Skip to main content

मुरली - ४९

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ४९

देवर्षी नारदांची कळकळीची साद ब्रम्हदेवांपर्यंत पोहोचली आणि ब्रह्मदेवानी ब्रम्हलोक सोडून मर्त्यलोकी पृथ्वीवर आगमन केलं आणि नारदांसमोर प्रकट होऊन म्हणाले.

"हे माझ्या मानसपुत्रा नारदा, वत्सा, का स्मरण करत होतास माझे आणि ते देखील इतक्या आर्ततेने की मला यावेच लागले, त्वरित. सर्व सकुशल तर आहे ना मर्त्यलोकी.  प्रत्यक्ष श्रीकृष्णरूपात महाविष्णू स्वतः असताना तू मला का स्मरत होतास. सांग वत्सा. काय समस्या आहे जिच्या निराकरणासाठी तुला माझी आठवण काढावी लागली. "

"हे देवा ब्रम्हादेवा सर्वप्रथम माझा प्रणाम स्वीकारावा."

" शुभाषिश नारदा"

"प्रत्यक्ष श्रीविष्णू माझे आराध्य इथे असताना आपल्याला बोलावण्याचे धाडस केले, कारण त्यांच्या संदर्भात समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी आपली मदत हवी आहे. म्हणून आपला धावा केला."

" समस्या म्हणजे काही नवीन घोळ घातला नाहीस ना, की जो निस्तरण्यासाठी माझं सहकार्य गरजेचं आहे. निःसंकोच पणे बोल. "

"हे पिताश्री आपण जाणताच आणि आपण त्रिकालज्ञानी आहात. आपण श्रीकृष्ण आणि राधा यांच्या भक्तीस्वरूपा बद्दल ऐकले असेलच. तर आता श्रीकृष्ण मथुरा व गोकुळचा त्याग करून दूर देशी द्वारकेला स्थायिक झालेत.  त्यामुळे राधा विरहाने व्याकुळ आहे.  तिची श्रीकृष्णांच्या प्रस्थानापूर्वी शेवटची भेटसुद्धा होऊ शकली  नाही. त्यामुळे ही व्याकुळता अजून गहिरी झाली आहे.

यात अजून एक समस्या अशी की स्वप्नात राधेने पुनर्भेटीपर्यन्त एक वचन मागितलं, यदुवीरांकडे.  त्यांनी ते दिल सुदधा."

" वचन काय आहे आणि यात समस्या ती काय आहे."

" सांगतो, पिताश्री. वचन हे की पुनः भेट होत नाही तोपर्यंत श्रीकृष्णांच्या मुरलीचे तीन स्वर अनुक्रमे गंधार , पंचम आणि धैवत हे राधेकडे राहतील. त्यामुळे भेट नाही तोपर्यंत स्वर नाहीत आणि स्वर नाहीत तो पर्यंत यदुवीर आपली प्राणप्रिय बासरी वाजवू शकणार नाहीत. म्हणजेच दोन्ही प्राणप्रिय गोष्टी  मुरलीचे स्वर आणि राधा श्रीकृष्णांपासून दूर. यामध्ये एका भक्तांची मदत करण्यास दुसरा भक्त धावून गेला तर त्याला अटकाव करण्यात आला आणि राधेला यातील काहीही सांगण्यास मज्जाव करण्यात आला. ही दुसरी समस्या. सांगा पिताश्री काय करू मी. "

" नारदा इतक्या लहान समस्येकरता तू मला आवाहन केलंस."

" पिताश्री यात पेच असा आहे की राधेला हे सांगण्यापासून मला अटकाव केलाय श्रीकृष्णांनी. आणि स्वयेसद्धा जाणार नाहीत भेटीस, कार्यव्यस्ततेमुळे. म्हणजे एका भक्ताला किती त्रास होत असेल हे माझ्यासारखा दुसरा भक्तच समजू शकतो. आता यात आपण माझं मार्गदर्शन करावं, श्रीब्रम्हदेव."

" खूपच सहज आहे या पेचाची उकल."

" ती काय , स्वामी ."

"तू राधेला प्रत्यक्ष सांगू शकत नाहीस. पण तू राधेला हे तर सांगू शकतोस ना"

अस म्हणून श्रीब्रम्हदेवानी नारदाना काय केलं तर पेच सुटेल हे सांगितलं. श्रीब्रह्मदेवांचं उत्तर ऐकून अलोट आनंदाने नारदांनी श्रीब्रम्हादेवांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाले

" इतकं सहज आणि सुटसुटीत उत्तर असून मला कस सुचलं नाही."

त्यावर श्रीब्रम्हदेव म्हणाले

" हे नारदा जेंव्हा व्यक्ती समस्येकडे एक समस्या म्हणून पाहतो तेंव्हा त्यात अडकून उत्तराजवळ पोहोचत नाही. पण उपलब्धी म्हणून पाहिल्यास उत्तर शोधणं अवघड नसत. "

" अस आहे तर. धन्यवाद आणि क्षमस्व श्रीब्रम्हदेव. आपण माझं लक्ष खूप सहजसाध्य केलंत. आभारी आहे आपला. मी यशस्वी व्हाव असा आशीर्वाद द्यावा प्रभू."

श्रीब्रम्हदेव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले.

इकडे नारदांनी त्वरेने गोकुळीं प्रस्थान केले आणि राधे समोर प्रकट झाले.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...