Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १५

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १५

रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम्‌ ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम्‌ ।
वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥२६॥

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥

श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥ 

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥

सविसाव्या श्लोकातील पुढच्या दोन ओळी आपण जाणून घेत आहोत. 

राजेन्द्रं. सर्व राजांचा राजा अर्थात ज्यांनी अश्या राजाचं सार्वभौमत्व मान्य केलं आहे, असा राजा म्हणजे राजेंद्र.  हे इहलोकीच्या अर्थाने आणि स्वर्गलोकी सर्व देवांचा राजा इंद्र तो देखील भगवंताचं प्रतिरूप या अर्थाने श्रीराम हे राजेंद्र. 
सत्यसंधं. सत्य म्हणजे जे मिथ्या नाही ते, जे परिस्थितीला धरून आहे ते, ज्यात असत्याचा अंश किंचितमात्र नाही ते. अश्या सत्याशी बांधलेले, त्या सत्याशी संधी केलेले,  सत्यावर श्रद्धा, विश्वास, आस्था, प्रेम, दृढनिष्ठा असलेले, असे श्रीराम. 

दशरथ राजाच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आले म्हणून दशरथतनयं. श्याम वर्णीय प्रभू श्यामलं. अत्यंत शांत धीरगंभीर असे श्रीराम, संयमी असे श्रीराम. लोकांना जनांना अभिराम म्हणजे सौख्य , आनंद देणारे प्रभू श्रीराम. ( इथे लोकभिरामं असा शब्द आहे.)  राघूकुलतिलक म्हणजे राघूकुलाचा मुकुटमणी ठरलेले, राघव म्हणजे रघु राजाच्या वंशातील श्रेष्ठ. रावणाचे अरी म्हणजे शत्रू. ते तर जीवनकार्य होतं प्रभूंचं. आता या श्लोकांचा पूर्ण अर्थ बघूया. 

लक्ष्मणाचे पूर्वज, रघुवीर, सीतापती, अत्यंत सुंदर, काकुस्थ, करुणेचे सागर, गुणांचा समुच्च संचय, विप्रजन ज्यांना प्रिय आहेत, धार्मिक वृत्तीचे, राजेंद्र, सत्यनिष्ठ, दशरथांचे पुत्र, श्यामवर्णी, शांत धीरगंभीर, लोकांना सौख्यप्राप्ती करून देणारे, राघूकुलतिलक, राघव व रावणाचे शत्रू अशा अनेक नामांनी ओळखले जाणारे प्रभू श्रीराम  यांना मी वंदन करतो. या सविसाव्या श्लोकाचं एक वैशिष्ट्य सांगतो यातील प्रत्येक शब्दावर अनुस्वार आहेत अथवा म् ने प्रत्येक शब्दाचा शेवट होतो, कारण ही सर्व रामांची गुणविशेषणं आहेत.

सत्तावीसाव्या श्लोकात ऋषींवर म्हणतात की, श्रीराम जे एक कल्याणकारी शक्तीस्वरूप आहेत, जे परम शांतिधाम आहेत जे सत् चित् आनंदमय आहेत, जे स्वयं वेधसे अर्थात परब्रह्म आहेत, जे रघुवंशाचे शिरोमणी अर्थात नाथ आहेत, जे सीतेचे पती आहेत अश्या प्रभू श्रीरामांना मी वंदन करतो. 

अठ्ठावीसाव्या श्लोकात राम हा शब्द सोळा वेळा नाम स्वरूपात आणि दोन वेळा विशेषण रुपात आला आहे. म्हणजेच या एका श्लोकात अठरा रामनाम घेतल्याचं पुण्य मिळतं. हे रघुनंदन अर्थात रघुराजाच्या वंशातील पुत्ररूप श्रीराम, हे भरताचे अग्रज अर्थात ज्येष्ठबंधू श्रीराम, हे रणांगणी वीररूप गर्जना करत दैत्यांवर , दुष्टशक्तींवर तुटून पडणारे श्रीराम मी आपल्याला शरण आलो आहे. भवचा अजून एक अर्थ जा म्हणजे शरण जा. 

एकोणतीसाव्या श्लोकात प्रभू श्रीराम यांच्या भक्तीची, उपासनेची पद्धती कशी असावी याचं वर्णन ऋषींवरानी केलं आहे. जे नित्य श्रीरामरक्षा स्तोत्र पठण करतात त्यांना माहीत असणार की या श्लोकापर्यंत मन या पठणात पूर्ण एकाग्र झालेलं असतं. म्हणून अश्या साधकांच्या भावावस्थेचं यथार्थ वर्णन यात करून त्याचा आदर्श नित्य पठण न करणाऱ्यांनी ठेवावा हा उद्देश त्यामागे असावा. भजता भजता या स्थितीत भाविक म्हणतो: 

मी शुद्धस्वरूप पूर्णरुप मनाने श्रीरामचंद्र यांच्या चरणांचं स्मरण करतो. मी सात्विक वाणीने चारही वाणी एकत्र करून श्रीरामचंद्र यांच्या चरणांचं गुणगान करतो. मी पूर्ण एकाग्रतेने काया आत्मा यांसह श्रीरामचंद्र यांच्या चरणी शीश नमतो. मी सर्व समर्पण करून शरणागत होऊन श्रीरामचंद्र यांना शरण जातो. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग १५.....    
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
२५/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...