भोग आणि ईश्वर ६२३
कालचा विषय पुढे नेऊया.
या संपूर्ण विश्वाचा आधार असलेला विश्वात्मा, नेहमी शांततेत रत असतो. कारण मन प्रगाढ शांततेत असताना, मन खऱ्या अर्थाने आनंद अनुभवतं. म्हणजे एरवी त्याला अनुभवास येणारा आनंद हा प्रसंगानुसार येणारा असतो. वास्तविक अर्थाने तो खरा आणि नित्य अनुभव किंवा आस्वाद नाही. खरंतर आस्वाद हा एखाद्या गोष्टीची चव चाखली की वापरला जाणारा शब्द आहे.
तो शब्द इथे कसा वापरता येईल, असा एक सहज प्रश्न मनात येऊ शकतो. पण आपण तेही जाणून पुढे जाऊ. आस्वाद हा एकप्रकारचा अनुभव असतो. सहसा चवीसाठी वापरतो. पण कोणत्याही गोष्टीचा अनुभव जेंव्हा जिव्हे व्यतिरिक्त मन घेतं, तेंव्हा तोही एक प्रकारचा आस्वादच असतो. आस्वाद घेणं ही एखाद्या पदार्थाचा गंध आल्यानंतर मनात, त्याबद्दल इच्छा जागृत झाल्यानंतर घडणारी कृती आहे.
तर असा आस्वाद शांततेचा घेण्यासाठी मनात तशी इच्छा जागृत होणं महत्वाचं आहे. यासाठी आपलाच एखादा अनुभव आठवावा. उदाहरणार्थ, आपण कधीतरी एखाद्या थंड हवेच्या स्थळी, किंवा आपल्या आवडत्या गावी जातो. तिथे आपण एक वेगळाच आनंद अनुभवतो. तो वास्तविक अनुभव असतो. पण तो काही क्षणांचा असतो. तरीही तो काही काळासाठी मनाला प्रफुल्लित, उत्साही आणि ऊर्जा प्रदान करतो.त्यासाठीच ठराविक काळानंतर नित्य आपण अश्या यात्रेला जातो आणि तो अनुभव, ती अतिरिक्त ऊर्जा मिळवून येतोच.
याच आस्वादाला मनात आठवून, मगच मन शांत करण्याचा प्रयास सुरू केल्यास, आपण मन शांत करण्याच्या या प्रयासात, लवकर यश मिळेल. कारण मन जे असं इंद्रिय आहे, ज्याला इच्छा, आसक्ती यांची जोड दिल्याशिवाय ते उद्दिपित अर्थात चार्ज होत नाही.
याच प्रयासाला पुढे नेण्या विषयीचं चिंतन उद्या सुरू ठेवूया. तोपर्यंत नामातून आनंद मिळवत राहून, त्याद्वारे मनाला शांत करण्यासाठी उद्दिपित करुया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/१०/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment