Skip to main content

भोग आणि ईश्वर ६१३

भोग आणि ईश्वर ६१३ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड) 
 
या जगतात आल्यावर आपण अनेक प्रकारचे भ्रम किंवा अज्ञान यात जगत असतो. हे अज्ञान अनेक गोष्टींबद्दल असतं. याला तीन चार भागात विभागता येईल. एक स्वतःबद्दल विश्वाबद्दल, विश्वनियंत्याबद्दल, एकूण. व्यवस्थे बद्दल. स्वतःबद्दल असलेल्या अज्ञानात मुख्यतः, अहं अनेक प्रकारचे भ्रम आणि अज्ञान निर्माण करतो. कारण अहं किंवा अहंकार असणं म्हणजे बुद्धीच्या आणि मनाच्या चक्षुंवर एक प्रकारची पट्टी असणं. ज्यामुळे विचारांना, मतीला अर्थात बुद्धीला एक वेगळीच दिशा मिळते.

ज्यामुळे आपले तर्क, अनुमान, निष्कर्ष, अंदाज, आडाखे सर्व चुकतं जातात. अहं बरेचवेळा बुद्धीवर एक प्रकारचा पडदा निर्माण करतो. याचं अहंसह येतो तो क्रोध. हा क्रोध अनेक दुर्गुणांचा राजा आहे. ज्यामुळे सत्यसुद्धा विपरीत दिसतं आ ननi आपली स्वतःची अधोगती होत आहे, याचंदेखील भान राहात नाही. कारण क्रोध अनेक चुकांचा पाया आहे. त्यामुळे अहं आणि त्यासोबतच येणारा क्रोध हे दोन खूप मोठ्या अज्ञानाचे जनक आहेत. 

विस्ताराने किंवा दूरदृष्टीने विचार केला तर, माणसाचे स्वतःबद्दल असलेलं ज्ञान किंवा अज्ञान यावर, आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या ते मोठ्या घटना अवलंबून असतात. त्यामुळे अनेक चुकीची कर्म, या अहं आणि क्रोध या दुर्गुणातून निर्माण होतात. याचं कर्मांच्या फळा साठी, पुन्हा पुन्हा भोग आणि जन्म हे चक्र सुरू होतं. हेच चक्र, नेमाने सुरू राहतं, जोपर्यंत आपण या दोन मुख्य दुर्गुणांचा त्याग करून, पुन्हा शून्याकडे येत नाही, तोपर्यंत या अधोगतीच्या, भोगंच्या मार्गावर नित्य चालत राहणं, हे एक एकमेव कर्म, अश्या माणसांच्या हातात उरतं. 

स्वतःबददल असलेल्या अज्ञानात या अहं इतकाच महत्वाचा दुर्गुण जो बुद्धीला भ्रमित करतो तो म्हणजे देह हाच सर्व काही आहे असा असलेला सार्वत्रिक समज. मुळात सर्वसामान्य स्थितीत, तुमचा आत्मा किंवा या शरीराचा खरा मालक, असलेला आत्मा,आपण ओळखत नाही, जाणत नाही आणि पाहू शकत नाही. या देहाची चैतन्यशक्ती म्हणजे ऊर्जा ही या देहात हृदया अंतर्गत असलेला ईश्वरी अंश, म्हणजेच आत्मा. आत्त्मा जोपर्यंत जाणता येत नाही तोपर्यंत माणूस देह आणि देहाच्या गरजा, यातच गुंतून जातो. 

देहाला मानवी आयुष्यात सर्वसाधारणपणे, अनन्य साधारण महत्व आहे. काही प्रमाणात ते सत्यच आहे. कारण, देहाशिवाय मुक्ती, मोक्ष हे साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे, या देहाला प्राप्त केल्यामुळे, जे करणं अपेक्षित आहे, ते माणूस जन्मतः विसरून जातो. आपले धर्मग्रंथ, संत महंत इत्यादींनी आपल्यासमोर आदर्श घालून दिले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून, त्यांनी जगलेल्या आयुष्यावरून त्यांनी देहाचा उपयोग फक्त आणि फक्त, या जगातून मुक्त होण्यासाठीच केला आहे. पण आपण मात्र देह हेच सर्व काही मानून, त्याला केंद्र स्थानी ठेवून, पुढील सर्व आयुष्य काढतो. चूक मुळात तिथेच सुरू होते. 

यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, पण उद्याच्या भागात.

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...