Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ८

 श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ८


 करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

सातव्या श्लोकातील दुसऱ्या ओळीतील उत्तरार्ध आपण आता पाहूया. या श्लोकातील जाम्बवदाश्रयः हा थोडा क्लिष्ट संदर्भ आहे. रामायणात दोन प्रचलित कथा  आहेत. एकानुसार जांबुवंत हा किष्किंधा नगरीतील ज्येष्ठ सल्लागार होते. त्यामुळे वाली वधानंतर वालीचे  सल्लागार सुग्रीवाच्या सल्लागार मंडळात असावे  का (शत्रूचा माणूस म्हणून) असा प्रश्न निर्माण झाला.  त्यावेळी प्रभुनी आपल्या आत्मज्ञानाने जांबुवंतांचा पूर्वइतिहास ओळखून ज्येष्ठ सल्लागार म्हणून महाराज सुग्रीव यांना जांबुवंताना आश्रय देण्यास सांगितले. त्याअर्थाने जांबुवंत (जाम्बवद म्हणजे जांबुवंत या प्राकृत नामाचे संस्कृत नामउच्चारण).  

दुसऱ्या कथेनुसार श्रीराम आणि श्रीलक्ष्मण यांचे सत्य जाणण्यासाठी जांबुवंतानी  सुग्रीवाला सल्ला देऊन हनुमंताला त्यासाठी पुढे पाठवलं आणि श्रीराम श्रीहनुमान भेट घडली. म्हणजेच श्रीरामांना आश्रय देण्यास  व मदत करण्यास काहीही हरकत नाही हा सल्ला जांबुवंतानी  दिला. म्हणून या अर्थाने जांबुवंतांच्या आश्रयास गेलेले. कारण जांबुवंत हे  अनादी काळापासून अस्तित्वात होते. मुळात ब्रह्मदेवांच्या निद्रेवेळी त्यांच्या जांभईतून जांबुवंतांचा जन्म झाला अशी त्यांच्या जन्माची कथा आहे. यात दोन गोष्टी दिसतात. जांबुवंत सुग्रीवासोबत आधीपासून होते आणि प्रभूंचं जन्माचं मर्म जांबुवंत जाणत होते. मला स्वतःला दुसरा पर्याय योग्य वाटतो. याचं कारण  कि,जांबुवंत यांचं अस्तित्व अनादी काळापासून आहे. त्यांना कोणी आश्रय द्यावा इतकं  त्यांचं या जगतातील स्थान वा दर्जा कमी नव्हता. अन्यथा श्रीरामांनी पुढील जन्मात त्यांच्या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार केला नसता वा तसं वचन त्यांना त्रेतायुगात श्रीराम जन्मात दिलं नसतं .

 तिसरा एक अर्थ जो मला स्वतःला फक्त  नमूद करावासा वाटतो तो म्हणजे जांबवं  म्हणजे जांभुळाची झाडे असलेला प्रदेश. जो मुख्यतः महाराष्ट्र आणि खालील दक्षिणेकडील प्रदेश हा आहे. त्यामुळे एक विश्लेषित अर्थ असाही होऊ शकतो कि, सीताहरणानंतर श्रीराम व लक्ष्मण मजल दरमजल करत दक्षिणेकडे किष्किंधा नगरी पर्यंत गेले. या प्रवासात त्यांनी आश्रय फक्त आणि फक्त रात्री मुक्कामाकरता केला असेल म्हणजेच मार्गात कुठेही खोपटं वा राहण्यासाठी काही खास व्यवस्था केली नसेल. कारण प्रत्येक ठिकाणाहून लगेच सीतेच्या शोधार्थ पुढे जात राहणं हाच एक विचार मनात असू शकेल. अश्या वेळी जांबवं अर्थात जांभूळाच्या वृक्षांचा  आश्रय घेतला असू शकेल. कारण जांभळाच्या झाडाचा विस्तार  खूप मोठा असतो व त्याकारणाने त्या वृक्षाची  छाया मोठ्या भूभागावर पडते. ज्यामुळे आश्रयासाठी असा वृक्ष हा योग्य ठरतो. हा माझ्या तर्कानुसार तिसरा अर्थ.  

तर असे जांबुवंताने आश्रय दिलेले वा जांबवं वृक्षाचा  आश्रय घेतलेले प्रभू श्रीराम माझ्या नाभीप्रदेशाचं रक्षण करोत. 

वरील दोन्ही कथांनुसार जांबुवंत व सुग्रीव यांची भेट प्रभूंशी एकाच वेळी झाली असेल. म्हणजेच श्लोकात म्हटल्याप्रमाणे आधी जांबुवंत आणि नन्तर सुग्रीव हे थोडं संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे जांबवं म्हणजेच जांभूळ वृक्षाचा आश्रय घेत घेत सुग्रीवाशी भेट झाली आणि त्यानंतर पुढील वाली वध घडून आला. तर असे हे सुग्रीवाचे ईश अर्थात दैवत वा भगवंत असलेले श्रीराम  माझ्या कटिबंधाचे रक्षण करोत. इथे अजून एक तार्किक अर्थ निघू शकतो कि, या स्थानी प्रभू व सुग्रीव सीताशोधाकरता कटिबद्ध वा वचनबद्ध झाले. म्हणून कटिबंध या शरीराच्या वरील व खालील दोन भागांना जोडणाऱ्या अवयवाचे रक्षण सुग्रीवाशी मैत्रीसाठी कटिबद्ध श्रीराम करोत. 

हनुमंत हा श्रीरामांचा अत्युच्च दर्जाचा वा परमपदी पोहोचलेला दास आणि त्या अर्थाने श्रीराम हे त्याचे स्वामी. प्रभू या शब्दाच्या अनेक अर्थांपैकी  मुख्य अर्थ म्हणजे स्वामी हा आहे. असे हे हनुमंताचे स्वामी अर्थात हनुमत्प्रभुः म्हणजेच प्रत्यक्ष श्रीराम माझ्या सर्व हाडांचं अर्थात शरीराच्या मुख्य शक्तिस्थानांचं रक्षण करोत. राक्षसकुळाचा नाश करणारे रघुकुळोत्तम , रघुकुलदीपक फुफुसांचं रक्षण  करोत. इथे समस्त रघुकुलातील श्रेष्ठ हा उल्लेख मुद्दाम आलेला आहे. कारण शरीराच्या समस्त अवयवांमध्ये फुफुस्साच महत्व सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात वेगळं सांगायची गरज आहे असं वाटत नाही. म्हणून अश्या सर्वोत महत्वाच्या अवयवयाची रक्षा करताना प्रभू श्रीराम यांचं रघुकुलश्रेष्ठ हे नामाभिदान किती दूरदृष्टीने वापरलं आहे याचा प्रत्यय सध्या आपल्याला येतो आहे. म्हणून त्या फुफुस्साची कार्यक्षमता उत्तम राहावी आणि शुद्धता टिकून राहावी म्हणून रघुकुलदीपक यांचं श्रीरघुवीर हा  नामजप करून बघायला हरकत नाही, असं माझं मत आहे. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग ८ .....    

© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१७/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...