Skip to main content

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी १ 

  गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी १ 

‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे।

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे।

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे।

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे।

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’

गीत : मंगेश पाडगावकर 
संगीत : यशवंत देव
गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके

दिनांक ३० ऑक्टोबर रोजी विख्यात कवी व संगीतकार यशवंत देव, देवलोकी गेले. कदाचित त्यांच्या रचना त्या तिथेही देवेंद्राला ऐकवत असतील. सुंदर रचना आणि त्यादेखील गीतानुसार हा चपखलपणा असलेले मोजक्या संगीतकारांमध्ये अग्रणी असलेले खूप काही ठेवून आणि बरच काही देऊन गेले. त्यांच्या निधनाच्या दिवशीच एक आठवण म्हणून माझे समाज माध्यमातील स्नेही रविंद्र शुक्ल यांनी एक लेख पुनःप्रसारीत केला होता, त्याच्या भिंतीवर. तो लिहिला होता लोकप्रिय वाद्यवृन्द गायक डोंबिवलीचे विनायक जोशी यांनी. तो खरच खूप सुंदर होता. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे. 

पण अर्थात मी स्वतः गीत विश्लेषण हे सदर लिहीत असल्या मुळे, माझ्यातील लेखकाने त्याचा भावार्थ आपल्या शैलीत, भाषेत टिपला आणि तिथल्या तिथे मी रविंद्र शुक्ल यांना लिहिलं कि हा भावार्थ मला माझ्या शब्दात मांडण्याचा मोह झालाय आणि तो मोह मी नक्कीच आवरणार  नाही. म्हणून हा  भावार्थ लगेच लिहायला घेतला अगदी ३० ऑक्टोबर लाच. 

अर्थात हे गीत जस मला समजलं तस पाडगावकर यांनी लिहिल असेल असं नाही, पण जे चित्र त्यांच्या शब्दातून, यशवंत देवांच्या चालीतून आणि बाबूजींच्या स्वरातून जाणवला, त्याच सार आपल्यापुढे मांडायचं ठरवलंय. बघूया कितपत यश येतंय, त्याच कारण अस की खूप वेळा आपल्या मनात असलेलं प्रत्यक्ष शब्दात उतरतच अस नाही. म्हणून त्यासाठी त्याच विधात्याला प्रार्थना, ज्यासाठी व ज्याला योजून हे गीत पाडगावकरानी लिहिलंय. 

ll जय सर्वसाक्षी सर्वभूतेशु  जगदीश्वर ll 

क्रमशः 

© संकलन व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...