Skip to main content

मुरली - ५१

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ५१

"परंतु तद्नंतर काय महाराज"

"तद्नंतर, ऐक सांगतो. तुझे आराध्य , अर्थातच श्रीकृष्ण, तुझ्या ह्या आर्त हाकेने, प्रतिसाद नक्की देतील. हा माझा ठाम विश्वास आहे. ते आल्यावर , तुला फक्त इतकच करायचंय , श्रीकृष्णांना तू सांगायचस की, 'आता आपली भेट प्रत्यक्ष पुनः कधी होईल हे तूच स्वतः जाणतोस.  तेंव्हा मला एक मागणं मागायचंय. ते म्हणजे ज्या ज्या वेळी मुरली वाजेल त्या त्या वेळी तिचा सूर माझ्या हृदयातून सुरू होऊ दे. त्याविण ही मुरली वाजू नये. त्याने एकच होईल. ज्या वेळी तू मुरलीचे सूर छेडशील त्या प्रत्येक क्षणाला तू माझी आठवण काढशील आणि मला हे कळेल की तुला माझी कितीवेळा  आठवण आली.' भगवन्त तुझी इच्छा अव्हेरू शकणार नाहीत हे निश्चित. "

"कृष्ण येईल हे निश्चित वाटत आपल्याला. ? " आणि हे मुरलीच कारण आणि प्रयोजन कळू शकेल का ? महाराज. "

" अर्थातच भगवंताचं ब्रीद आहे ते.

भक्तवत्सल नाम जयाचे
धावून येतो सत्वर साचे
पुण्यरूप हे ब्रीद जयाचे
भेटीलागी धावून येण्याचे

भगवंताचं तस वचन आहे. जेंव्हा जेंव्हा भक्त आर्ततेने, अतीव करुणेने, याचक वृत्तीने, हृदयापासून  साद घालतो त्यावेळी ती साद  भगवंताच्या हृदयापर्यंत पोहोचतेच पोहोचते. तेंव्हा तू तुझ्या वास्तविक आर्ततेने श्रीकृष्णाला साद घाल आणि पुढे तू चमत्कार पहा. तुझ्याकरता ते येतील हे निश्चित. पण हे मी तुला का करायला सांगतोय हे मात्र मी तुला सांगू शकणार नाही. कदाचित यदुनाथच तुला याच कांरण सांगू शकतील.  पण इतकं कर म्हणजे तुझी भेट सुद्धा होईल आणि हेही कळेल की मुरलीच्या निमित्ताने मुरली बरोबर प्रत्येक क्षणी तुझी आठवण त्यांच्यासोबत राहील.. "

"कृष्णाचं सुद्धा कार्य आहे का काही ?"

"हो त्यांचं भगवंत म्हणून आणि तुझं भक्त म्हणून अशी दोन प्रकारची कार्य आणि परिणाम तदनंतर पाहावयास मिळतील. "
"महाराज मला माझ्या या कार्यात यशप्राप्ती होवो असा आशीर्वाद मला द्यावा अशी मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करते. "

असं म्हणून राधा पुन्हा देवर्षी नारदांच्या चरणांवर शीश झुकवून प्रणाम करते.

"तथास्तु , विजयी हो. "

असं म्हणून नारद राधेला आशीर्वाद देतात व अंतर्धान पावतात.

राधा विचारमग्न अवस्थेत नारदांनी दिलेल्या कार्यात आपली कृष्णाशी भेट होणार म्हणून प्रफुल्लित झाली. ती हृदयापासून कृष्णाचा धावा सुरु करते. अन्न पाणी यांचा त्याग करून फक्त कृष्णाच्या नामात दंग होऊन जाते. तिच्या दुःखातिवेगातील भाव भावना पाहून प्रत्यक्ष नीलकंठ महादेव आणि देवी पार्वती कैलासावर तसेच ब्रह्मदेव  देखील ब्रह्मलोकात सद्गतीत झाले. राधेची तन्मयता , एकतानता अभूतपूर्व होती. प्रत्यक्ष नारद देखील तिच्या भावव्याकुळ स्वरांनी हेलावून गेले होते. त्यामुळे राधेचे प्रत्यक्ष आराध्य, म्हणजेच कृष्ण याज पर्यंत ती साद न पोहोचती तरच नवल.

कृष्ण वास्तुपूजेचे आणि गृहप्रवेशाचे सर्व कार्य यथास्थित संपन्न झाले म्हणून अत्यन्त आनंदी होते. संपूर्ण राज्यात फिरून सर्व प्रजाजनाची विशेष आस्थेवाईकपणे विचारपूस करून, सर्व कार्यात काही न्यून तर राहिले नाही ना याची जातीने खातरजमा स्वतः करून घेत होते. सर्व प्रजेला आपल्या प्रिय महाराजांचं दर्शन हीच एक पर्वणी होती. सर्व काही यथास्थित पार पडलेलं असल्यामुळे आणि स्थलांतराचा निर्णय सर्वमान्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार असण्याचा प्रश्नच नव्हता.

बलरामदादा नवीन राज्याच्या संरक्षण व्यवस्थेची , ठिक ठिकाणच्या बंदोबस्ताची पाहणी करून त्यात काही त्रुटी आहेत का  व असल्यास त्या कश्याप्रकारे दूर करता येतील. याविषयी वैयक्तिक स्वतः आणि त्यानंतर कृष्णाशी बोलून त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी करत होते.

संरक्षणाव्यतिरिक्त इतर सर्व व्यवस्थेची पाहणी करून दोघेही बंधू पुन्हा राजप्रासादाच्या दिशेने निघाले. परंतु कृष्ण काही वैयक्तिक काम आहे असं सांगून, पुन्हा वनराईच्या दिशेने रथ घेऊन रवाना झाला. वनात पोहोचल्या नन्तर रथ तिथेच सोडून कृष्ण सारथ्याला सांगून पुढे रवाना झाला. बराच पुढे गेल्यानंतर एका वृक्षाखाली बसला.

काही काळ गेल्यानंतर राधेची साद कृष्णाच्या हृदयापर्यंत पोहोचली. त्या आर्ततेची आंच कृष्णाला द्वारकेच्या वनात देखील जाणवली. त्याला जाणवलं कि, राधेला आता एक क्षण देखील आपल्या शिवाय जगणं कठीण आहे. तिच्या श्वासाची गती संथ संथ होत होती. भुकेमुळे शरीरात त्राण शिल्लक नव्हतं. यापेक्षा जास्त वेळ गेला तर राधेच्या जीविताला धोका पोहोचू शकतो हे जाणून, कृष्ण क्षणात योगमायेने राधेच्या समोर प्रकट होऊन उभा ठाकला.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...