Skip to main content

भोग आणि ईश्वर ६०३

भोग आणि ईश्वर ६०३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
मनाला निश्चित असं ध्येय किंवा उद्देश असावा. नव्हे असलाच पाहिजे. याचं कारण म्हणजे, असं मन भरकटत नाही. किंवा असं नीट उद्देशाने बांधलेलं मन म्हणजे आपल्या काठाच्या आतून नीट वाहणाऱ्या नदीच्या पात्रासमान असतं. विद्यार्थीदशेत एक उद्देश ध्येय समोर असतं. त्यामुळे सहसा त्या वयात मन वाहावत नाही. पण तरुण वय हे अवखळ पाण्यासमान असतं. 

म्हणून मनावर लहान वयात उत्तम संस्काराची मशागत झाली की, माणूस सहसा, कोणत्याही वयात असंस्कारी होत नाही. पण मनाला सर्वात उत्तम संस्कार जर कोण घडवत असेल तर ते आपले मंत्र, स्तोत्र इत्यादी. याचं कारण त्या संस्कृत भाषेत असलेली विलक्षण ऊर्जा, चेतना आणि शक्ती माणसाला कोणत्याही वयात, उत्तम मार्ग सोडू देत नाही. किंबहुना आपण आजही, आपल्या पूर्वीच्या दिवसांची विशेष करून लहानपणी ची आठवण काढली की, सर्वात जास्त भावणारी वा मनाला भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे, त्या वयात म्हटलेलं देवाचं, स्तोत्र वगैरे. 

त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या वयात ऐकलेली ही स्तोत्र कोणत्याही वयात, थोडाफार सराव केला की, पुन्हा मुखोदगत होऊ शकतं. याचं देहाच्या दृष्टीने कारण म्हणजे त्या वयात स्मरणशक्ती अत्यंत तीक्ष्ण असते, ऐकलेल सर्व स्मरणाच्य कुपीत साठवलं जातं आणि मनाची एकग्रता उत्तम असते. त्यामुळे त्यावेळची स्तोत्र, मंत्र, कविता इत्यादी आयुष्यभर लक्षात राहतात. 

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मनाची माती कोवळी असते. त्यामुळे, जे पेरलं जाईल ते उत्तम तऱ्हेने रुजत. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे मनात विकार उत्पन्न झालेले नसतात, त्यामुळे सुपीक आणि कसदार जमिनी प्रमाणे मनाचा कस निकोप आणि निरोगी असतो. म्हणूनच कोणतीही चांगली गोष्ट वा संस्कार या वयात मनावर करावे. त्या नंतर अश्या प्रकारची मानसिक अवस्था प्राप्त करायला, मेहनत आणि अनेक गोष्टी कराव्या लागतात. 

याचसाठी जर एका ठराविक वयात जर मनावर योग्य संस्कार नसतील, तर मनाला शिस्त न लागता, उत्शृंकल पणा, हट्टी व दुराग्रही वृत्ती, मनाची कठोरता किंवा अती मृदू स्वभाव, ही वैशिष्ट्ये वाढीस लागतात आणि त्याचे विपरीत परिणाम नंतरच्या वयात दृष्टीस पडतात. अती रागीट, अती भित्रा, अती संवेदन शील, अती विचारी, अविचारी, प्रेमाचा अभाव इत्यादी अनेक अवगुण किंवा मनाच्या चुकीच्या अवस्था निर्माण होऊन, त्याचा परिणाम देह, बुद्धी, मन आणि अंतरात्मा यांना भोगावे लागतात. 

याचं विषयाला पुढे नेऊन पुढील चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत मनावर चांगले संस्कार करणारं नाम घेतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...