Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) १

गोग्रासवाडी (डोंबिवली) १

जुनी डोंबिवली या माझ्या लेखमालेत आज माझं लहानपण जिथे गेलं त्या गोग्रासवाडीबद्दल

वयाची पहिली २० वर्ष जिथे काढली म्हणजेच लहानपणाच्या सर्व आठवणी जिथे दडलेल्या आहेत. ती वाडी म्हणजेच गोग्रासवाडी. त्यावेळी डोंबिवली बाहेर असलेली, निसर्ग सौन्दर्याने परिपूर्ण अशी वाडी म्हणजेच गोग्रासवाडी. जिथे एकेकाळी म्हणजे साधारण १९३६ मध्ये गोपालकृष्ण या प्रभातच्या बोलपटाच जवळ जवळ संपूर्ण चित्रीकरण झालं होतं (तिथल्या एका गोठ्यावर तसा संगमरवरी दगड त्यावेळी तरी होता.  ज्यावर १९३६ मध्ये प्रभात चित्र मंदिराने चित्रीकरणाला जागा दिल्याबद्दल  रु.२०००/- देणगी दिल्याचा उल्लेख होता) .   जिथे पूर्वी मुंबईतून लोक हवापालटाला येत असत. 

मुळात आज हे सर्व आठवण्याचं कारण, आजच संध्याकाळी गोग्रासवाडीतल्या शनीमंदिरात गेलो होतो. काही काळ तिथे  मंदिराच्या पायरीवर बसलेलो असताना, गत काळाच्या आठवणी स्मृतिपटलावर फिरल्या आणि मन अचानक कित्येक वर्षे मागे गेलं.

जिथपासून मला आठवतंय तिथपर्यंत मागे गेलो. त्यावेळी संत नामदेव पथावर जिथे एक गेट वा कमान होती, तिथे साधारण गोग्रासवाडी सुरू व्हायची. तिथून आत आलं की दोन्ही बाजूला मोकळा भाग साधारण शेती असल्यासारखा पण त्यावर झाडी उगवली होती आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी ४,५ झाड होती.  त्यांनतर डाव्या हाताला राधानिवास ही चाळ. त्याच्यासमोर लोकमान्य गोग्रास भिक्षा संस्थेचा फलक असलेलं गेट. त्यातून आत गेल की उजव्या हाताला संस्थेची कचेरी आणि तिथेच त्यामागे असलेल्या एका घरात एक गुजराथी कुटुंब राहात असे. त्यावर संस्थेचा हॉल होता . ज्यामध्ये कधी कधी छोटे मोठे कार्यक्रम होत असत.

त्याकचेरीला लागूनच   ३,४ घर असलेली छोटी चाळ होती. त्यात पहिल्या बिऱ्हाडात राजा जोशी हे गुरुजी म्हणजे पूजाअर्चा सांगणारे राहात होते. त्यांच्याच शेजारी एखाद्या बाबांसारखी दाढी, मिशी व डोक्यावर केस असलेले म्हातारेसे, म्हणजेच वय झालेले आणि संस्थेने नेमलेले व संस्थेच्या मंदिरात पूजा करणारे पुजारी राहात होते. हे उत्तरप्रदेशी होते.

इथून पुढे श्रीकृष्णाच मंदिर होत, म्हणजेच अजूनही आहेच. जिथे गायीचा गोठा होता. म्हणजे गोठा आणि मंदिर एकत्र होत असे म्हटल तरी चालेल. मंदिर बऱ्यापैकी मोठं होत.  आत अंदाजे ७,८ गायी होत्या. २ मोठे आणि जुळे वाटतील असे  बैल होते. त्यांची नावं केशव माधव होती. याच मंदिरात लहान असताना , खेळताना, शाळेतून येता जाता वा सहजसुद्धा अनेक वेळा गेलो आहे. त्या मंदिरात शिरतानाच गायींच्या शेणाचा एक सुंदर वास येत असे. सुंदर यासाठी की, मला स्वतःला हा वास कुठेही आला तरी, या मंदिराची आठवण जागी करतो.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
३०/०७/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...