Skip to main content

कन्हैयालाल माणेकलाल तथा के. एम. मुंशी

 कन्हैयालाल माणेकलाल तथा के. एम. मुंशी (३० डिसेंबर १८८७ ते ८ फेब्रुवारी, १९७१)

नेहरूंनी बळी घेतलेल्या अनेक व्यक्तिमत्वांमध्ये कुलपती कन्हैलाल माणेकलाल तथा के. एम. मुंशी यांचा नंबर सरदार पटेल, सुभाषबाबू यांच्या नंतर बराच वरचा लागतो. नेहरूंची  राजकीय महत्वाकांक्षा, सत्तालोलुपता आणि त्या अनुषंगाने येणारी अपरिहार्यता याचे अनेक जण बळी ठरलेत. पण के. एम. मुंशी हे यातील अग्रणी नाव असण्याचं कारणच वा पातकच  तसं आहे.  ते म्हणजे उध्वस्त झालेलं सोमनाथ मंदिर बांधण्याचं महत्तम कार्य त्यांनी नेहरूंचा विरोध असताना आणि सरदार पटेल यांच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करून सरदार पटेल यांच्या आत्म्याला मरणोत्तर सद्गती प्रप्त करून दिली. कारण या मंदिर उभारणीच्या कार्याला सरदार पटेल , मुंशीजीं आणि त्याच्या प्राणपतिष्ठापनेच्या कार्याला तात्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या भूमिकेला नेहरूंनी प्रचंड विरोध करून हे काम न होऊ देण्यासाठी त्यावेळी आकाशपाताळ एक केलं होतं . तरीही सरदार पटेलांच्या पश्चात ते पूर्ण झालं याचं खूप मोठं श्रेय मुंशीजींना जातं . 

या सोमनाथ मंदिरासंदर्भात त्यांनी नेहरूंना लिहिलेल्या एका पत्राचा काही अंश मुद्दाम उद्धृत करत आहे, जेणेकरून मुंशीजीं कोणत्या मुशीतून तयार झाले होते आणि ते तसे होते म्हणूनच ते नेहरुंपुढे टिकू शकले, हे लक्षात येईल. त्याचबरोबर ते तसे होते म्हणूनच निदान  सुल्तानशाहीने उध्वस्त केलेलं एकतरी मंदिर आपल्याला स्वतंत्र भारतात उभारता आलं आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या कार्यकतृत्वामुळे दुसरं मंदिर उभं राहण्याचं स्वप्न पूर्ण होईल. यावरून विचार करा आपल्याच देशात आपल्याला आपल्याच धर्माचं प्रतीक असलेलं एखादं मंदिर उभारणं किती दुरापास्त आहे वा तसं ते दुरापास्त करण्यात आलंय, नपुंसक धर्मनिरपेक्षता, या विषप्राय शब्दाने. 

मुंशीजीं लिहितात. 

"माझी ;भूतकाळाप्रती असलेली आस्था आणि श्रद्धा मला, माझ्या आजच्या जगण्यासाठी  बळ देतं आणि उज्वल भविष्यकडे पाहण्याची प्रेरणा देते. जे स्वातंत्र्य मला  माझी भगवद्गीता, माझ्या श्रद्धा, स्वधर्माप्रती माझा अभिमान विसरून जगण्यातील निखळ आनंद हिरावून घेत असेल तर अश्या स्वातंत्र्याची किंमत माझ्यालेखी शून्य आहे. हि पुण्यमय अशी वास्तू तिच्या साजेश्या ऐतिहासिक उंचीला नेऊन पुनर्स्थापित केल्यानंतर,  लोकांना पवित्र धर्माचं महत्व आणि त्यायोगे धर्माबद्दलची आस्था आणि जाणिवा पुनर्स्थापित करेल, असा मला विश्वास वाटतो. "

स्वातंत्र्यनंतर बदलत असलेल्या सत्तालोलुप , सनातन धर्मविरोधी आणि नपुंसक धर्मनिरपेक्षतेचा ढोल पिटणारी नेहरूंची व त्यांच्या बगलबच्च्यांची मानसिकता हि पुढील काळात सनातन धर्माला जाचक आणि मारक ठरणार, त्याचप्रमाणे ती पुढील काळात फक्त हिंदू धर्माला कशी घातक ठरणार, हे मुंशीजीं त्याचवेळी जाणून होते.  हे घातक रसायन येत्या काळात हिंदू  धर्मप्रती आस्था , श्रद्धा , अपेक्षा या कमकुवत करणारं, विष ठरणार हे  जाणूनच त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार श्री रमेश चंद्र तथा आर सी मजुमदार यांना   सनातन भारताचा समग्र इतिहास लेखणीबद्ध करायला सांगितलं. ज्याचा मान ठेवून श्री मजुमदार यांनी  "The History and Culture of Indian People " हा  ११ खंडांचा इतिहास शब्दबद्ध केला. ज्याचा शेवटचा अर्थात ११वा खंड १९७७ साली प्रसिद्ध झाला. स्वतः मुंशीजीं १९७१ साली कालवश झाले. परंतु पहिल्या खंडाची प्रस्तावना त्यांनी लिहिली. त्यात ते असं म्हणतात. 

"मला बरीच वर्ष वाटत आलय कि, आपला  लिखित इतिहास हा खूप त्रोटकपणे वा पुरेश्या विस्ताराने कधीही लिहिला गेला नाहीये. मी स्वतः बरीच वर्ष हा इतिहास शब्दबद्ध करून खरी भारतीय संस्कृती व तिचा जाज्वल्य इतिहास हा भारतीयांच्या नजरेतून मांडणार होतो. जो वाचून जगाला सनातन भारताचा खरा आत्मा कसा आहे हे जाणवेल. भारताचा इतिहास हा त्यावर झालेल्या आक्रमणाचा नसून त्याविरुद्ध  यशस्वीपणे लढून त्या आक्रमणांना कसं परास्त केलं हा आहे. हा खरा इतिहास असेल. तो येथील लोकांचा खरा चेहरा जगाला दाखवेल. हा इतिहास असा शब्दबद्ध असावा जो येथील लोकांचं प्रत्येक काळातील आयुष्य दाखवेलच परंतु त्यांच्या झालेल्या शोषणातून एतद्देशीयांना कशी प्रेरणा मिळत गेली. खरंतर लोकांचं त्या त्या काळातील आयुष्य, त्यांची जगण्याची मूल्य आणि प्रेरणा यांचं  सखोल मूल्यमापन हे इतिहासात मांडलं गेलं पाहिजे, मला ते अभिप्रेत आहे. त्याचा एकत्रित अभ्यास करून त्यांची  प्रेरणास्थानं , अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची  मानसिकता मांडली गेली पाहिजे. असा इतिहास खरंतर अजून लिहिला जायचा आहे. कारण इतिहास म्हणजे फक्त घटना नसून त्यामागची कारणं, प्रेरणा व जनमानसिकता यांचा अभ्यास आहे, असं मी मानतो. "

आज  बहात्तर ते त्र्याह्यात्तर वर्षांनीसुद्धा  जाणवतं की, मुंशीजींचे शब्द अजूनसुद्धा खरे आहेत. आपल्या इतिहासाची राजकीय कारंणानी आणि चुकीच्या व्यक्तींच्या हातात तो पडल्यामुळे, त्याची  चुकीची मांडणी, त्यातील जाणूनबुजून केलेल्या चुका, मुद्दाम त्यात ठेवलेल्या त्रुटी, चुकीच्या दृष्टिकोनातून त्याची मांडणी हे सर्व पाहिलं कि, काळाची पावलं वेळेत ओळखलेले मुन्शीजी किती द्रष्टे होते हे जाणवेल. इतिहास खऱ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने मांडण्याचा त्यांचा संकल्प अजूनही अपूर्ण आहे हे लक्षात येतं. विशेषतः रोमिला थापर यांच्या सारख्या डाव्या विचारांच्या आणि विषारी उद्देश डोळ्यापुढे  ठेवलेल्या व्यक्तींनी, चुकीचा इतिहास चार ते पाच दशकं भारतीयांना शाळा पातळीवर अभ्यासाला लावायचा प्रयत्नपूर्वक केलेला प्रयास हा याच प्रकल्पाचा भाग आहे, ज्यांना इथला खरा इतिहास व लोकांचा खरा चेहरा आणि खरी संस्कृती यांची ओळख पुढील पिढ्यान करून द्यायची नव्हती. जेणेकरून जर खरा इतिहास लोकांना समजला तर तो पुढील अनेक पिढयांना प्रेरणादायी ठरेलच पण देशाचे लचके तोडून तो अजून कमकुवत करण्याचे आपले मनसुबे यशस्वी होणार नाहीत हि गोष्ट तथाकथित डावे व छद्मी धर्मनिरपेक्ष जाणत होते. 

कारण भारताचा हजारो वर्षांचा इतिहास हा नक्कीच प्रेरणादायी आहेच, पण त्यामुळे सनातन धर्माची पकड जनमानसात अजून मजबूत होईल, हे नक्कीच. याच कारंणाने जाणूनबुजून शालेय इतिहास लिहिण्याचं व तो मांडण्याचं काम प्रथमपासून डाव्या विचारसरणीच्या हातात ठेवलं गेलं. या सर्व पार्श्वभूमीवर मुंशीजीं यांचे विचार किती योग्य होते आणि काळाच्या किती पुढे होते. याच कारणासाठी त्यांचं, सोमनाथ उभारणीतील , पटेलांच्या प्रेरणेने केलेलं कार्य हे  सिंहाचं आहे नव्हे अमूल्य आहे. कदाचित सरदार पटेल जर अजून काही काळ जीवित असते तर मुंशीजींच्या साथीने त्यांनी नक्कीच अजून काही मंदिरं पुनर्स्थापित केली असती. कदाचित रंगमंदिर त्याचवेळी झालं असतं. 

अश्या ज्ञानी, कणखर आणि दृष्ट्या कन्हैयालाल माणेकलाल  तथा के एम मुन्शी यांना विनम्र अभिवादन.  

https://en.wikipedia.org/wiki/Kanaiyalal_Maneklal_Munshi

©® संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले 

०८/१०/२०२०


 

 

 









Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...