Skip to main content

भोग आणि ईश्वर ६१७

भोग आणि ईश्वर ६१७ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड) 
  
अतींद्रिय शक्ती म्हणजे नेमकं काय हे जरा विस्ताराने जाणून घेऊ. या जगात, जे आपल्या ज्ञानेंद्रियांना दिसतं, जाणवतं, कळतं ते फक्त देहाच्या क्षमतेवर. तेच सर्वमान्य ठरतं. कारण जे दिसतं तेच योग्य समजलं जातं. म्हणजे जाणिवांची ज्ञानाची, अनुमानाची, अभ्यासाची मर्यादा ही फक्त देहाच्या शक्ती व ऊर्जेवर अवलबून आहे, असं सर्वसामान्य ज्ञान सांगतं. म्हणजे जे आणि जेवढ आपण, ज्ञानेंद्रियांचा आधार घेऊन आणि त्यांच्या अत्युच्च क्षमतेनुसार, प्राप्त ज्ञानाचं, लहरिंच आकलन, संकलन,
केलं, तरी त्याला काही मर्यादा आहेत आणि असतात.

परंतु, मनाच्या अमर्याद शक्तीचा विकास, विस्तार आणि वापर केला तर, या विश्वातील, विधात्याच्या अमर्याद साधनांचा उपयोग करून, विधात्याला अपेक्षित, अध्यात्मिक मार्गावर प्रगती पथावर मार्गक्रमण करू शकतो. यासाठी लागणारी ज्ञानेंद्रिय आणि जाणिवांची शक्ती ऊर्जा आणि पात्रता मिळवण्यासाठी, भौतिक जगतातील उपायांच्या पलीकडे जाऊन उपाय करण गरजेचं आहे.

अशी पात्रता एखाद्या जन्मात क्वचितच पाहायला मिळते. अर्थात एखाद्याला अशी पात्रता मिळालेली किंवा ज्याला अध्यात्मिक भाषेत सिद्धी प्राप्त करण म्हणतात, ती मिळालेली पाहतो किंवा ऐकतो, तरीही, ते एका जन्माच फलित असतं नाही. त्यासाठी नियमितपणे, नियमाने सातत्याने एखादी साधना, नेम, नाम,. सद्गुरू सेवा भक्ती, शरण अर्पण स्मरण योग इत्यादी पैकी एखादा उपाय, अवलंबावा लागतो. 

त्या मार्गावर नेमाने चालणं ही एक मोठी परीक्षा असते. सातत्य, चिकाटी, धैर्य, श्रद्धा, विश्वास यांचा मेळ साधता येणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी मुळातच अश्या अतींद्रिय शक्तींवर विश्वास असणं आवश्यक आहे. अश्या गोष्टी किंवा अशी साधना ही, प्रयोग म्हणून करायच्या गोष्टी नाहीत. मनाला सतत त्यात गुंतवून, एकाग्रता आणि चित्ताची शुद्धता, या महत्वाच्या पायऱ्या पार कराव्या लागतात. 

अशी एकाग्रता आणि शुद्धता, एकदा प्राप्त केल्यावर, पुन्हा, त्यावर नेमाने कार्य करत राहणं आवश्यक आहे. कारण आपलच मन कधी आपल्याला धोका देईन आणि विकारग्रस्त होऊन पुन्हा waat भरकटेल, हे सांगता येणार नाही. अश्या प्रकारच्या कठीण मार्गासाठी आणि नेटाने चालण्यासाठी, एखादा भक्कम आधार असं आवश्यक आहे. एखादा मार्गदर्शक, किंवा सद्गुरू स्वरूप मिळणं ही देखील विधात्याचीच कृपा म्हणावी लागेल. कारण, असे सद्गुरू जे, निस्सीमपणे आपल्या शिष्याला प्रगती पथावर अहर्शित चालण्याची प्रचंड इच्छाशक्ती असावी.

यावर अजून विस्ताराने चर्चा उद्याच्या भागात क्रिया आणि तोपर्यंत ती पात्रता यावी यासाठी सद्गुरू कृपेने प्राप्त नाम घेतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...