Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८४

भोग आणि ईश्वर  ५८४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
कर्म हे फलद्रूप होणार हे नक्की. पण कोणतं कर्म फलद्रूप होणार हे जाणून घेणं सुद्धा, महत्वाचं आहे. मुळात माणूस कारा, वाचा, मन आणि बुद्धी, यातील एक किंवा सर्व मार्गाने जे काही करतो, ते कर्म. 

पण या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा घटक, जो प्रत्येक कर्मात अविभाज्य भाग गणला जातो, तो म्हणजे सर्व कर्मात असलेला मनाचा सहभाग. मन हे असं इंद्रिय आहे, हे काय वाचा व बुद्धी, यांना प्रेरक आणि पूरक आहे. 

प्रेरक म्हणजे, इतर तीनही इंद्रियांना चालना देऊन, त्यांना कार्यरत ठेवून, त्यांच्याकडून आपल्या, अर्थात मनाच्या, अपेक्षा, आसक्ती, वासना, इच्छा, दृढ निश्चय, हे सर्व साध्य करण्यासाठी आवश्यक सर्व शक्ती पणाला लावून, प्रसंगी, शरीर, बुद्धी व वाचा याचं नुकसान सुद्धा सहन करायला लावण्याची दाहकता, या मनात असते.

जे मन प्रसंगी मऊ लोण्यासरखं असतं, तेच वेळप्रसंगी एक दोन नव्हे तर काही लाख बळी घेण्याइतक, कठोर किंवा निष्ठुर होऊ शकतं. म्हणजेच एखाद्या छोट्याश्या कर्मात सुद्धा मनाचा सहभाग असतोच असतो. देह, बुद्धी व वाचा यांना मनात असलेला विचार, अव्यक्त भाव, ज्ञान वा अज्ञान याचं प्रकटी करण, साद घालणं इत्यादी सर्व व्यक्त करण्यासाठी, वापरत. 

म्हणजेच देह बुद्धी व वाचा ही माध्यमं आहेत आणि मन हे या मागे असलेलं साधन आहे. पण या सर्वात साध्य काय आहे, हे कसं कळणार. कारण या ब्रम्हांडात साध्य हे व्यक्ती, काळ, वेळ, स्थळ याप्रमाणे बदलतं. म्हणजेच प्रत्येकाचं एकच साध्य नाही. जर साधन व माध्यम ही एकच आहेत किंवा समसमान आहेत, तर साध्य एकच असायला काहीच हरकत नाही. 

मग नित्य, निरंतर परिवर्तित असणाऱ्या आणि परिवर्तन हाच नियम असणाऱ्या या जगात, काळ जो सतत पुढे जात राहतो, देह जो नित्य, क्षणक्षण बदलत राहतो, अश्या स्थितीत आणि जन्म व मृत्यू ही दोनच सत्य असणाऱ्या जगतात, शाश्वततेची व्याख्या काय आणि जन्म व मृत्यू यांचं प्रयोजन काय, असा प्रश्न अनेकदा पडतो. 

विचार करा की, या जगतातील, जगताबाहेरील, ब्रम्हांडातील व त्या पलीकडील, अनेक गुह्य रहस्य मानवाला मनाच्या सामर्थ्या वर ज्ञात होतात, होऊ शकतात. म्हणजे जे चिंतन करू, ते सध्या करू, असं सामर्थ्य असलेल्या मनाचा कर्मातील, कर्माभोग संपवून मुक्तीच्या मार्गावरील सहभाग किती अमूल्य आणि अविभाज्य आहे, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. पण तोपर्यंत मनाला इच्छित सामर्थ्य प्रदान करणाऱ्या नामाला सोबतच ठेवूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...