदाच्या रुपेरी चांदण्यात चंद्राच्या शीतल प्रकाशात आटीव शर्करायुक्त क्षीर म्हणजे दूध पिण्यासारखं आहे. 

नाथांचं अंतिम उद्देश्य हे अध्यात्मिक ज्ञान प्रसारित करणं. त्याला भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या कथेचा किनारा म्हणजे फुलपाखराच्या पंखानी जग पाहणं.  बोध तो सुद्धा श्रीकृष्ण कथेच्या सुंदर माध्यमातून, हेच मुळात विलक्षण. पण एरव्ही अध्यात्मातील खाच खळगे स्पष्ट शब्दात सांगणारे नाथमहाराज श्रीकृष्णा आणि देवी रुक्मिणी यांच्या लग्नकथेवर आधारित काव्यरसात्मक ग्रंथ लिहिताना नवरसांची बरसात करतात. माता शारदेच्या अनंत शब्दभांडारातून नेमके शब्द निवडून नाथमहाराज मांडतात 

आणि ते वाचताना आपल्याला जाणवत की हे शब्द नाथांसमोर अक्षरशः हात जोडून ओळीने उभे आहेत. जणू त्यांच्यातच एक विलक्षण चढाओढ आहे की, नाथानी मला आधी निवडावं  आणि प्रत्यक्ष परमेश्वर ज्यांच्या घरी पाणी भरत असे, ते नाथ प्रत्येक शब्दाला समजावून सांगतात, नव्हे आंजारून गोंजारून समजावतात बाबांनो प्रत्येकाला स्थान आहे या कथे मध्ये. प्रत्येक मृदू मुलायम, गोड शर्करायुक्त शब्दानो तुम्हाला योग्य तो सन्मान मिळेल न्याय मिळेल आणि तुमचा आबसुद्धा वृद्धिंगत होईल. 

नाथमहाराज म्हणजे कृपेचा सागर आणि प्रीतीचा अमृतकलश  ते शब्दांची मांडणी अत्यंत सुयोग्यरित्या करतात. मऊ मखमलीच्या वेष्टनातील नाथांचं श्रीरुक्मिणीस्वयंवर आख्यान आता अधिक विलंब न करता पुढील भागापासून सुरू करूया. 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...