Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) २

गोग्रासवाडी (डोंबिवली) २

याच श्रीकृष्णाच्या देवळात कृष्णाजन्माचा उत्सव किती छान होत असे. अजून आठवतोय. त्यावेळी गोपाळकृष्णाचं रूप अगदी नजर लागेल असे असायचं. त्याचे कपडे, मुगुट, हार  आणि विविध  फुल विलोभनीय शोभा होती. मला एक गोष्ट करून बघायची होती राहिली ती. ती म्हणजे एकदा कोणी नसताना श्रीकृष्णाची मुरली वाजवून बघायची राहून गेली. खूप छान होती ती छोटीशी सुबक सोनेरी रंगाची मुरली. (कदाचित याच मुळे श्रीकृष्णाने मुरली सारखी एक सुंदर काल्पनिक कथा लिहून घेतली असावी).  याच मंदिरासमोर या मंदिरापेक्षा छोट, हनुमान आणि गणपती एकमेकांच्या पाठीला पाठ लावून असलेलं, पण लौकिकार्थाने मारुती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल छानस मंदिर होत. या मंदिरातील हनुमान जन्मोत्सव सुद्धा बघण्यासारखा होता. 

याच कृष्णमंदिराशेजारी, डाव्या हाताला असलेल्या गोठ्याच्या दर्शनी भिंतीवर प्रभात चित्र मंदिराकडून संस्थेला सुमारे १९३६ साली, गोपाळकृष्ण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी, संस्थेची जागा अर्थात गोग्रासवाडी उपलब्ध करून दिल्याबद्दल रुपये २,०००/- रक्कम दिल्याचा, संगमरवरी दगड बसवला आहे. ही खर तर गोग्रासवाडीची शान होती . पण फार थोड्या लोकांना माहिती असेल आणि फारच कमी लोकांना अभिमान. असो. आता या चित्रपटाची सीडी सुद्धा आहे माझ्याकडे.

श्रीकृष्ण मंदिराच्या उजव्या हाताला सुद्धा एक गोठा होता ज्यात काही गायी त्यावेळी असायच्या. एक प्रश्न अजून सतावतो तेंव्हापासून की, इतक्या गायी असून आम्ही कधीही दूध विकल्याच वा वितरण केल्याचं पाहिलं नाही. कुणाला माहीत असेल तर जरूर सांगा. मारुती मंदिराच्या उजव्या हाताला एक बाग होती आणि त्यात कोणाचा तरी संगमरवरी पुतळा होता ( कोणाचा ते आता मला तरी आठवत नाही ). कमानीचा म्हणजेच गेटचा उल्लेख पहिल्या भागात केला. त्याआधी एक छोटी चाळ होती, त्यात सर्वात पहिलच कदम यांचं केशकर्तनालय होत. मध्ये एक दोन दुकान होती आणि चौथ दुकान एक मिठाईवाल्या भय्याच होत. पण तो प्रसिद्ध होता कावीळ उतरवण्यासाठी. त्यामुळे रोज सकाळी ५:३० च्या आधीपासूनच इथे लोक उपचार करून घ्यायला म्हणजे कावीळ उतरवून घ्यायला येत असत.

कृष्णामंदिराच्या मागच्या बाजूला एक छान आणि मोठं  वडाच झाड होतं. ज्याला एक छानसा, गोलाकार, सिमेंटचा चौथरा बांधला होता. या चौथऱ्यावर येता जाता मी कित्येक वेळा बसत असे. याच वडाच्या झाडाला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जायची. परिसरातील सर्वच बायका तिथे पूजा करायला जमत असत. गुरुजी अर्थातच वाडीतील सुप्रसिद्ध राजाभाऊ जोशी  असत. मी पण आईबरोबर लहान असे पर्यन्त जात असे, अर्थातच लक्ष ठेवायला. कारण पूजेच्या ताटातले जिन्नस, जसे आंबा वगैरे पळवल्या जायच्या,म्हणून आमची नेमणुक आणि बक्षीस म्हणून आंबा मिळायचा. त्यावेळी त्याच अप्रूप खूप होत. आज डझनाने हापूस आणून खातो, पण त्या छोट्याश्या आंब्याची गोडी वेगळी होती.

गेले ते दिन गेले ...................

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
३१/०७/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...