Skip to main content

भोग आणि ईश्वर ६०८

भोग आणि ईश्वर ६०८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

आपण गेल्या दोन तीन भागात पाहिलं त्याप्रमाणे माणसाच्या मनाची जडणघडण ही तीन घटकांची मिळून होते. भौतिक रासायनिक आणि जैविक. पण आपण पाहिलं त्याप्रमाणे हे तीन घटक वेगवेगळे नाही तर एकत्रित संयुक्तपणे माणसाची मानसिक जडणघडण ठरवतात. म्हणून आता या घटकांचा एकत्रित विचार करूया. माणसाच्या मनाची सर्वात प्रथम देहात येताना उभारणी होते. 

म्हणजे जैविक घटक प्रथम येतात. त्या व्यक्तीचं कुटुंब, पूर्वज आणि त्यांच संचित या घटकांचं मिळून जैविक विश्लेषण करताना, एक गोष्ट लक्षात येते की, साचितात असेल त्यानुसार त्या कुटुंबात, त्या परिस्थितीत, त्या काळात, त्या त्या कर्मांची फेड करून घेण्यासाठी, त्या व्यक्तीचा जन्म होतो. म्हणजे संचितात जे आपण आपल्या कर्मानुसार आधी लिहून ठेवलं असेल त्यानुसार आपणच आपल्या मानसिक घडणीचे घटक ठरवतो. 

म्हणजे, जर काही कष्ट काळज्या, चिंता, त्रास त्या आयुष्यात आपणच लिहून ठेवले असतील, त्यानुसार आपण त्या कुटुंबात जन्म घेऊन, ते भोग भोगण्या साठीची मनाची घडण प्राप्त करवून घेतो. आता या ठिकाणी हे लक्षात येईल की, भौतिक घटकांची ही पार्श्वभूमी आपण आपल्यासाठी स्वतःच लिहून ठेवतो. यातूनच दुसरा मुद्दा जो समोर येतो तो म्हणजे, याचं न्यायाने, रासायनिक आणि भौतिक घटक सुद्धा आपणच आपल्या संचितानुसार लिहून ठेवतो आणि या जन्मात मिळवतो. 

म्हणजे आपल्या मानसिक जडणघडण, स्थितीची उभारणी व लिखाण, आपण आपल्या आधीच्या जन्मां मधील आपल्या कर्माने करवतो, हे ध्यानात ठेवावे. आपल्या मनाला आपण अश्या प्रकारे आधीच्याच कर्माने घडवतो. आता हे सर्व, मना बद्दल इतकं दीर्घ विवेचन करण्याचं कारण म्हणजे मनाच्या स्थितीवर देह बुद्धी, प्रारब्ध, कर्माची फळं प्राप्ती होणं, ते भोग भोगणं, उपभोग प्राप्त करणं, त्याचप्रमाणे पुढील आयुष्य जन्म सुधारण्यासाठी, घडवण्यासाठी, किंवा बिघडवण्याची शक्ती, ताकद याचं मनात आपण निर्माण करू शकतो, करतो किंवा उधळू पण शकतो. 

आपल्या मनाच्या या स्थितीला आपण स्वतःच निर्माण करूया आणि आज जे प्राप्त झालंय, ते जरी पूर्वजन्मातील कर्मातील फलाने प्राप्त झालेलं असलं तरीही, आपण त्या कर्माच्या परिणामांना काही प्रमाणात नक्कीच बदलू, शकतो का किंवा पुढील आयुष्यात अथवा आपणच निर्माण करत असलेल्या संचितात, परिवर्तन करू शकतो का, याबद्दल उद्याच्या भागात चर्चा करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...