Skip to main content

भोग आणि ईश्वर ६१०

भोग आणि ईश्वर ६१० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

मनाला ईश्वराकडे वळवावं असं काल म्हटलं. पण हे का त्यावर आज चर्चा करूया. मुळातच पंचमहाभूांचे म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, याचं बरोबर बुद्धी, मन आणि अहंकार हे अष्टांग मिळून, भगवंतांनी तयार केलेली या जगताची अभिव्यक्ती आहे. ती त्याच पद्धतीने भगवंताकडे परत गेली पाहिजे. कारण त्यातून सर्व जगतातील जीवसृष्टी ईश्वराने निर्माण करून, जगताचा हा खेळ सुरू केला. 

पण या अष्ट अंगांची निर्मिती स्वतः ईश्वराने केलेली असल्यामुळे, वास्तविक यातील प्रत्येक गोष्ट, ईश्वरा प्रती लीन असली पाहिजे. किंवा नैतिक दृष्टीने, तसं अपेक्षित आहे. या जगताचा आधारच तो आहे की, जे जिथून निर्माण झालं, ते त्याच्याकडे पुन्हा पोचतं केलं पाहिजे. या तत्वाच्या पूर्तीनुसर पंचमहाभूते ही देहाच्या निर्मितीसाठी वापरली जातात आणि देहाच्या समाप्तीनंतर ही पाचही तत्व अनंतात विलीन होतात. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या पाचही जण, त्या त्या तत्वतः संमिलित होतात. 

आता राहता राहिली तीन तत्व जी विधात्याने निर्माण करूया मानवाला पूर्णत्व प्रदान केलं. मन बुध्दी आणि अहंकार. वास्तविक अहंकार म्हणजे फक्त एक भाव नाही. तर अनेक भावातून तयार झालेलं मिश्रण आहे. अनेक भाव एकत्र येऊन, त्यातून तयार झालेला परिपाक आहे. यातील अहंकार हा भाव सर्वात तीव्र प्रतीचा आणि मृत्यूपश्चात सुद्धा पाठ न सोडणारा आहे.

ज्याप्रमाणे आत्म्यासह मनोमय कोष देह सोडून निघतो, त्याचप्रमाणे बुद्धी ज्ञानाच्या रुपात आणि अहंकार हा दृढ भाव, बाकी सर्व भावांना मागे सारून, आत्म्यासह, नवीन देहाप्राप्ती साठी पुन्हा ब्रम्हांडात विहार करतात. कर्मगती नुसार पुन्हा फळांच्या आणि संचीताच्या योजनेप्रमाणे, देह प्राप्ती झाली की, ज्ञान, मन आणि अहंकार, त्या प्राप्त मनात स्वार होऊन, पुन्हा, त्या देहात आपलं बस्तान बसवून, पुन्हा संसारारुप सागरात जीवाला लोटून देतात.

म्हणजे जीव पुन्हा त्या जन्मातील, त्या देहात अहंकाराच्या विळख्यात आणि मनाच्या लहरींप्रमाणे, बुद्धीचा वारू हाकत, देहाला भोगांच्या साम्राज्यात, गुंतत जातो. जिथपर्यंत देह आहे, तिथपर्यंत, मी, माझं, माझ्या साठी इत्यादी कोष विणून, त्यात दडून राहतो. पुन्हा मृत्यू समीप येतोय आणि देह नष्ट होणार, हे जाणवताच, त्याचा आत्मा जागा होऊन, केलेल्या चुका, घडलेले प्रमाद, अपराध इत्यादी स्पष्ट समजतात. मग मन ईश्वराकडे, याचना करून, सुटकेसाठी आकांक्षा करतं. 

ईश्वर स्वतः, आपल्याच तयार केलेल्या नियमाने बद्ध असल्या मुळे, काहीही करू शकत नाही. यातून मार्ग काय व कसा काढायचा यावर चर्चा उद्याच्या करूया.

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...