Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२२

भोग आणि ईश्वर ६२२
   
कालचा विषय पुढे नेऊया. पण खरच असं connect करता किंवा होता येतं का आणि यासाठी काय, कसे प्रयत्न करावेत, कोणत्या घटकांची जाणीवपूर्वक मशागत मनात करावी व कोणते तण काढून टाकावेत, यावर आजच्या भागात चर्चा करूया.  

मुळात मनाला असं connect किंवा dosconnect करता येतं, हीच बऱ्याच जणांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे. कारण देहाच्या वेष्टनात, नसानसात भरून राहिलेलं मन, ज्ञानेंद्रियांच्या समक्ष, साक्षीने वा समोर घडणाऱ्या घटनांच्या प्रभावापासून अलग किंवा aloof ठेवता येणं ही एक तपश्चर्या आहे. तपश्चर्या यासाठी की, तसं स्वतःच्या मनाला देहापासून विलग करता येण्यासाठी मनाला काही शिस्त किंवा सवय करावी किंवा एकप्रकारची विशिष्ट वागणूक द्यावी लागते. 

यासाठी मनाला एकतर शांत, आजूबाजूच्या कोणत्याही घटनेपासून separate करता येण्याची लावण्यासाठी, सर्वात प्रथम, अतिचंचल, शीघ्र दोलायमान होण्यापासून परावृत्त करता येण्याचा अभ्यास करता आला पाहिजे. याचं एक शास्त्र आहे. या प्रक्रियेत सर्वात आधी मनाला शांत करण्याचा अभ्यास करावा लागतो. 

यासाठी योग, ध्यान, नामस्मरण इत्यादी माध्यमातून मन, मनःशांतीकडे हळूहळू नेत गेलं पाहिजे. अर्थात हे लिहिलय तितकं सोपं नक्कीच नाही. म्हणून आधी त्या साधनेत, मनाला गुंतवून, हळूहळू पुढे नेत गेलं पाहिजे. ही सुद्धा एकप्रकारे साधना आहे. सुरवातीला मनाला शांत करण्याचा प्रयास करताना, सुरवातीला मन जास्त विचलित, अशांत होतं. या प्रक्रियेत किंवा या स्थितीत अभ्यास व प्रयास न सोडता, थोडस मनाच्या कलाने व थोडं धीराने असच प्रयास करत राहिलं तर, एक दिवस शांत बसण्याच्या प्रयत्नांना नक्की यश येईल. 

एक दिवस मनाला शांत बसलेलं पाहून, एक अलौकिक आनंद अनुभवाला येईल. ही वेळ किंवा स्थिती आली की, तटस्थतेच्या, विलग किंवा aloof करण्याच्या पुढच्या पायरी कडे, जाता येईल. त्यावर उद्याच्या भागात विचार करूया. आज जरा त्या स्थितीत जाण्यासाठी मनाला काय विचाराचं खत घालावं याचा अंदाज येण्यासाठी एक छोटंसं चिंतन करूया. 

कालच आपण दसरा साजरा केला. ते करताना, आपण मुक्तहस्ते आनंद आणि त्यासोबत आपट्याची पानं, सोनं म्हणून वाटलं. आज त्या पानांची किंमत, शून्य किंवा मृत्तिकेसमान झालं. म्हणून आज आपल्याला देखील त्या पानांत काहीही रुची उरली नाही. हीच एकप्रकारची तटस्थता आहे, आयुष्यातील प्रत्येक क्षणाला, तो क्षण संपल्यानंतर, आपल्या मनापासून विलग करून, तो क्षण सोडून पुढे जाता आलं पाहिजे. किंवा हा विचार धरला तर, मनाला नक्कीच हळूहळू सवय लागेल. 

उद्याच्या भागात यावर चिंतन करूया. तोपर्यंत याचं चिंतन करत राहूया आणि नाम करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/१०/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...