Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२१

भोग आणि ईश्वर ६२१
  
श्रावणात सुरू झालेला उत्साहाचा झरा, पुढे गणपतीला एका छोट्या नदीचं रूप धारण करतो. मधले पक्षातले पंधरा दिवस, जरा त्या नदीला वळणं लावण्यात जातात. त्यानंतर नवरात्रात, उत्साहाची तीच छोटी नदी, एका मोठ्या विस्तीर्ण नदीचा आकार धारण करते. 

नवरात्रातील या पूर्णस्वरुप नदीच्या पात्रातील उत्साह, संपूर्ण मन:क्षेत्र व्यापून टाकण्यासाठी, वाहायला सुरुवात होते. साधारण दसऱ्याला, मनाचा हा उत्साह, मनाचं हे स्वास्थ्यरुप तेजोवलय, मनातील अनेक निरुत्साही, निराशाग्रस्त, नकारात्मक वलयाना, लहरींना, नष्ट करून, शुद्ध, सकारात्मक, उत्साहित लहरी व वलयात परावर्तित वा रूपांतरित करतो. 

इथून, म्हणजे दसऱ्यापासून या उत्साहाच्या प्रचंड जलाशयाची वाटचाल, दिवाळी नामक महाप्रचंड महासागराकडे सुरू झालेली असते. मनाला पंचगुणीत, शतगुणीत, सहस्त्रगुणीत आनंदी आणि उत्साही करण्याच्या मार्गातील, हा दसरा हा खूप महत्वाचा आणि उत्साहाचा प्रारंभ दिन आहे. 

म्हणूनच, या दिवशी, उत्साहाच्या या महासागराकडे नेणाऱ्या, आनंदाच्या विस्तीर्ण जलाशयातील काही भाग, आपण आपल्या मनाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. यासाठी मनातील किल्मिष, जळमटं, निराशा, अंधःकार, निरुत्साह यांना, पूर्णतः दूर सारून, त्याची जागा आशा, उत्साह, आनंद, सकारात्मकता, चांगले विचार, चांगले आचार यांना देऊया. (कारण नुसतेच विचार चांगले असून चालत नाही, तर तसे आचार म्हणजेच कर्म किंवा कृती असेल, तर ते अर्थपूर्ण होईल). 

विजयादशमीचा उत्साह, आनंद आत साठवून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करूया आणि मनाने सकारात्मक, सशक्त व सुदृढ होऊन. कारण मनाच्या स्वास्थ्यावर देह, पंचेद्रिय, ज्ञानेंद्रिय, बुद्धी व आत्मा यांची ग्रहण व स्थापित क्षमता अर्थात receiving n storing capacity अवलंबून आहे. कारण सध्याच्या भाषेत सांगायचं तर, मन हे computer च्या cloud storage प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे साठवण म्हणजे storage वाढवू त्याप्रमाणे, space वाढत जाते. 

या उत्तम वैज्ञानिकी जगतात, आपल्या पूर्वजांनी किती दूरचा म्हणजेच अनेक युगांचा व युगातील कोणत्याही कालखंडाचा विचार करून, सणवार, व्रतवैकल्य, पूजा, प्रार्थना, अर्चना, नमस्कार, प्रणाम, योग, होमहवनादी विधी, आचार, उपचार, कर्म यांची पूर्णतः वैज्ञानिक पायावर तंत्र किंवा उपचार पद्धती किंवा मनासाठी औषध किंवा टॉनिक म्हणूनच निर्मिती केली आहे. त्यामुळे, त्याकडे त्याचं दृष्टीने आणि उपयोगाचं उत्कृष्ट साधन म्हणून, पाहून त्यांना आचरण्याचा प्रयत्न करूया. 

उत्तम मनःस्वास्थ्य हेच उत्तम आरोग्य. त्यावरच देहाचं, पंचेंद्रिय, ज्ञानेद्रिय, बुद्धी व अंतरात्मा याचं स्वास्थ्य, क्षमता, तेज ओज, शक्ती व कार्य अवलंबून आहे. सर्वात महत्वाचं आत दडलेला आनंद, या अश्या उत्साही दिवसांनी बाहेर येतो, नव्हे तो आला पाहिजे आणि आलेला टिकवता आला पाहिजे. 

त्यासाठी सर्वात उत्तम विचार म्हणजे माझ्या मनातील शक्ती, तेज, ओज याचं अस्तित्व, घट किंवा वाढ ही, बाह्य घटना, व्यक्ती इत्यादींशी स्वतःला, आपण कसे निगडित करतो किंवा connect करतो, यावर अवलंबून आहे. नकारात्मक विचार, व्यक्ती, घटना यांना आपण connect होतो तेंव्हा, तेच व तसेच विचार आणि लहरी मनात उत्पन्न होतात. याउलट सकारात्मक व शुद्ध सात्विक भावाशी जेंव्हा मनाला जोडतो किंवा connect करतो, त्यावेळी तशाच लहरी, स्पंदनं आपल्या मनात निर्माण होतात. 

पण खरच असं connect करता किंवा होता येतं का आणि यासाठी काय, कसे प्रयत्न करावेत, कोणत्या घटकांची जाणीवपूर्वक मशागत मनात करावी व कोणते तण काढून टाकावेत, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. पण तोपर्यंत मनःस्वास्थ्य उत्तम ठेवणारं नाम घेतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/१०/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...