Skip to main content

ज्ञानयोग १

ज्ञानयोग १

llश्रीगणेशाय नमःll ज्ञानोबा माऊली तुकारामllश्रीगुरुवे नमःll

ज्ञानाचा सागर आणि संतांचे मेरुमणी वैष्णवांची माऊली संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज आणि मुकुटमणी संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराज यांना साष्टांग दंडवत घालून आणि माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना प्रणिपात करून एका नवीन विषयाला सुरवात करतोय. माऊलींच्या ओव्यांचा मला जाणवलेला गर्भित अर्थ. खूप मोठा विषय आहे. अनेक विद्वानांनी खूप काही लिहिलंय. तरीही त्यावर अजून कित्येक युगं लिहिता येईल इतकं गूढ आणि गर्भित माऊलींच्या ओव्यांमध्ये लपलेलं आहे. माऊलींच्या ओव्या म्हणजे ते क्षीर आहे ज्यातून कितीही नवनीत जमा केल तरी ते नवनीत आत दडलेल्या नवनीतापुढे कणभर देखील असणार  नाही.

माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जे लिहून गेलेत ते मुळात समजणं हा एका नव्हे तर अनेक जन्मांच्या पुण्याईचा परिपाक आहे. त्यामध्ये देखील माऊली स्वतः सांगतात की, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजेच पूर्ण जीवनभर एखादी ओवी जरी समजली, उमगली, कळली तरी ती जाणिवेत पोहोचून त्यावर अंमलबजावणी करण्यात उभा जन्म जाऊ शकतो. याची माऊलींना निःसंशय खात्री असावी.  म्हणून आईच्या मायेने माऊली सांगतात की,  बाळा हे क्षीर म्हणजे दूध खूप कढत आहे , तापलेल आहे तेंव्हा एक एक थेंब घे, म्हणजे राजा तुला भाजणार नाही , तुझी जाणिवेची जिव्हा पोळणार नाही . अन्यथा इतकं सोप्प तुला तुझ्या भाषेत नीट समजावून सांगून काय उपयोग.

हे मी स्वतः जाणून आहे की माऊलींची एक एक ओवी ही शत शत सूर्याचं तेज आणि ओज आहे. ज्यामध्ये काहीही चूक घडल्यास  अर्थाचा अनर्थ होऊ शकतो हे नक्की. पण माऊली स्वतः जगतजननी असल्यामुळे तिच्या ज्ञानाच्या तव्यावर पोळी भाजताना हात शेकला तरी काळजी घ्यायला माऊली समर्थ आहे.  म्हणून प्रत्यक्ष माऊलींची क्षमा मागून जे सुचलं आणि गुरुप्रेरणेने जे आलं ते तुमच्यापुढे मांडण्याचा यत्न करीन. काही चुकल्यास माऊलींप्रमाणेच आपणही क्षमा कराल हा विश्वास आहे.

उद्या ज्या ओवीवर आपण बोलणार आहोत किंवा ज्या ओवीचा गर्भाथ जाणून घेणार आहोत ती ओवी आहे:

अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले
तुझा तूंचि भाव तुझा तूंचि देह
फिटला संदेह अन्य तत्वे

प्रेरणा : श्रीसद्गुरू
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१८/०७/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...