Skip to main content

भोग आणि ईश्वर ६०५

भोग आणि ईश्वर ६०५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
आजच्या दीप आमावस्ये निमित्ताने घरी आणि मंदिरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या दीपपूजनाने, मनाला एकप्रकारची प्रसन्नता, सात्विकता आणि उल्हासाचा अनुभव आपल्या पैकी बऱ्याच जणांना आला असेल. यामधे भौतिक आणि रासायनिक दोन्ही प्रकारच्या अनुभवांचा समावेश होतो. पुजे निमित्ताने लावलेले दिवे, त्यांच्या ज्योतीच्या माध्यमातून, वातावरणात सात्विक ऊर्जा व शक्ती प्रसारित करतात. 

त्याच्या सानिध्यात आल्यानंतर, आपल्या मनातील, सात्विक, प्रसन्न आणि आल्हाद या केंद्रांना त्या लहरींचा स्पर्श होतो आणि त्या उर्जेतून देह बुद्धी मन आणि आत्मा या चारही माध्यमांना चैतन्याने भरून व भारून टाकतो. या संपूर्ण क्रियेमुळे, आपल्या सनातन धर्माने, दीप प्रज्वलन, पूजन यांना अनन्य महत्व दिलेलं आहे. आपण त्याचं शास्त्रीय व वैज्ञानिक महत्व जाणून, मगच या प्रथांना पुढे नेलं पाहिजे. 

अश्या भौतिक घटकातून लाभ आणि हानी दोन्ही प्रकारचे ऊर्जा व शक्ती लहरी प्रवाहित होत असतात. त्यातून निघणाऱ्या लहरी, आपल्या देह बुद्धी व मन या तिन्ही वर परिणाम करतात. म्हणूनच आपण नेहमी स्वच्छ, सुंदर, पवित्र व सात्विक परिसर आणि वातावरणाची अपेक्षा बाळगतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतो. कारण आपल्या सनातन धर्माने भौतिक जगतातील प्रत्येक घटकाचं महत्व जाणून, त्यांचा मानवी जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी, असं वातावरण व परिसर चिंता, काळजी, प्रदूषण इत्यादींपासून मुक्त राहील, याची काळजी घेतली होती. 

त्याचं कारण हे शास्त्रीय आणि वैज्ञानिक होतं, पण धर्म या संकल्पनेच्या, पूजा अर्चना, व्रत वैकल्ये, इत्यादींच्या माध्यमातून, हे आपल्या मनात रुजवून, करवून घेतलं आहे. म्हणजे घडणाऱ्या गोष्टी तर वैज्ञानिक उपयोगा च्याच घडल्या पाहिजेत, पण त्याला देवाच्या पूजेच्या धाग्यात गुंफून, सात्विकता, पावित्र्य हे पंच व दश नव्हे तर शतगूणीत होऊन, आस्था, श्रद्धा या भावनांना आपोआप प्रोत्साहन दिलं जाईल. 

भौतिक जगतातील या वा इतर अनेक गोष्टी आपल्या मनावर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम करतात. काही गोष्टी मात्र आपल्या मनावर कोणताही परिणाम करत नाही. म्हणजेच मन अश्या गोष्टीत उदासीन असू शकतं. आपल्या सनातन धर्माने, या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून, परंपरा, सण,. व्रत वैकल्ये, पूजाविधी, स्तोत्र मंत्र, विधी इत्यादी सर्व संकल्पित केले आहेत. 

प्रत्येक ऋतूमध्ये, त्या ऋतूतील हवा, पाणी यातील बदल, यावर वातावरणाचा होणारा परिणाम, मन उदास करणाऱ्या काळात, मनाला उत्साह देणाऱ्या सणांच, व्रतांच आणि परंपरा याचं आयोजन केलं आहे. या सर्वामध्ये कितीतरी अभ्यास, आयोजन नियोजन, दूरदृष्टी, काळाच्या एका मोठ्या परिघाचा विचार केल्याचं नक्कीच जाणवतं. याचं विषयाला उद्याच्या भागात पुढे नेऊया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...