Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

भोग आणि ईश्वर ५४१

भोग आणि ईश्वर  ५४१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     प्रत्येक जीवांश मुक्त होऊन, पुन्हा परम अंशात विलीन व्हावा, ही ईश्वराची, ब्रम्हांड रचनेवेळची इच्छा होती आणि कल्पांतापर्यंत ती असणार. पण सर्व स्थळी, सर्व काळी आपण उपस्थित राहू शकणार नाही,या अपरि हार्यतेतूनच, सद्गुरू तत्वाची निर्मिती झाली. कारण इश्वरेच्छा बलीयसी, हे तर सत्य वचन आहेच.  म्हणून या ईश्वराच्या प्रतिनिधींना या जगतात, सामान्य माणसाच्या कल्याणार्थ धाडण्यात आलं. किंबहुना त्यांचं अस्तित्व हे जगतजीवन सुलभ, सुसह्य करून, मुक्ती व मोक्ष मार्गाची वाट साध्य करून देणं, यासाठीच आहे. पण यासाठी आवश्यक तयारी प्रत्येक जीवाकडून, करून घेणं, हे महद्  कार्य या भूतलावर, अव्याहत, म्हणजे काळाच्या आदी पासून ते कल्पाच्या अंता पर्यंत, निरपेक्ष भावनेने, निष्काम कर्म योग्या प्रमाणे करण्यासाठी, चैतन्य रूप ते मानवी देह धारण करण्याची शक्ती, सिद्धी, पात्रता मिळवण्यास योग्य असलेले, परम साधक, गुरू तत्वाचे आद्य श्रीदत्तगुरू यांच्या परम कृपेने, गुरुपद प्राप्ती करतात.  यासाठीची घोर साधना, तप, त्याग, वैराग्य, निष्ठा, ध्येयासक्ती हे...

भोग आणि ईश्वर ५४०

भोग आणि ईश्वर  ५४० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    मनावरील सर्व प्रकारचे  ताण, अतिरिक्त दबाव, ज्यामुळे  आपण, प्राप्त भोग व उपभोग यातून आपलं मन शुद्ध, सशक्त आणि सुबल ठेवू शकत नाही, त्या मनाला ती शुद्धता ते बल व ती ऊर्जा प्राप्ती साठी, अनेक उपाय आहेत.  पण त्यातील, सर्वमान्य, सामान्य माणसाला सहसुलभ असा मार्ग म्हणजे सद्गुरू. समस्त जगताला आधार, कलियुगातील विशेष आशास्थान आणि ईश्वर प्राप्तीसाठी सामान्य माणसाला सामान्यत्व ते असामान्य ईश्वरीकृपाप्राप्ती या मार्गातील मुख्य आधरस्तंभ म्हणजे सद्गुरू.  जदडेहात आल्याशिवाय, संचीतातील कर्मागतीचा फेरा चुकवता येणार नाही आणि मुक्तता सुद्धा शक्य होणार नाही, हे विधि लिखित सत्य आहे.  या देहात आल्यावर, कर्मप्राप्त भोग व उपभोग हे देहाचे असतात, आत्म्याचे नाही.आत्म्याला ती लागलेली काजळी असते.ही काजळी काढण्यासाठी आणि नवीन चढू न देता, मुक्तीच्या मार्गा वर जाण्यासाठीच, पंचमहाभूत रूप देह, ईश्वराने दिला आहे. ही जाणीव सामान्य जीवाला, अज्ञानी मुढ जनांना, होणं हे सर्वसामान्य परिस्थितीत अशक्य आहे.  एखादा भाग्यवानच हे ज्ञान, या ज...

भोग आणि ईश्वर ५३९

भोग आणि ईश्वर  ५३९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    मनावरील अनेक प्रकारची बलं, ही अनेक माध्यमातून, मानवी मनावर कार्यरत असतात. त्याचे ढोबळ मानाने काही विभाग करता येतील. पूर्वकर्माची भीती, सद्य स्थितीतील कर्माच्या फलत्वाची शाश्वती किंवा अशाश्वतीची भीती, मृत्यूची भीती, अनेक बाबतीत असलेलं अज्ञान आणि त्या अज्ञानाची सुप्त भीती, आपल्या चांगल्या व अनेक कर्माबाबत चांगल की वाईट याचं विश्लेषण करत असताना असलेलं अज्ञान आणि त्या अज्ञानाची भीती, एका कर्माचं समोर आलेलं अनिष्ट फलित पाहून, हातून घडलेल्या चुकांची भीती, अश्या अनेक प्रकारच्या सुप्त आणि प्रत्यक्ष भीतीने, मानवी मन नेहमीच चिंताग्रस्त वा काळजीने त्रस्त असतं. यामधे कुटुंबाबददल वा आप्तस्वकीय आणि प्रपंचं यांबद्दल असलेले भाव, म्हणजेच परस्पर संबंधांचे सकारात्मक व नकारात्मक भाव, यामुळे ही भीती, चिंता व काळजी शतपटीने वाढते. पण या सर्वात मनाने खंबीर दोन प्रकारची लोकं असतात. जे चुकीचं, अनिष्ट वागुनही, मायेच्या प्रभावाखाली वा प्रभावामुळे, आपण जे करतोय ते योग्यच, अश्या समजुतीत असतात ते आणि अज्ञाना मुळे ज्यांना माहितसुद्धा नसतं की, आपण चूक करत...

भोग आणि ईश्वर ५३८

भोग आणि ईश्वर  ५३८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    मनावर असलेल्या बाह्य प्रभावाला मन, बुद्धी व देह कश्याप्रकारे प्रतिसाद देतं आणि काय प्रतिक्रिया देतं यावर प्रत्येक जीवाची पुढील कर्मकहाणी अवलंबून आहे. यामधे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की, प्रतिक्रिया देणं किंवा काहीही प्रतिक्रिया न देणं ही दोन्ही कर्मच आहेत. त्यामुळे त्या दोन्हींचे तसे तसे परिणाम होणारच. त्यामुळे हे भान, ज्ञान व समज असली पाहिजे की, कोणत्या वेळी काय प्रतिक्रिया द्यायची. मनावर असलेला हा बाह्य ताण तणाव आणि आपली कर्म यांची सांगड घालत आयुष्य पुढे न्यायचं असतं.  कारण समोर येणारं कर्मफल आणि आपलं सद्य कर्म, या वास्तविकपणे दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणजेच मागे आपण पाहिलेल्या चेंडूच्या उदाहरणाप्रमाणे, आपण आधी कधीतरी फेकलेला चेंडू, आता परत आलेला आहे. त्याचवेळी आपल्याला आताचा कर्मरुप चेंडू फेकायचा आहेच.  पण हा येणारा चेंडू आणि आपला आताचा चेंडू, यांची आपण गफलत करतो किंवा आपल्याकडून, अज्ञानामुळे गफलत होते.   याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे, ही संगती नाही, हे आपण विसरतो आणि बादरायण नसलेला हा संबंध आपण जोडून...

भोग आणि ईश्वर ५३७

भोग आणि ईश्वर  ५३७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कलियुगातील असुर शक्तींचा प्रभाव वाढत असताना, या नकारात्मक  लहरी आपल्यापर्यंत येणारच. कारण मुळातच आपण सर्वप्रकारच्या, म्हणजे शुभ व अशुभ लहरींच्या विळख्यात असतो. यातून सुटका नाही. सुटका नाही, म्हणजे, हे वातावरण, समस्त भुतलाला व्यापून आहे. म्हणजे जिथे जिथे या विश्वात श्वास आणि उश्वास याचं साम्राज्य आहे, त्या त्या स्थानापर्यंत, या लहरींचा प्रभाव आहे आणि असणार. विज्ञानाचा सुद्धा तो नियम आहे. अगदी निर्वात पोकळीतसुद्धा या लहरींचा संचार असतोच.  म्हणजे, आपण आपल्या देहाच्या सर्वांगाभोवती, वलयांकित आहोत. याचा आपल्या बुद्धी, देह व मन यांवर, प्रभाव होतच असतो. या प्रभावळीत, सुष्ट आणि दुष्ट, सकार व नकार अश्या दोन्ही प्रकारच्या लहरी असतात.  त्या आपल्या देहासह, बुद्धी व मस्तिष्क आणि मन यांच्यावर सतत एकप्रकारे दबाव टाकत असतात. आपण एखाद्या वाईट प्रसंगातून वा अनिष्ट काळातून जातो, त्यावेळी हा दुष्ट शक्तींचा प्रभाव अतिप्रमाणात असतो.  त्यावेळी मनावर असलेला, ताण व तणाव आपण नक्कीच अनुभवू शकतो.  किंबहुना, तो तसा जाणवतो याचा अर्थ आ...

भोग आणि ईश्वर ५३६

भोग आणि ईश्वर  ५३६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     कलियुगाचं एक वैशिष्ट्य, जे सांगितलं जातं की, या युगात देवांची शक्ती क्षीण असेल. या मागचं महत्वाचं कारण आपण जाणून घेऊ. मुळात आपण जी पूजा, अर्चना, साधना,  होम हवन याग, उपवास, उपासना, भक्ती, स्मरण, धर्मकार्य इत्यादी करतो, त्यातून, सुरवर देव इत्यादींना असुर शक्तींशी लढण्या साठी बळ प्राप्त होतं. द्वापारयुगापर्यंत ही सर्व कार्य, सेवा इत्यादी पूर्ण श्रद्धा व धार्मिक भाव जाणून, केली जात. ते करणाऱ्या श्रद्धावान लोकांची  संख्या जवळपास शंभर टक्के होती.  पण कलियुगात, कलीच्या प्रभावाने, देवांवरील आस्था, श्रद्धा, विश्वास यांची दृढता हळूहळू कमी होत चालली आहे. देवावर विश्वास नाही, हे सांगणाऱ्याची संख्या  वाढत आहे. त्यामुळे हळूहळू लोप पावत जाणाऱ्या या श्रद्धेच्या लहरी अधिकाधिक क्षीण होत जात आहेत. याचं महत्वाचं कारण की,संकट आल्यावर,देवाला नमस्कार करून, त्याद्वारे आपल्यावर आलेल्या संकटातून सुटका करून घेणाऱ्यांच्या लहरी मुळातच, स्वतःपुरत्या मर्यादित असतात.  याकारणाने, त्यातून सर्वभावे व सर्वव्यापक लहरी, उत्पन्न ...

भोग आणि ईश्वर ५३५

भोग आणि ईश्वर  ५३५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)      याचं कारण, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असलेला हा ईश्वर, प्रत्येक देहात व निर्जीव वस्तूंमध्येसुद्धा आपल्या अंश रुपाने स्थित आहे. अनेकरुपात व्यक्त होऊनही, त्या प्रत्येक रूपात प्रकट झालेला ईश्वर, त्या त्या देहाचं भिन्नत्व मन व बुद्धीरूपात टिकवून, वृत्ती रुपात ती भिन्नता प्रकट करतो. म्हणजे आत्मारुपात असणारं निर्गुणत्व पंचमहाभूतरूपात सगुण साकार करतो.  ही,सर्व रूपात सर्व देहात प्रकट असलेला अंततः एकच असण्याची खूप मोठी साक्ष "एकोहं द्वितीयो नास्ती" या  सार्थ वचनात त्याने मांडून ठेवलं आहे. माझ्यामते हे जगत भगवंताचं  प्रकट चिंतन आहे. चिंतन हे मनात केलं जातं आणि ते निर्गुण असतं. म्हणजे त्या चिंतनाला देह नसतो, तर विचार लहरी यास्वरुपात आपण हे चिंतन मनात करतो. पण ज्यावेळी हे अप्रकट चिंतन,वाणीरूपात, चित्ररूपात, शब्दरूपात, भाव रुपात प्रकट होतं, त्यावेळी त्या चिंतनाला सगुणत्व प्राप्त झालं असं म्हणता येईल.  हे जगत म्हटलं तर सगुण आणि म्हटलं तर निर्गुण आहे. ईश्वराच्या चिंतनात अप्रकट असणारं हे विश्व ब्रम्हरूपात साकार...

भोग आणि ईश्वर ५३३

भोग आणि ईश्वर  ५३३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     मानव हा ईश्वर निर्मित स्वयंचलित रोबो आहे असं म्हणणं एका अर्थाने योग्यच ठरेल. कारण त्या रोबोप्रमाणे मानवाला सर्व स्वयंचलित व्यवस्था दिलेली आहे. जन्मा पासून ते मृत्यूपर्यंत अविरत व अव्याहतपणे चालणारं हे मानवी देहाचं यंत्र, अनेक बाबतीत स्वनि यंत्रित आणि स्वयंचलित असतं. म्हणूनच ते यंत्र आपला निर्माता असलेल्या इश्वराशी प्रतारणा करो वा ऋण व्यक्त करो वा न करो, पण हे यंत्र व्यवस्थित चालतं. पण याची गाडी किंवा मोट, कर्माशी अर्थात केलेल्या प्रत्येक कर्माच्या गतीशी बांधून, ईश्वराने या यंत्राला एका सूत्रबद्ध आयुष्यात गुंतवलं आहे. म्हणजे असं की या यंत्राच्या निर्मितीचं हेच गुपित आहे की, जशी आणि जितकी गुंतागुंतीची ही कर्मगती असेल, तितकच गुंता गुंतीचं आयुष्य असेल. यातसुद्धा ईश्वराने काही गोष्टींचा गुंता अश्या प्रकारे गुंफला आहे की, कोणत्या कर्माचं फल कधी मिळेल हे समजण्याची कोणतीही सोय वा सवलत, ईश्वराने ठेवली नाही.  म्हणजे आपण केलेल्या कोणत्या कर्मामुळे, आजचं फलित आपण भोगत वा उपभोगत आहोत, हे कधीच कळणार नाही, अशी व्यवस्था निर्माण...

भोग आणि ईश्वर ५३४

भोग आणि ईश्वर  ५३४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     ईश्वर हा पूर्वीच्या काळातील त्या शिक्षक किंवा सद्गुरू प्रमाणे आहे, ज्यांना, असं प्रामाणिकपणे वाटतं की, आपला प्रत्येक विद्यार्थी वा शिष्य उत्तीर्ण व्हावा. पूर्वीच्या काळातील असं मुद्दाम म्हंटलं , कारण आता काही प्रमाणात व्यावसायिकता शिरल्या कारणाने ती प्रामाणिक वृत्ती लोप पावत चालली आहे. वास्तविक गुरू, शिक्षक ही ईश्वराची प्रतिरूपं आहेत, ज्यांचं काम, शिकवणं आणि चुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा मार्ग दाखवणं.  म्हणूनच विद्यार्थी कसाही निघाला तरी सहसा उत्तम शिक्षक वा सद्गुरू, आपलं सांगणं, वागणं व सावरून आणि सांभाळून घेण्याची वृत्ती बदलत नाहीत. शिक्षकांचं आणि सद्गुरुंचं कार्य म्हणूनच खडतर आणि अविश्रांत आहे. त्यामध्येसुद्धा शिक्षकांचं कार्य देह असेपर्यंत असतं. पण सदुगुरूंचं कार्य देहापश्र्चातसुद्धा चैतन्य रूपात सुरूच असतं. हे कार्य सद्गुरू आणि शिष्य दोघांच्याही देहापश्र्चात अखंड सुरू राहतं. ही वृत्ती अंगी यायला सद्गुरू आणि शिक्षक यांना अनंत ताप आणि खडतर तप, साधना, कष्ट, यातना आणि चिंतन यांमधून जावं लागतं.  य...

भोग आणि ईश्वर ५३३

भोग आणि ईश्वर  ५३३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     मानव हा ईश्वर निर्मित स्वयंचलित रोबो आहे असं म्हणणं एका अर्थाने योग्यच ठरेल. कारण त्या रोबोप्रमाणे मानवाला सर्व स्वयंचलित व्यवस्था दिलेली आहे. जन्मा पासून ते मृत्यूपर्यंत अविरत व अव्याहतपणे चालणारं हे मानवी देहाचं यंत्र, अनेक बाबतीत स्वनि यंत्रित आणि स्वयंचलित असतं. म्हणूनच ते यंत्र आपला निर्माता असलेल्या इश्वराशी प्रतारणा करो वा ऋण व्यक्त करो वा न करो, पण हे यंत्र व्यवस्थित चालतं. पण याची गाडी किंवा मोट, कर्माशी अर्थात केलेल्या प्रत्येक कर्माच्या गतीशी बांधून, ईश्वराने या यंत्राला एका सूत्रबद्ध आयुष्यात गुंतवलं आहे. म्हणजे असं की या यंत्राच्या निर्मितीचं हेच गुपित आहे की, जशी आणि जितकी गुंतागुंतीची ही कर्मगती असेल, तितकच गुंता गुंतीचं आयुष्य असेल. यातसुद्धा ईश्वराने काही गोष्टींचा गुंता अश्या प्रकारे गुंफला आहे की, कोणत्या कर्माचं फल कधी मिळेल हे समजण्याची कोणतीही सोय वा सवलत, ईश्वराने ठेवली नाही.  म्हणजे आपण केलेल्या कोणत्या कर्मामुळे, आजचं फलित आपण भोगत वा उपभोगत आहोत, हे कधीच कळणार नाही, अशी व्यवस्था निर्माण...

भोग आणि ईश्वर ५३१

भोग आणि ईश्वर  ५३१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  उत्शृंकलपणा हा वास्तविक मनाचा मर्यादा त्यागल्या नंतरचा अवगुण म्हणता येईल. पण अगदी तितकं टोकाचं नाही, तरी थोडफार मर्यादा उल्लंघन सर्वसामान्यपणे होतं. भले प्रमाण काही अंशापासून ते काही टक्क्यांपर्यंत असू शकेल. या सर्वात उत्तम पुरुष अर्थातच भगवान श्रीराम, ज्यांनी त्या त्या समयी, त्या त्या नात्याच्या मर्यादा जपल्या, सांभाळल्या. अगदी राजा होण्याआधी पती म्हणून असलेली जबाबदारी, रावण वध करून पाळली. पण राजा झाल्यावर, नातं बाजूला ठेवून, राजाचं सर्वात कठीण असं परम कर्तव्य पार पाडलं. पण अश्या सर्वोच्च पातळीवर मर्यादा पाळणं अशक्य असलं तरी सर्वसाधारण व्यक्ती नक्कीच काही जबाबदाऱ्या पाळते. याला कारण मनावर असलेला अंकुश. हा अंकुश किती प्रमाणात असेल, त्यावर त्या व्यक्तीचं व्यक्तित्व ठरतं. म्हणजेच समाजात वावरताना एक प्रकारची मर्यादा नक्कीच पाळावी लागते. पण ती मर्यादा बंधन म्हणून न पाळता, व्यक्तीच्या विवेकाचा भाग असेल, तर व्यक्तित्व अधिक खुलून दिसतं.  न पेक्षा ते ओझं होतं आणि असं जबरदस्ती मनावर लादून घेतलेलं वा लादण्यात आलेलं बंधन कधीतरी मन झुगा...

भोग आणि ईश्वर ५३०

भोग आणि ईश्वर  ५३० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    मनाला कोणतीही गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य ईश्वराने बहाल केलं. त्याचबरोबर, त्याला मोह लोभ इत्यादी शापसुद्धा सोबत दिले. त्यांना शाप की वरदान काय म्हणायचं, हे त्या मनाचा वापर माणूस कसा करतो, त्यावर ठरतं. पण माणसाला ते कळण्याचं तंत्र जाणीव या रूपात ईश्वराने दिलं. जाण, जाणीव या प्रगल्भ झाल्या की, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि कर्म व कर्माचं तंत्र हळूहळू कळायला लागतं. पण मन हे सर्व आकलन करतं ते ज्ञानेंद्रियांचा वापर करून. म्हणजे एकप्रकारे ही ज्ञानेंद्रिय मनाचे मदतगार किंवा सहाय्यक आहेत.  यांच्याशिवाय, मनाला बाहेरचं जाणणं शक्य नाही. पण मनाची स्वतःची काही धारणा असते वा जाणीवा असतात. त्याआधारे, बाहेरून आकलन झालेल्या गोष्टी, मन आपल्या धारणेवर पडताळून पाहतं. ज्ञानेंद्रिय फक्त, माहिती, घटना, संवाद इत्यादी गोष्टी मनापर्यंत पोचवतात. या धरणांमुळे एकाच गोष्टीचं आकलन दोन वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या प्रकारे करून, त्याचं अनुमान त्यानुसार काढतात.  म्हणून प्रत्येकाची विश्लेषण पद्धत वेगवेगळी असते. यामध्ये त्या ज्ञानेंद्रिया...

भोग आणि ईश्वर ५३२

भोग आणि ईश्वर  ५३२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    विवेकाने आणि विचाराने वागणं म्हणजे मनाला पूर्ण नियंत्रणात ठेवून वागणं. कारण विचारी आणि विवेकी मन, प्रत्येक गोष्टीचा पूर्ण जाणिवेने आणि सखोल विचार करतं. त्यामुळे, प्रत्येक कृती वा कर्म हे परिणाम विचारत घेऊन केलं जातं. तरीही त्या कर्माच्या परिणामात मन गुंतत नाही. विचार सुद्धा पूर्ण क्षमतेने केले जातात आणि जाणीवा नेहमी जागृत असतात.  जागृत जाणीवा परिस्थितीचं योग्य आकलन करतात. प्रत्येक क्षणी त्या जागृत असतात आणि ऐन मोक्याच्या क्षणी त्या पूर्ण सक्षमतेने मनाला बुद्धीला मार्गदर्शन करतात. म्हणून विचार पूर्वक केलेली कृती वा कर्म सहसा पश्र्चाताप करायला लावत नाही, परिणाम काहीही येवो. आता असं विचारी व विवेकी असायला मनाला शांत आणि स्थिर ठेवणं गरजेचं आहे. जे मन नित्य शांत आहे आणि जे कठीण परिस्थितीतसुद्धा आपला तोल जाऊ देत नाही, तेच शांत मन म्हणता येईल.  मनाला शांतता अनेक कारणांनी मिळू शकते. पण त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आसक्ती कमी करणं, विचारांची अस्थिरता हळूहळू नियंत्रणात आणून त्यांना स्थिर करणं, गोष्टी नियंत्रणात ठेव...

भोग आणि ईश्वर ५२९

भोग आणि ईश्वर  ५२९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनाची भूक किंवा आसक्ती यावर खरतर अनेकांनी अनेक प्रकारे लिहून ठेवलं आहे. पण तरीही ती कमी होत नाही वा आवरता येत नाही. म्हणजे ही सरसकट वृत्ती किंवा प्रवृत्ती आहे मनाची, असं समजायला हरकत नाही. पण सर्वच प्रकारची आसक्ती, हिन किंवा त्याज्य दर्जाची असते असं म्हणता येणार नाही. याचं कारण म्हणजे, काही आसक्तितून, सृजनशील, वर्धन शील, जगत कल्याणार्थ काही गोष्टी घडू शकतात नव्हे घडतात. त्या घडाव्या ही विश्वनियंत्याचीसुद्धा इच्छा असते. उदाहणादाखल, जगात जन्ममृत्यूचं चक्र अव्याहतपणे सुरू राहावं यासाठीची आवश्यक  कामासक्ती, असावीच. कारण त्यायोगे संसार, जगत हे पुढे पुढे जात राहील. प्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा, या जगतात, जगत कल्याणार्थ देह धारण केल्यानंतर, देहाचं कर्म आणि त्या कर्माप्रित्यर्थ आपल निहित कर्म केलं आहेच. पण त्यामध्ये आसक्ती नव्हती, तर कर्मगतीनुसार आवश्यक तितकीच मर्यादित आसक्ती, जरूर होती. त्यामुळे आसक्ती ही काही सकारात्मक हेतूने किंवा निहित वा नित्य कर्माचा भाग म्हणून असेल तर ती गैर वा बाध्य ठरत नाही.  म्हणजेच आसक्ती जी कर्मार्थ, ...

भोग आणि ईश्वर ५२७

भोग आणि ईश्वर  ५२७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    खरं पाहिलं तर मनातील भाव बदलला की, सर्व त्या भावानुसार बदलत जातं. कदाचित संचित आणि प्रारब्ध यांच्या कर्म पुंजी नुसार प्रत्येकाला यामध्ये वेगवेगळा वेळ किंवा काळ लागू शकतो. पण एकदा एखादा मार्ग योग्य आहे, हे लक्षात आलं की, त्या मार्गावर पुढे जाणं इतकंच आपल्या हातात आहे. तेवढं आपण नेटाने करू शकतो. पण आणि हा पण महत्वाचा आहे. कारण हे करणं इतकं सहज असतं तर इतके अनंत ऋषीमुनी, संतं महंत यांनी पूर्ण आयुष्य, त्यासाठी खर्ची घातलं नसतं. म्हणजेच यामध्ये काहीतरी गुह्य असणार, ज्यामुळे, ही गोष्ट वा हे कर्म वाटतं तितकं सहज शक्य होत नसेल. याचं कारण काय, याचं चिंतन करता हे लक्षात येईल की, या सर्व गोष्टी तेंव्हाच साध्य होतील, जेंव्हा मनाला हे पटेल आणि ते मन, त्यासाठी आवश्यक कर्म म्हणजे नित्य कर्में नेमाने व नेटाने देह, बुद्धी व वाचा यांच्याकडून करवून घेईल. म्हणजे पुन्हा आपण एका प्रश्नावर आलो. याचं उत्तर अनेकांनी अनेक प्रकारे देऊन लिहून, कृतीतून दाखवून, जगून आपल्याला दिलं आहे. स्वतः भगवंतांनी त्याबाबतचा सर्वात सोपा मार्ग श्रीमद् भगवदगीतेत मांडू...

भोग आणि ईश्वर ५२७

भोग आणि ईश्वर  ५२७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    खरं पाहिलं तर मनातील भाव बदलला की, सर्व त्या भावानुसार बदलत जातं. कदाचित संचित आणि प्रारब्ध यांच्या कर्म पुंजी नुसार प्रत्येकाला यामध्ये वेगवेगळा वेळ किंवा काळ लागू शकतो. पण एकदा एखादा मार्ग योग्य आहे, हे लक्षात आलं की, त्या मार्गावर पुढे जाणं इतकंच आपल्या हातात आहे. तेवढं आपण नेटाने करू शकतो. पण आणि हा पण महत्वाचा आहे. कारण हे करणं इतकं सहज असतं तर इतके अनंत ऋषीमुनी, संतं महंत यांनी पूर्ण आयुष्य, त्यासाठी खर्ची घातलं नसतं. म्हणजेच यामध्ये काहीतरी गुह्य असणार, ज्यामुळे, ही गोष्ट वा हे कर्म वाटतं तितकं सहज शक्य होत नसेल. याचं कारण काय, याचं चिंतन करता हे लक्षात येईल की, या सर्व गोष्टी तेंव्हाच साध्य होतील, जेंव्हा मनाला हे पटेल आणि ते मन, त्यासाठी आवश्यक कर्म म्हणजे नित्य कर्में नेमाने व नेटाने देह, बुद्धी व वाचा यांच्याकडून करवून घेईल. म्हणजे पुन्हा आपण एका प्रश्नावर आलो. याचं उत्तर अनेकांनी अनेक प्रकारे देऊन लिहून, कृतीतून दाखवून, जगून आपल्याला दिलं आहे. स्वतः भगवंतांनी त्याबाबतचा सर्वात सोपा मार्ग श्रीमद् भगवदगीतेत मांडू...

भोग आणि ईश्वर ५२७

भोग आणि ईश्वर  ५२७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    खरं पाहिलं तर मनातील भाव बदलला की, सर्व त्या भावानुसार बदलत जातं. कदाचित संचित आणि प्रारब्ध यांच्या कर्म पुंजी नुसार प्रत्येकाला यामध्ये वेगवेगळा वेळ किंवा काळ लागू शकतो. पण एकदा एखादा मार्ग योग्य आहे, हे लक्षात आलं की, त्या मार्गावर पुढे जाणं इतकंच आपल्या हातात आहे. तेवढं आपण नेटाने करू शकतो. पण आणि हा पण महत्वाचा आहे. कारण हे करणं इतकं सहज असतं तर इतके अनंत ऋषीमुनी, संतं महंत यांनी पूर्ण आयुष्य, त्यासाठी खर्ची घातलं नसतं. म्हणजेच यामध्ये काहीतरी गुह्य असणार, ज्यामुळे, ही गोष्ट वा हे कर्म वाटतं तितकं सहज शक्य होत नसेल. याचं कारण काय, याचं चिंतन करता हे लक्षात येईल की, या सर्व गोष्टी तेंव्हाच साध्य होतील, जेंव्हा मनाला हे पटेल आणि ते मन, त्यासाठी आवश्यक कर्म म्हणजे नित्य कर्में नेमाने व नेटाने देह, बुद्धी व वाचा यांच्याकडून करवून घेईल. म्हणजे पुन्हा आपण एका प्रश्नावर आलो. याचं उत्तर अनेकांनी अनेक प्रकारे देऊन लिहून, कृतीतून दाखवून, जगून आपल्याला दिलं आहे. स्वतः भगवंतांनी त्याबाबतचा सर्वात सोपा मार्ग श्रीमद् भगवदगीतेत मांडू...

भोग आणि ईश्वर ५२६

भोग आणि ईश्वर  ५२६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    काल आपण हे पाहिलं की, भावात्मक प्रकटन मनाकडून होतं. म्हणजे ज्याप्रकारचे भाव मनात असतील, त्याच प्रकारच्या लहरी मनाकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्याच प्रकारचं कर्म हे काया वाचा बुद्धी व मन यांकडून होतं. याचाच अर्थ आपण असा निष्कर्ष आपण नक्कीच काढू शकतो की, सर्वात प्रथम मनाला, मनाच्या स्थितीला व त्याच्या भावाला सुधारणं जरुरी आहे. एकदा भाव सुधारला की मग, त्या भावाप्रमाणे, त्याला मिळणारा प्रतिसाद अर्थातच त्या भावाकडे आकर्षित होणाऱ्या लहरी देखील सुधारतील.  याची दुसरी बाजू आपण पाहूया. दुसऱ्या अर्थाने जर आपलं मन वा मनाची स्थिती ही सकारात्मक व उत्तम प्रकारची असेल, पण आजुबाजूच वातावरण हे आपल्या मनाच्या विरुद्ध असेल तर, त्या विरुद्ध भावाच्या लहरी, आपल्या मनात प्रवेश करणार नाहीत. कारण जसा भाव तसेच विचार वा विचार लहरी त्या मनाकडे आकर्षित होतात. म्हणूनच ज्यावेळी घरातून, रागावून वु डोक्यात राग घालून आपण बाहेर पडतो,त्यावेळी,तश्याच प्रकारची माणसं वा घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि नेमके त्यात अडकतो आणि दिवसाचा खेलखंडोबा होऊ शकतो. या सर्...

भोग आणि ईश्वर ५२८

भोग आणि ईश्वर  ५२८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     अर्पण शरण आणि स्मरण, या त्रयीचा विचार करताना, एक गोष्ट त्वरित लक्षात येते की, तिन्हीचा संबंध किंवा धागा हा मनाशी बांधला आहे. म्हणजेच हे तिन्ही घटक मनाला कुठे ना कुठे तरी एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतात. किंवा त्यांचा तोच उद्देश आहे. याचं कारण म्हणजे मन हे सहजासहजी कोणत्याही बंधनात बांधलं जाऊ इच्छित नाही. त्यामुळे जर त्याला मुद्दामहून काही यमनियम वा नियंत्रण घालण्याचा केलेला प्रयत्न बरेचदा फोल ठरतो. कारण मन हे मुळातच उत्शुंखल असतं. त्याला बंधनाची मर्यादा रुचत नाही आणि झेपतही नाही. जितकी त्याला नियमांची सवय लावण्याचा प्रयत्न करू, तितकं ते मन अजून अनियंत्रित होत जातं. उदाहरणार्थ जेंव्हा आपण प्रयत्नपूर्वक वा नियमाने, त्याला एखाद्या अभ्यासाला लावण्याचा प्रयत्न करू, तितकीच उसळी मारून, ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल.म्हणजे अनियंत्रित वागणूक वा वागणं,हा त्याचा मूळ स्वभाव आहे.या मूळ स्वभावाला ज्यावेळी मुरड घालावी लागते, त्या त्यावेळी, ते मन प्रतिक्षिप्त क्रिया किंवा प्रतिक्रिया देत.  याचं मनाच्या मूळ स...

भोग आणि ईश्वर ५२५

भोग आणि ईश्वर  ५२५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता या सर्वातून, आपल्याला जर काही ज्ञानप्राप्ती झाली असेल, तर इतकं नक्कीच ध्यानात आलं असेल की, भोग वा उपभोग आणि पुण्य वा पाप, हे सर्व आपणच आपल्या कर्माने लिहितो. त्यामध्ये ईश्वर दखल देत नाही. पण ईश्वराने निर्माण केलेल्या व्यवस्थेनुसार प्रत्येकाला उद्धाराचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येकाला मिळावा यासाठी, ईश्वराने स्वतःच, तशी व्यवस्था निर्माण केलेली आहेच. इतकं करूनही, ही पूर्ण व्यवस्था कर्मानुसारच राहील, हेसुद्धा योजून ठेवलं आहे.  मग अशी काय गोष्ट आहे, कर्माची, ज्याअनुसार किंवा ज्यामुळे, ईश्वराच्या या उन्नती व उद्धार व्यवस्थेचा लाभ प्रत्येकालाच घेता येईल. कारण ईश्वर हा निरपेक्ष आणि निष्पक्षपाती असल्यामुळे काही ठराविक जीवांचा उध्दार आणि काहींना अज्ञान व अंधःकार अशी व्यवस्था ईश्वर निर्माण करूच शकत नाही. मग यातील गुह्य व गहन भाग काय आहे, ज्यामुळे आपण ही व्यवस्था जाणून, त्याचा लाभ घेऊ, शकतो.  असा विचार करा की, एका मंदिरात आरतीनंतर प्रसाद वाटप सुरू आहे. यामध्ये, प्रत्येकाला जो वा जितका प्रसाद मिळेल तो एकूण प्रसादाचा परिपूर्ण ...

भोग आणि ईश्वर ५२४

भोग आणि ईश्वर  ५२४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालच्या विषयातील उदाहरण आज पुढे सुरू करूया. काही आत्मे, प्रगत देशात काही अतिप्रगत देशात काही विकसनशील देशात तर काही मागास देशात देहप्राप्ती करतात. यात कर्माच्या गतीचा संबंध कसा येतो हे पाहू. साधा विचार करा, काही जण भारतासारख्या लोकशाही देशात स्वातंत्र्यप्राप्ती नंतर जन्म घेते झाले, आताच्या काळात.  जिथे सर्वकाही करण्याचं इच्छित स्वातंत्र्य आहे. पण काहीजण हुकूमशाही देशात किंवा हुकूमशाही व्यवस्थेत जन्म घेतात, जिथे बोलणं, काम करणं, पाहणं अश्या सर्वांसाठी कडक नियम, निर्बंध आणि अतिकृर शिक्षा आहेत. जसं सीरिया, लिबिया, यांसह आफ्रिका व मध्या शियातील काही हुकूमशाही देश किंवा उत्तर कोरिया सारखा देश किंवा चीनसारखा एकतंत्रि व्यवस्था असलेला देश. अश्या प्रांतात त्यांचाच जन्म होतो वा होईल, ज्यांची कर्मगती अतिशय खडतर आहे. कारण अश्या प्रांतात, प्रत्येक श्वास हा, दुसऱ्याच्या आदेशावर।अवलंबून आहे.  आता अश्या प्रकारच्या व्यवस्थेत जन्म झाल्यावर, आयुष्य आहे तोपर्यंत किंवा ती व्यवस्था संपेपर्यंत जगणं इतकंच तिथल्या व्यक्तींच्या हातात उरतं. म्हणज...

भोग आणि ईश्वर ५२३

भोग आणि ईश्वर  ५२३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालचाच विषय पुढे नेऊया.  मुळात आपण कर्मानेच बद्ध आहोत आणि फक्त आणि फक्त आपल्याच कर्माच्या फलाचा हिस्सा आपल्याला भोगायला लागतो वा उपभोगायला मिळतो, हे मनात कोरून ठेवा. पण हे सत्य उत्तम काळातही लक्षात येत नाही आणि पडत्या काळातही जाणवत नाही. किंबहुना दोन्ही काळात माणूस चुकीची धारणा बाळगून जगतो. उपभोगांच्या काळात माणूस हे समजतो की, आपल्या चांगल्या कर्माचा परिणाम म्हणून,  आपलं सुखात चाललं आहे. त्याविरुद्ध काळात आपण लगेच वेगळा विचार  करतो की, देवाच्या अवकृपेने माझ्यावर आज हे दिवस आले आहेत.  वास्तविक देवनिर्मित व्यवस्था ही, एखाद्या बँकेसारखी आहे. ती व्यवस्था, तुमच्या खात्यात शिल्लक असलेलं पुण्याकर्माचं वा पापकर्माचं किंवा चुकीच्या कर्माचं  योग्य ते फल तुम्हाला मिळेल इतकंच करते. म्हणजे विधाता नावाची व्यवस्था, त्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. बँकेत खात्यात जर शिल्लकच नसेल तर, आपल्याला कोणती बँक पैसे देईल का?. त्यामुळे आपण भ्रमात राहून, विचारांच्या आणि कृतीच्या चुका करतो. त्याचा परिणाम पुन्हा नवीन कर्मांच्या चुका आ...

भोग आणि ईश्वर ५२२

भोग आणि ईश्वर  ५२२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  स्मरणाचं एक वैशिष्ट्य आहे की, सुखात वा उत्तम काळात आपल्याला सुखोपभोग घेण्याचं स्मरण असतं किंवा विसरच नसतो. मन त्यावेळी वास्तविक उत्तम लहरींनी युक्त असतं. सकारात्मकतेने मनाचा घट काठो काठ भरलेला असतो. पण इथेच आपला खरा घात होतो. म्हणजे होतं काय की, गुंतवणुकीच्या धोरणानुसार हा काळ काही साठवण्याचा, जमवण्याचा आणि भविष्या साठी काही तरतूद करून ठेवण्याचा असतो. ते आपण व्यवस्थितपणे करतो.  हेच नेमकं आयुष्यात वा आत्मानंदाच्या मार्गावर अग्रेसर होण्या साठीसुद्धा करण्याची आवश्यकता असते. पण आपण तेच करत नाही. किंवा त्याचंच स्मरण राहात नाही.  वास्तविकपणे प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एखादा कार्यकाळ असा येतोच, ज्यावेळी मन उल्हसित आणि प्रसन्न असतं, मनांत सकारात्मक विचार, येत असतात, येणाऱ्या कोणत्याही विचारातून नकारात्मक असेल ते, त्यागून, फक्त आणि फक्त सकारात्मक विचार घेऊन पुढे जाण्यासाठी मन सक्षम असतं, जिकडेतिकडे मनाला फक्त उल्हास आणि उत्तम विचार दिसतात.  हा असा काळ गुंतवणूक शास्त्राप्रमाणे, पुढील काळ तसंच पुढील जन्मासाठी काही साठवून प...

भोग आणि ईश्वर ५२१

भोग आणि ईश्वर  ५२१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  अर्पण आणि शरण या दोन शब्दातील रण आणि पण समजल्या वर आता स्मरण याबद्दल आपण जरा विचार करूया. मुळात मनाला स्मरण कशाचं होतं, तर मनाला त्रास देणाऱ्या आणि मनाला आकर्षित करून, आसक्ती निर्माण करणाऱ्या गोष्टींचं. स्मरण म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, क्षण, आठवण  इत्यादी आवडणं आणि त्यामुळे ते लक्षात राहणं. म्हणजेच जे गमतं, रुचतं ते हवं असतं आणि त्यासाठी ते लक्षात राहतं.  किंबहुना मनच अश्या गोष्टी वा क्षण वा व्यक्ती आठवून, ते क्षण वा हव्याहव्याशा वाटणाऱ्या त्या आठवणी पुन्हा पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतं. किंबहुना मनाला भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टींचे मोह, मनाला खुणावतात किंवा जवळ बोलवतात. ते क्षण त्या व्यक्ती, त्या आठवणी इत्यादी सतत हव्याश्या वाटतात. ज्या गोष्टी हव्याश्या वाटतात, त्याबद्दल विचार करण्यात मन नेहमी मग्न असतं.  म्हणजे अश्या गोष्टी मन कधीच विसरू इच्छित नाही. पण याऊलट मनाला त्रास देणाऱ्या, दुःखं, भोग इत्यादींचा काळ हे सर्व मन कधीच आठवू इच्छित नाही.  आपल्याच आयुष्यातील असे नकारात्मक क्षण वा आठवणी कोणीच पुन्हा मनःपटलाव...

भोग आणि ईश्वर ५२०

भोग आणि ईश्वर  ५२० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  तुमच्या एक लक्षात आलं का की, अर्पण, शरण आणि स्मरण यापैकी, शरण व स्मरण या दोन शब्दांमध्ये रण शब्द समान आहे,  तर अर्पण या शब्दात पण आहे. आता स्मरण या शब्दाकडे वळण्याआधी याचं चिंतन आधी करूया. मग पुढे जाऊया. रण म्हणजे युद्धभूमी, असं क्षेत्र जिथे शत्रूला पराजित केलं जातं. जिथे एखादं संकट वा आपत्ती यांवर विजय मिळवण्यासाठी युद्ध करावं लागतं. म्हणजेच सामना करावा लागतो किंवा दोन हात करावे लागतात.  आता प्रभूची आठवण काढण्यासाठी आणि त्याला सर्व त्यागून लीन होऊन, नतमस्तक होण्यासाठी श रण आणि स्म रण हे शब्द का योजले असतील, त्याचा विचार करूया. श म्हणजे शंकेने व्यापलेले मन जे शत्रूने व्यापलेल्या रणासमान असतं. अश्यावेळी मनातील, जीवनातील बरेचसे प्रश्न असे असतात, ज्यांची उत्तरं प्रारब्ध संचित आणि कर्म यांनाच माहीत असतात आणि बरेचदा प्रश्न हे उत्तराविना सोडवायचे असतात.  याचं कारण म्हणजे, त्यांची  उत्तरं येणारा काळ ठरवणार असतो. म्हणून अश्या रणात आपण अस्त्र शस्त्र कोणतं वापरायचं, हे देखील आपल्याला ज्ञात नसतं. म्हणून अश्या शंकायुक्त र...

भोग आणि ईश्वर ५१९

भोग आणि ईश्वर  ५१९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  शरण जाणं म्हणजे खरंतर, मनाने पूर्ण शून्य होणं. वृत्ती, चित्त, बुद्धी आणि देह यांनी जे माया, विकार, विखार, अवगुण, दुर्गुण, आणि अनिष्ट असं सर्व आराध्याच्या चरणी अर्पण करून, त्यांचा त्याग करणं. सर्वकाही जे त्याज्य आहे ते विधात्याला सोपवून, आपल्याकडे फक्त सद्गुण, सत्शीलता, सदप्रवृत्ती, सद् आचार, यांना आपल्यापाशी ठेवणं, म्हणजे खरं शरण जाणं.  आता आपल्याला आपले दुर्गुण, दुराचार आदि नकारात्मक गुण, दिसतील, जाणवतील व ओळखू येतील, हे संभवत नाही. याचं कारण स्वतःला स्वतःकडे त्रयस्थपणे बघण्याची बुद्धी आणि वृत्ती माणसात अभावानेच आढळते. म्हणजे मग शरण जाताना, ईश्वराला आपण आपले दुर्गुण वा आपल्यातील अनिष्ट गोष्टी त्यागून, कसं काय शरण जाऊ शकतो. म्हणजे शरणागत होताना, नक्कीच हातचं काही राखलं जाईल आणि शरण जाण्याचा योग पूर्णपणे साधला जाणार नाही.  मग यावर काय उपाय योजावा जेणेकरून, शरणागती पूर्ण साधून, जे त्याज्य ते चरणी सोडून, पुढे जाता येईल. यावर साधुसंतांनी उत्तम मार्ग सांगितला आहे. सर्व भाव, सर्व वृत्ती आणि संपूर्ण मन शरण जाताना, ईश्वरा...

भोग आणि ईश्वर ५१८

भोग आणि ईश्वर  ५१८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  ज्याप्रमाणे अर्पण होणं ही खरी आणि योग्य संज्ञा आहे, त्याप्रमाणे, शरण जाणं, ही योग्य स्थिती आहे. खरंतर शरण या विषयावर, अनेकांनी अनेकदा लिहिलंय आणि मी स्वतःदेखील या मालिकेत, याआधी, शरण या विषया वर, विषयानुरूप लिहिलं आहेच. पण आता पुन्हा विषयाला धरून आणि अर्पण, शरण आणि स्मरण या संदर्भात, पुन्हा एकदा लिहिण्याचा मोह आवरता येत नाही.  शरण जाणं, ही कृती किंवा संज्ञा मुख्यतः रणात आपल्यापेक्षा शक्तीवान वा बलवान शत्रूशी युद्ध करताना, पराभूत होऊन, पूर्ण नामशेष होण्याची शक्यता वा वेळ आली असेल, तर अक्कल हुशारीची गोष्ट किंवा डाव पेचांचा भाग म्हणून योजली जाते आणि अवलंबली जाते. यामध्ये मुख्य सूत्र असतं सर्वनाशे समुत्पन्ने. अर्धं त्यज्यती पंडित: म्हणजेच जेंव्हा आणि जिथे किंवा आयुष्यात, रणात ज्यावेळी सर्वनाश होण्याची स्थिती निर्माण होते, त्यावेळी अर्ध्यावर पाणी सोडून देऊन, बाकीचं व जीव वाचवणं, हा पुरुषार्थ किंवा बुद्धीची गोष्ट किंवा उत्तम विचार गणला वा मानला जातो.  म्हणजेच शरण जाणं हे एकप्रकारे काहीतरी वाचवण्या साठी आणि काहीतरी त्याग...

भोग आणि ईश्वर ५१७

भोग आणि ईश्वर  ५१७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  स्वाधीन होणं म्हणजे अर्पण होणं. यामध्ये सर्वात मोठा लाभ हा आहे की, आपल्यातील स्व म्हणजेच ग किंवा आताच्या भाषेत इगो, हा आपण पूर्ण स्वाधीन करतो. कारण अर्पण होणं म्हणजे एखाद्याच्या स्वाधीन होणं, यात मूलभूत गोष्ट म्हणजे आपण स्वतःचं अस्तित्व झुगारुन ज्याला आपण स्वतःला अर्पण करतो, त्याचं अस्तित्व आपल्याजागी मानणं किंवा जाणणं, हे अपेक्षित आहे. किंबहुना आपल्यातील देहाचं अस्तित्व सोडल्यास, मन बुद्धी व आत्मा यांचं अस्तित्वशून्य कल्पून, आपल्या आराध्याच्या अस्तित्वात स्वतःला मिसळून टाकणं म्हणजे अर्पण होणं.  स्वतःचा स्वल्पसुद्धा स्व शिल्लक न राहणं म्हणजे अर्पण होणं. वास्तविकपणे अर्पण हा शब्द सहसा एखादी आवडती गोष्ट आपल्या आराध्याला किंवा ईश्वर वा सद्गुरु यांना वाहणं किंवा भेट म्हणून देणं याला आपण अर्पण करणं असं संबोधतो. पण त्यामध्ये, त्या वस्तूवरील आपला मोह, लोभ, माया वा आसक्ती हे काढून घेऊन, ती वस्तू वा पदार्थ आपण, ईश्वर वा सद्गुरू यांना भेट म्हणून, त्यांच्या चरणी ठेवतो.  ईश्वराचं सगुण अस्तित्व आहे हे गृहीत धरूनच अश्या गोष्टी ...