Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ६

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ६

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥

रामरक्षा स्तोत्राचं पठण करण्याआधी आपण प्रभूंचं ध्यान मनात योजलं. त्यांचं सगुण रूप, सत् चित् स्वरूप कल्पनेत आणलं. आता रामरक्षा स्तोत्राच्या पठणाचा काय परिणाम आहे त्याने काय काय साध्य होणार आहे, यावर प्रकाश टाकताना श्रीबुधकौशिक ऋषी सर्वात प्रथम सुरवात करतात ते प्राज्ञेपासून. रामरक्षेच्या पाठाने प्राज्ञा वृद्धी होते, असा उल्लेख ऋषींवर करतात.

प्रज्ञा म्हणजे बुद्धी किंवा बुद्धीचं सामर्थ्य. प्राज्ञा म्हणजे बुद्धीची खोली, चलाखपणा, चतुराई, बुद्धीचा चतुरस्त्रपणा. यात ब्रूद्धी होते. प्राज्ञा म्हणजे पत ही सामाजिक आत्मिक दोन्ही प्रकारची असू शकते. म्हणजे विचारांची व्याप्ती वाढते. माणूस आत्मकेंद्रित न राहता बाह्यकेंद्रीत होतो. ज्याला आपण विचारांना परिपक्वता येणे म्हणतो ते होतं. माणूस सखोल विचार करू लागतो. असा बहुकेंद्रीत झालेला, विचारांना परिपक्वता आलेला माणूस जीवनाकडे अधिक साक्षीपणे, डोळसपणे बघायला लागतो. जीवनाचा अर्थ, जन्म मरण, पुनर्जन्म याबाबत जास्त गंभीरपणे विचार करू लागतो.  असा मनःचक्षु जागृत झालेला माणूस हा जगताचा वेगळ्या दृष्टीने विचार करायला लागतो. 

अश्या व्यक्तीच्या सर्व पापाचं क्षालन होत. अर्थात त्याच्या पापाच्या अग्नीचा नाश होतो. त्याला कोणत्याही कार्याची चिंता राहत नाही. त्याचं काम आणि दाम हे फक्त रामनाम होऊन जातं. काम हे जीवन जगण्यासाठी आणि उदराच्या निर्वाहासाठी दाम या दोन्हीची चिंता प्रभू वाहतात. याचा अर्थ असा नाही की, त्याला काही करण्याची गरज राहत नाही. परंतु त्याला काम आणि दाम याची चिंता करावी लागत नाही. एक चिंता सुरू होईपर्यंत त्याच्या निर्वाहाची काळजी प्रभूंनी घेतलेली असते. 

आता ही काळजी घेत असताना प्रभू कशाप्रकारे भक्तांना आधार देतात, याबद्दल ऋषींवर सांगतात की, या देहातील प्रत्येक अवयवावर प्रभूंच्या एकेका नामाचा आधार आहे. जणू आपण आपल्याच देहावर एक एक नाम घेत स्वाभिषेक करत आहोत.  या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, शरीराचा एकेक भाग त्यावर एकेका नामाचा वज्रलेप करताना त्या नामाद्वारे रावण वधापर्यंतचं संपूर्ण रामायण संक्षिप्त स्वरूपात श्रीबुधकौशिक ऋषींनी कथन केले आहे. कसं ते पाहूया.

या शिरावर राघवरूप प्रभूंचा वरदहस्त राहो. राघव हे रघुवंशीय स्वरूपाचं प्रतीक असलेलं श्रीरामांचं नामाभिधान. अर्थात इथे श्रीबुधकौशिक ऋषींनी प्रभूंच्या वंशाचा विस्तार कथन केला आहे. भाळावर दशरथात्मज नामे प्रभूंची कृपा राहो. इथे रघुवंशाच्या विस्तारातील प्रभूंच्या तिर्थस्वरूप पिताश्री अर्थात राजा दशरथ यांचा उल्लेख करून त्यांच्या पोटी पुत्ररूप जन्म घेण्यापर्यंतचा कथाभाग अधोरेखित केला आहे. 

या दृष्टीवर, तिच्या आतील तेजावर कौसल्यापुत्र श्रीरामाची कृपा राहो. अर्थात त्या दृष्टीची व्यापकता वाढून जगाकडे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सर्वव्यापक होवो. इथे ऋषींनी पिता दशरथ यांच्या नन्तर त्यांची माता कौसल्या यांच्यामुळे प्राप्त नामाचा उल्लेख करून श्रीरामजन्माच्या कथाभागाला स्पर्श केला आहे.  मौजीबंधनानंतर गुरुगृही जाऊन परत आलेल्या प्रभुना महर्षी विश्वामित्र पुनः राजा दशरथाकडून घेऊन जातात. 

कथेच्या त्या भागाला स्पर्श करताना ऋषींवर म्हणतात की अश्या विश्वामित्रांना प्रिय असणारे प्रभू  माझ्या श्रुतीचं रक्षण करोत. श्रुती म्हणजे फक्त ऐकण्याची शक्ती नाही तर योग्य ते आणि ज्याच्या श्रवणाने या जन्माचं सार्थक होईल असं ज्ञान या श्रुतीच्या कानी पडो. प्रभुराम जे यज्ञत्राता वा यज्ञाचे रक्षणकर्ते आहेत अर्थात मखत्राता आहेत ते माझ्या नासिकांच अर्थात घ्राणेंद्रियांच रक्षण करोत आणि सौमित्रीवत्सल म्हणजेच माता सुमित्रेला प्रिय असलेले प्रभू माझ्या संपूर्ण मुखाचे रक्षण करोत. इथे आपण प्रभूंच्या नामरूपाचा विचार करता करता रामायणाचा काही कथाभाग संक्षिप्त स्वरूपात पाहत आहोत. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग ६ .....    

© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१५/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...