Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ९

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ९

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

सुग्रीव मैत्री , वालीवध इथपर्यंतचा कथाभाग संक्षिप्त स्वरूपात पाहिला. आता सीता मातेच्या शोधार्थ व सुटकेसाठी निघालेलं नर आणि वानर यांचं सैन्य रामेश्वर इथे येऊन थांबलं. आता हनुमंत सोडून बाकी कुणीही समुद्र उल्लंघून लंकेमध्ये जाऊ शकत नव्हतं. प्रभू स्वतः लक्ष्मणा सह हनुमंताच्या मदतीने लंकेत जाऊन रावणासह सैन्याला परास्त करून आपलं कार्य सिद्ध करून परत येऊ शकले असते. कारण दंडकारण्यात खर व दूषण यांचा १४००० सैन्यासह वध करण्याचं कार्य एकट्या प्रभू श्रीराम यांनी केलं होतं.

परंतु मैत्री मित्रता , वानरांचा उत्साह, शारीरिक व मानसिक क्षमता व बल यांसह, त्यांचा या कार्यातील सहभागाचा संकल्प, यांना प्रभू वाऱ्यावर सोडू शकत नव्हते. किती चिंतनशील विचार होता. म्हणून समस्त वानरसेनेसह लंकेत जाण्याचा मार्ग मिळावा म्हणून तीन दिवस समुद्रदेवतेची आराधना तद्नंतर उग्ररुप आणि त्यायोगे सेतूचा मार्ग हे सर्व प्रभुलीलेने घडवून आणून सेतुबंधनापर्यंत कार्य सिद्ध करून घेतलं. यात लीला यासाठी की, सर्व चरचराचे स्वामी, काहीही अशक्य नाही, तरीही मानवी जन्माच्या मर्यादेत राहून सर्वांचा सहभाग घेऊन कार्य सिद्ध करावं हा मूलमंत्र त्यांनी दिला, यासाठी ही लीला.

तर असे हे सेतुकर्ते प्रभू श्रीराम माझ्या जननेंद्रियाचं रक्षण करोत. इथे एक गोष्ट जी श्रीबुधकौशिक ऋषींच्या बुद्धी चातुर्याची सांगता येईल की, जननेंद्रिय हा मानवी देहाच्या कटीवरील व कटीखालील भागांना जोडणारा वा सेतूसमान इंद्रिय आहे. म्हणून सेतुबंधनाचा कथाभाग या इंद्रियांच्या उल्लेखाशी जोडून उत्तम योग साधला आहे. 

शरीराचा खूप महत्वाचा अवयव म्हणजे जांघा अर्थात मांड्या.  कारण शरीराचा पूर्णभार हा गुडघे या सांध्यावर अवलंबून असतो. परंतु जर मांड्यामधील स्नायू पुरेसे ताकदवान नसतील तर हा भार गुडघ्यांना सहन न होऊन पुढे गुडघेदुखी सुरू होते. तो भार हलका रहावा यासाठी मांड्या पुरेश्या शक्तीवान असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे, प्रभूंनी अवताराचं खूप महत्वाचं कार्य म्हणजे रावणवध केला. हा रामकथेतीलसुद्धा महत्वाचा भाग. म्हणून दशमुख रावणाचा अंत करणारे प्रभू श्रीराम माझ्या देहातील या महत्वाच्या अवयवाचं रक्षण करोत. 

इथे एक संदर्भ देऊ इच्छितो. महाभारतात सर्वात क्रूर, दुराचारी असलेला दुर्योधन याला श्रीकृष्ण अवतारातील प्रभूंनी भिमाकरवी मांड्या फोडूनच संपवलं होतं.  म्हणजेच या अवयवाची महती स्पष्ट होते. कुठेतरी या दोन संदर्भांची तुलना श्रीबुध कौशिक ऋषींना सुचवायची नसेल ना असा एक चिंतनशील विचार डोकावला. 

गुडघ्याखालील भागाला पाद अर्थात पाय अस संबोधलं जातं. त्यांची कार्यक्षमता तितकीच महत्वाची आहे. त्याचप्रमाणे महत्वाचा सहभाग रामकथेत, विभीषण यांचा आहे. रावण वधासाठीचं खूप मोठं गुह्य विभीषणामुळे प्रभूंना ज्ञात झालं आणि रावणवध साध्य झाला. अश्या या शरण आलेल्या शत्रूच्या सख्ख्या  भावावर प्रभू आणि हनुमंत यांनीच विश्वास ठेवला. 

प्रभूंचा विश्वास सार्थ करण्यासाठी कुलनाशक हा आक्षेप सहन करूनसुद्धा विभीषणाने प्रभूंना सहाय्य केलं. त्या बदल्यात प्रभूंनी विभीषणांना लंकेचं राज्य प्रदान करण्याचं वचन दिलं. असे विभीषणांचे ऐश्वर्यदाता प्रभू माझ्या पदाचं अर्थात पायांचं रक्षण करोत.  इथे नवव्या श्लोकाची समाप्ती होत आहे, नवव्या भागात. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग ९ .....    
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१८/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...