मनाचा आपल्याशी आणि आपला मनाशी संवाद भाग ५
"तुझी ताकद इतकी अचाट आणि अफाट आहे. "
" हो. पण या ताकदीचा अंदाज तुला तेंव्हाच येईल जेंव्हा तू माझ्या पूर्ण क्षमतेबद्दल जाणून घेशील. ते हळू हळू कळेल तुला. आता तुला मनाशी कस बोलावं आणि मन आपल्याशी कस बोलू शकत, म्हणजेच मी तुझ्याशी आणि तू माझ्याशी कस बोलू शकतो हे पाहायचय. माझा आवाज कसा ओळखू शकतोस हे जाणायचय. जेंव्हा एकादा विचार मनात येतो, त्यामागोमाग अस जाणवत की कोणीतरी आपल्याशी बोलतंय. आपल्याला काहीतरी सांगतंय. या स्थितीला तुला जायचय.
पण हे तेंव्हाच कळेल, जेंव्हा तुला तुझा आवाज ऐकण्याची सवय जडेल. त्यासाठी शांत बस, स्वस्थपणे, आरामात, कोणत्याही स्थितीत वा posture मध्ये जी तुला आरामदायक म्हणजेच comfortable असेल. ती स्थिती इतकी नैसर्गिक असावी की त्याला जागेचं वा आसनाच बंधन नाही. अगदी आरामखुर्चीत सुद्धा बसून हे तू करू शकतोस. कारण जितकी शारीरिक स्थिती सुटसुटीत तितकं पुढच काम सोप्प होईल. हे केल्यानन्तर पुढची स्टेप.
डोळे मिटून घे, गच्चपणे नको अगदी हलके. कोणी असेल वा नसेल आजूबाजूला, त्याकडे लक्ष देऊच नकोस. आता पूर्ण लक्ष आत घे स्वतः मध्ये शिरण्याचा प्रयत्न कर, कल्पनेनेच. या स्थितीत बरेच विचार तुला डिस्टर्ब करतील, तसा प्रयत्न होईल. कदाचित काही काही दिवस शरीरसुद्धा डिस्टर्ब करेल.
सुरवातीला जमेल तितकाच वेळ बस, पण प्रयत्न सोडू नकोस. कारण एक ध्यानात ठेव, मानवी शरीरपेक्षाही मानवी मनाला या जगात अशक्य अस काहीही नाही. एक उदाहरण देतो. मारुतीकडे अंगात अफाट आणि अचाट सामर्थ्य होतं. परंतु हे त्याच्याच विस्मरणात म्हणजेच सुप्त मनात होतं. ज्यावेळी ते त्याच्या मनावर बिंबवलं गेलं, त्यावेळी त्याला ते आठवत गेलं आणि मग त्याची ताकद वा शक्ती त्याला कळली , जाणवली, उमगली आणि मग उपयोगी आली पुढील सर्व कार्यात. म्हणजेच आधी मनात आलं, मनाने घेतलं आणि पुढे शरीराने कार्य केल.
म्हणून काही दिवस नेटाने पण जमेल त्या शारीरिक स्थितीत काही वेळ शरीर व त्याद्वारे मन शांत करण्याचा प्रयत्न कर. हळू हळू होईल हे. हे जमायला लागेल त्या नन्तर अगदी शांत पणे आपला आतला आवाज ऐकायचा प्रयत्न सुरू कर. सुरवातीला खूप गल्लत होईल, गोंधळ होईल, कदाचित कळणार नाही हा आपला आवाज आहे की विचारांच ट्रॅफिक जाम.
होऊ दे कोणत्याही विचाराला थांबवू नकोस , पण कोणत्याही विचारामागे धावू पण नकोस. अत्यंत शांतपणे रोज हा अभ्यास कर. हे थोडं योगाभ्यास वा प्राणायाम या सारख वाटेल. पण त्यास्थितीला आपल्याला जायचं नाहीये. म्हणून शांत होणं हाच उद्देश सध्या ठेवून हे सुरू कर. मग पुढच सांगतो, हे साधल्यावर. मुख्य गोष्ट ध्यानात ठेव. विचारांची गती थांबवण्याचा आता प्रयत्न करू नकोस, ते घातक होईल. कारण अजून तू त्या स्टेज ला पोचला नाहीयेस. फक्त काय काय विचार येतात त्यावर लक्ष ठेव, नियंत्रण नाही. गुड लक मित्रा."
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
०१/०७/२०१८
१६:३१
Comments
Post a Comment