Skip to main content

भोग आणि ईश्वर ६०७

भोग आणि ईश्वर ६०७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
मानसिक जडणघडण ही जशी भौतिक घटकांवर अवलंबून असते, तशीच ती रासायनिक व जैविक घटकांवर सुद्धा अवलंबून असते. भौतिक घटक आपण पाहिले. आता हे जैविक व रासायनिक घटक आपण एकत्रित पाहूया. म्हणजे आपल्याला त्यांच्या परिणामांचा योग्य अभ्यास करता येईल.आपण पाहिलं की रासायनिक घटक म्हणजे, शरीरांतर्गत मूलद्रव्य, रासायनिक प्रक्रिया, पाझरणारे रस, स्त्राव, रक्त प्रवाह इत्यादी सर्व. 

यातील बऱ्याच घटकांवर शारीरिक ऊर्जा, शक्ती आणि त्याद्वारे मनाच्या ऊर्जा व शक्ती काही प्रमाणात अवलंबून असतात. निदान काही बाबतीत, मानसिकता, मनाचं स्वास्थ्य, सामर्थ्य हे यावर अवलंबून असतं. मुळात रासायनिक प्रक्रिया, जिच्या आधारावर नसा, धमन्या, मज्जासंस्था,चेतापेशी, मेंदूचं, हृदयाचं,पोटाच, जननेंद्रिय, इत्यादी अनेक कार्ये अवलंबून असतात. या प्रक्रिया, अनेकदा माणसाच्या शरीराचं स्वास्थ्य, ठरवत असतात. त्यामुळे त्यांच्या कुशलतेवर, मन आणि इच्छाशक्तीच्या लहरी अवलंबून असतात.

यातील, मूलतः जन्मतः मिळालेल्या गोष्टी किंवा सुदृढता वा दुर्बलता या पूर्वसंचिताचा भाग असल्यामुळे, या जन्मीची मानसिक स्थिती, स्वस्थता, शांतता हे, त्यावर ठरतं. म्हणूनच एखाद्याचा मूळ स्वभाव, संतापी, तापट, शांत, मृदू, भडक, समंजस, विचारी, विवेकी इत्यादी असतो. या रासायनिक प्रक्रियेतील अनेक गोष्टी अभ्यासाने प्रयासाने आणि योग्य त्या उपायाने, सुधारता, बदलता आणि मार्गावर आणता येतात. 

म्हणजेच रासायनिक घटकांमध्ये, नैसर्गिक, जन्मतः, प्रकृतीवश शैक्षणिक, या जन्मात प्राप्त अशी सर्वसाधारण विभागणी करता येईल.तापटपणा हा जर बुद्धी मन यांपेक्षा रक्ताचा किंवा रक्तातील काही घटकांच्या असंतुलनामुळे, रासायनिक स्त्रावांच्या कमतरतेमुळे असेल, तर त्यावर योग्य तो उपचार वेळीच करून, नियंत्रण मिळावता येतं. 

जैविक घटक हे अनेकदा रासायनिक घटकांच्या असंतुलनाला कारणीभूत असतात. म्हणजे एखाद्या घराण्यात, रक्तातील दोष, स्त्रावांची कमी अधिक होणारी निष्पत्ती, हाडांचा किंवा देहातील काही द्रव्यांचा अभाव इत्यादी गोष्टी वंशपरंपरेने असतात. याचं गोष्टी बऱ्याच जणांच्या बाबतीत शारीरिक व मानसिक जडण घडण ठरवतात. जैविक घटकात अनुवांशिक दोष वा गुण असू शकतात. म्हणून बऱ्याच वेळा, एखाद्याचा मुलगा वा अपत्य त्याच्या प्रमाणेच वागतं, तेंव्हा आपण म्हणतो की, वळणाचं पाणी वळणावर जाणार. 

उद्याच्या भागात या तिन्हीचे एकत्रित परिणाम व दोषां वरील उपाय यावर चर्चा करून, हा विषय पूर्ण जाणून, पुढे जाऊया. पण तोपर्यंत, नामाच्या माध्यमातून आपल्या शरीर, बुद्धी व मन यांच्यातील अनेक किंवा सर्व घटकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...