Skip to main content

भोग आणि ईश्वर ५९५

भोग आणि ईश्वर  ५९५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल. 
  
एक गोष्ट आपण नोट केली आहे का मनाची साथ किंवा एकग्रता असली किंवा नसली तरीही देह काही गोष्टी आपसूक करतो. ही गोष्ट तंद्रीत काही काम केल्यानंतर, आपल्याला तंद्रि भंग झाल्या, जाणवतं. आपण आश्चर्य चकित होऊन, विचार करतो की, आपण दुसराच कुठला तरी विचार करण्यात गुंग होतो तरी, काम पण कसं केलं. बरेचदा, हे केलेलं काम फारशा चुका न होता, व्यवस्थित झालेलं असतं. 

यामागे काय विज्ञान आहे ते जाणून घेऊ. मुळात यात विज्ञान कसलं हा प्रश्न मनात येईल. तर कालपण आणि मागेसुद्धा अनेकवेळा मी म्हटल्या प्रमाणे, हे जगत पूर्ण पणे विज्ञानाधारीत आहे. त्यामुळे या जगतात कुठेही घडलेली वा घडणारी कोणतीही गोष्ट, घटना इत्यादिमागे, विज्ञान आहेच आहे. आपण ते समजतं नाही किंवा समजून घेऊ इच्छित नाही. म्हणजे अज्ञान किंवा अहं असतो. अज्ञान समजून घेऊ शकत नाही तर अहं समजू घेऊ देत नाही. 

तर ज्यावेळी मन दुसरा विचार करतं, पण देह वेगळ्याच कार्यात मग्न होतं, त्यावेळी दोन वेगळ्या पातळीवर, दोन वेगळे तरंग व लहरी, निर्माण होतात. एक मनातील विचारातून उत्पन्न झालेल्या किंवा होत असणाऱ्या आणि.दुसऱ्या लहरी, देहाच्या कर्मातून निर्माण होत असलेल्या. दोन्ही लहरी आपापल्या पातळीवर काम करतात. कदाचित दोन्ही कर्माच कार्य पूर्ण होतं. पण दोन्हीं मध्येही पूर्ण एकग्रता नसल्यामुळे, मिळणारं फलित पूर्ण असू शकत नाही. 

यात फक्त एकच सिध्द होत की जी अंगवळणी पडलेली किंवा देहाला सवयीची झालेली कामं देह व्यवस्थित पार पाडतो. याचप्रमाणे मनाला सवय असलेली कर्म मन पूर्ण सक्षमतेने पार पाडतं. पण मनाचं वैशिष्ट्य आहे की, मना तून बाहेर पाडलेल्या किंवा बाहेर पडणाऱ्या लहरी परिणाम योग्य आणि इच्छेच्या शक्तीनुसार पार पाडतात. याचं अर्थ असा की, एकाग्रता पूर्ण नसताना सुद्धा मन कामामागे किंवा कर्मामागे आपली शक्ती काही प्रमाणात लावतच असतं. 

मग अश्यावेळी त्या कामात तितक्याच प्रमाणात यश प्राप्त होऊ शकतं, जितकं मन त्यात आपली गुंतवणूक करेल. पण आपण जाणतोच की, प्रत्येक कार्यात मनाचा सहभाग असावा लागतो. मग कालच्या आणि आजच्या लेखाच्या संदर्भात अशी काय उपयोगी कर्म आहेत, ज्यामध्ये, देह आपल्या कार्यात गुंतलेला असताना सुद्धा, मन इच्छित कर्म काही प्रमाणात का होईना सकारात्मक रित्या करतं, घडवत. यावर उद्याच्या भागात चिंतन करूया, तोपर्यंत नामाच्या नित्य कर्मात मन गुंतवून घेण्याचा प्रयत्न करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...