भोग आणि ईश्वर ५४१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) प्रत्येक जीवांश मुक्त होऊन, पुन्हा परम अंशात विलीन व्हावा, ही ईश्वराची, ब्रम्हांड रचनेवेळची इच्छा होती आणि कल्पांतापर्यंत ती असणार. पण सर्व स्थळी, सर्व काळी आपण उपस्थित राहू शकणार नाही,या अपरि हार्यतेतूनच, सद्गुरू तत्वाची निर्मिती झाली. कारण इश्वरेच्छा बलीयसी, हे तर सत्य वचन आहेच. म्हणून या ईश्वराच्या प्रतिनिधींना या जगतात, सामान्य माणसाच्या कल्याणार्थ धाडण्यात आलं. किंबहुना त्यांचं अस्तित्व हे जगतजीवन सुलभ, सुसह्य करून, मुक्ती व मोक्ष मार्गाची वाट साध्य करून देणं, यासाठीच आहे. पण यासाठी आवश्यक तयारी प्रत्येक जीवाकडून, करून घेणं, हे महद् कार्य या भूतलावर, अव्याहत, म्हणजे काळाच्या आदी पासून ते कल्पाच्या अंता पर्यंत, निरपेक्ष भावनेने, निष्काम कर्म योग्या प्रमाणे करण्यासाठी, चैतन्य रूप ते मानवी देह धारण करण्याची शक्ती, सिद्धी, पात्रता मिळवण्यास योग्य असलेले, परम साधक, गुरू तत्वाचे आद्य श्रीदत्तगुरू यांच्या परम कृपेने, गुरुपद प्राप्ती करतात. यासाठीची घोर साधना, तप, त्याग, वैराग्य, निष्ठा, ध्येयासक्ती हे...