Skip to main content

भोग आणि ईश्वर ६०२

भोग आणि ईश्वर  ६०२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
आपल्या मानसिक स्थिती प्रमाणे, माणूस आपली मत ठरवतो आणि बनवतो किंवा बनवलेल्या मतांमध्ये, पुन्हा  बदल किंवा दुरुस्त्या करतो. काल म्हटल्या प्रमाणे, तात्विक अर्थाने मतातील हे परिवर्तन अती शीघ्र ते अती मंद असते किंवा असू शकते. हा मतातील बदल, अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. पण मुख्यतः अनुभव आणि धारणा यांचा संयुक्त परिणाम होऊन, माणूस आपलं मत बनवतो किंवा दुरुस्त करतो. मत तयार होऊन, त्यात होणाऱ्या बदलाचा वेग, मनाच्या, बुद्धीच्या चपळता ते लवचिकता यावर आधारित असतो. 

म्हणजे मन बुद्धी व जाणीवा यांच्या संयुक्त वेगावर हे अवलंबून असतं. यामधे जाणीवा प्रगल्भ, मन अथांग सागरा प्रमाणे खोल आणि बुद्धी स्थिर असेल तर, तो माणूस सहसा मतं बदलणारा किंवा हवेनुसार निर्णय बदलणारा असतं नाही. अशी माणसं कठीण परिस्थितीत सुद्धा आपलं मत किंवा निर्णय यावर ठाम असतात. कारण अशी मतं सखोल विचार करून किंवा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेले असतात. 

हे एवढं सगळं तपशीलवार सांगायचं कारण म्हणजे, अश्या सखोल विचार करून मत बनवणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या लोकांना विवेकाचा पाया असतो. म्हणजेच त्यांना सखोल मानसिकता असते. कोणत्याही दोलायमान स्थितीत, त्यांचा सहसा तोल जात नाही. साधारण अश्याच मानसिकतेच्या लोकांना आपल्या वैचारिक आणि ठाम मतांच्या जोरावर अनेकांवर प्रभाव पाडता येतो. 

अशी माणसं समाजाला दिशा देणारी असतात. आपल्या दीर्घ चिंतनातून ही व्यक्तित्व समाज मनावर खोल परिणाम करतात. अश्या स्थिर व सखोल बुद्धी असलेल्या व्यक्तींचा पूर्वीचा साधनेचा किंवा अतिशय सखोल चिंतनाचा अभ्यास असतो. पण त्यासाठी विचारांची पक्की बैठक आणि दूरदृष्टी असणं सुद्धा आवश्यक असतं. मनाची व बुद्धीची अशी अवस्था प्राप्त करायला, मनाला अंतर्मुख करण्याची सवय असावी लागते. मनाला अंतर्मुख करणं म्हणजे, मनाला शांत, संयमी पण विचारशील बनवणं. 

यासाठी मनाला स्थिर बैठकीची आवड लावून घ्यावी लागते. मुळात असं काही मिळवण्याची प्रामाणिक आस असावी लागते. एकदा तशी आस लागली की, माणूस, त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. कारण निश्चय आतून असेल, तर बाहेरील कोणतीही शक्ती वा अडचणी अडथळा निर्माण करू शकत नाही  म्हणजेच कोणतीही गोष्ट मिळवायला, निश्चय हा खूप मोठा आधार आहे, हे नक्की. 

असा निश्चय मनाला त्या उद्देशाशी बांधून ठेवतो. उद्देश हे मनाला त्या प्रक्रियेत जीव ओतण्याचं खूप मोठं कारण आहे. उद्देशरहीत मन हे पांच बोटांच्या उघडलेल्या मुठीसमान आहे आणि उद्देशाने बांधलेलं मन हे, वळलेल्या वज्र मुठीसम आहे. 

याचं उद्देश, निश्चय इत्यादी विषयावर, पुढील चिंतन उद्या सुरू ठेवूया. तोपर्यंत नामाच्या नादाचा आनंद घेत रहा. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...