Skip to main content

भोग आणि ईश्वर ६०४

भोग आणि ईश्वर ६०४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
   
खूपवेळा आपण मानसिकता हा शब्द प्रयोग करतो. म्हणजे नक्की काय याबद्दल जरा विचार करूया. मानसिकता हा थोडा गुंतागुंतीने तयार होणारी गोष्ट आहे. मुळात ती एक समिश्र स्थिती आहे. अर्थातच मानसिक असल्यामुळे, अनेक गोष्टींची पार्श्वभूमी त्यामागे असते आणि अनेक गोष्टीतून ती जाते. त्याला जितकी आजू बाजूची परिस्थिती घडवते तितकीच लहानपण ते आता पर्यंत त्या व्यक्ती संदर्भात घडलेल्या, वा घडणाऱ्या छोटया तील छोट्या गोष्टीसुद्धा जबाबदार असू शकतात. 

मुळात ती जैविक,भौतिक आणि रासायनिक अशी तिन्हींच्या माध्यमातून तयार झालेली स्थिती असते. या मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या तीनही घटकांचा आपण जरा विचार करूया. भौतिक अर्थाने, जन्माच्या आधीपासून असणारी स्थिती, परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्या व्यक्तीच्या संपर्कात जन्मा आधी पासून आलेल्या व्यक्ती, इत्यादी अनेक गोष्टींचा वर्षानुवर्षे झालेला, होत असलेला व होऊ शकणारा परिणाम म्हणजे भौतिक पार्श्वभूमी. या सर्व गोष्टींचा किंवा त्यातून निघणाऱ्या व निघत असलेल्या लहरी, कंपंनं यांचा संयुक्तिक परिणाम म्हणजे भौतिक जगत. या भौतिक जगतात आपण घेत असलेलं शिक्षण, किंवा थोडक्यात भौतिक परिस्थितीचा देहावर बुद्धीवर आणि मनावर होणारा भौतिक परिणाम यांचा समावेश होतो. 

रासायनिक माध्यमे म्हणजे वातावरणातील बदल, ऋतुमान, शरीरांतर्गत वाहणारे रासायनिक प्रवाह, रक्त. यात विशेष करून पौर्णिमा अमावास्या यामुळे रक्तावर व त्याद्वारे मानसिकतेवर होणारे परिणाम. बरेचदा, ऋतुमान वातावरण यातून उत्पन्न होणारे वेगवेगळे दाब व त्यामुळे माणसाच्या देहात होणारे रासायनिक फेरफार, त्याच प्रमाणे वयानुसार देहात होणारे बदल, ताणतणाव व क्लिष्ट प्रश्न व परिस्थिती हाताळण्याची क्षमता, या सर्वांवर, रासायनिक बदलाचे आणि या मुळे देह - बुद्धी - मन यांच्यावर होणारे परिणाम, यांचा समावेश या रासायनिक बदलांमध्ये होतो. 

आता जैविक घटक म्हणजे मातापिता, किंवा ज्या कुटुंबात जन्म होणार आहे, त्या कुटुंबातील आजी आजोबा, भाऊ बहिण आणि इतर अनेक जैविक घटकांचा जन्मावर आणि जन्माने प्राप्त देहावर होणारा परिणाम. मुळात प्राप्त होणारा देहचं जिथे आपल्या प्रारब्धाने मिळत असल्यामुळे, मानसिकता तयार होण्यात जन्माचा पर्यायाने या जैविक घटकाचा नक्कीच खूप मोठा हातभार लागतो. कारण आई वडील व नातेवाईक निवडीचं कोणतही स्वातंत्र्य आपल्याला नाही. म्हणजे जी जैविक घटकांची पार्श्वभूमी आपल्याला प्राप्त झाली आहे, त्यावरून आपल घडणारं किंवा घडू शकणार प्रारब्ध याचा समावेश जैविक घटकांच्या परिणामांमधे होतो. 

या प्रत्येकाचा सखोल अभ्यास उद्यापासून चिंतनात करूया. तोपर्यंत आपण नामा चा रस्ता न सोडता चालतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...