Skip to main content

मृदुलकरांनी छेडीत तारा १


मृदुलकरांनी छेडीत तारा १ 

मृदुलकरांनी छेडीत तारा 
स्मरते रुप हरीचे मीरा 

कमलदलापरी मिटल्या अधरी 
नाम मनोहर खुलता श्रीहरी 
हर्षभराने तनुलतिकेवरी 
पडती अमृतधारा 

कालिंदीच्या नीलजलापरी 
हृदयी वाहे भक्ती हसरी 
तन्मयतेच्या कुंजवनी तीरी 
फुलवी प्रीत फुलोरा 

सालस भोळी थोर मनाची 
मीरा दासी प्रभूचरणाची 
मिटल्या  नयनी धुंद मनाची 
रंगवी हसरी मथुरा

 गीत : रमेश अणावकर
संगीत : दशरथ पुजारी 
गायिका : सुमन कल्याणपूर 

या गाण्याबद्दल एक गोष्ट वाचायला मिळाली कालच , अर्थात फॉरवर्ड. पण लगेच गाणं डोक्यात फिरायला लागलं. दोन चार वेळा ऐकून मन भरलं नाही.  मग लिहायला बसलो, अर्थातच गाण्याचा मला भावलेला, गवसलेला भाव व मतितार्थ. बघूया कस जमतंय ते. तर गोष्ट जशी वाचली ती अशी की. 

ज्येष्ठ संगीतकार वसंत प्रभू आजारी होते. त्यांना भेटायला दुसरे ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी गेले होते. शेजारीच गीतकार रमेश अणावकरसुद्धा बसले होते. वसंत प्रभू पुजारीना म्हणाले दशरथा आमची संगीतयात्रा  आता संपली. आता राष्ट्रगीताची वेळ झाली. पण जाण्याआधी माझा हक्काचा गीतकार रमेश अणावकर याला तुझ्याकडे सोपवून जातोय, त्याच्याकडून हवरटासारखी गीतं काढून घे. दोन दिवस गेले पुजारीनी अणावकराना बोलावून घेतलं.  तो काळ गदिमांचा होता. पुजारीनी त्यांना गदिमांच्या पठडीतल गाणं लिहून द्यायला सांगितलं. 

दोन दिवसांनी अणावकर गीत घेऊन आले. गीत वाचत असतानाच पुजारीना चाल सुचली. एक छान गाणं तयार झालं. पण इथे एक वाद झाला कारण प्रभुंकडे लता दीदी गायच्या आणि पुजारिंकडे सुमन कल्याणपूर. अणावकर अडून बसले. पण HMV ने हा वाद सोडवून गीत सुमन ताईंच्या पदरी घातलं. आणि रसिकांना एक सुंदर अजरामर गीत मिळालं. 

"मृदुल करांनी छेडीत तारा , 
स्मरते रूप हरीचे मीरा"
 
उत्कृष्ट शब्दरचना , अलौकिक चाल आणि अत्युत्तम लागलेला आवाज. 

उद्यापासून गीताचा मला गवसलेला गर्भित अर्थ, माझ्या शब्दात.

© लेखन : प्रसन्न आठवले 
१९/१०/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...