Skip to main content

भोग आणि ईश्वर ५७८

भोग आणि ईश्वर  ५७८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

काल आपण म्हंटल्याप्रमाणे, आपण मनाचा तो गुणधर्म पाहू, ज्याचा आपण सदुपयोग करून, अहित टाळून, हित साधू शकतो. मनाचा गुणधर्म म्हणजे मनाला सतत काही ना काही गुंतवणूक लागते. मन एका क्षणातून दुसऱ्या क्षणात जाताना, त्या मनाला कुठेतरी गुंतवाल तर, आधीच्या क्ष्णातील गोष्ट, भाव विचार बदलतात. ते नवीन ट्रॅकवर जातात. म्हणजेच मनाला सतत कार्यरत ठेवणं. जेणेकरून, त्याला आसक्तीतून बाहेर काढता येईल. पण यातसुध्दा अडचण अशी आहे की, सतत काय करणार आणि कसं मनाला कार्यरत ठेवणार. 

म्हणजे मन सतत कार्य करत राहील आणि त्याला विचारमग्न ठेवण्यासाठी, तशाच प्रकारचं कार्य असणं आवश्यक आहे. पण अजून एक अडचण यामधे अशी आहे की, मन हे देहाच्या इतर इंद्रियांप्रमाणे मज्जा संस्थाच्या आधीन असणारं इंद्रिय नाही. तर ते स्वयंप्रेरीत आणि स्वयंनियंत्रित इंद्रिय आहे आणि अश्या इंद्रियाला, दमन करून, नियंत्रित करता येत नाही. 

त्या मनाला मुळात नियंत्रित करता येत नाही. तर त्या मनाला एकाग्र करता येतं. याचसाठी गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे. म्हणजे विचार करा की,  एखाद्या व्यसनात गुंतलेला माणूस, जगाची पर्वा न करता, आपल्या व्यसनात स्वतःला गुंतवून घेऊ शकतो. यात एक गोष्ट सर्वश्रुत आहे की, असं व्यसन हे मनाला शरीराला दोघांनाही असतं. त्यामुळे त्या दोघांनाही कार्यरत केल्यावर, मन स्वतःला, त्या ठिकाणाहून काढून, आपलं अस्तित्व दुसरीकडे वळवेल. 

अश्या मनाच्या वळण्याने, मनाला मूळ व्यसनातून बाहेर पडून, सुटकेचा मार्ग मिळेल. पण यातून जो महत्वाचा संदेश मिळतो, तो म्हणजे, मनाला एकाग्र करण्यासाठी, त्याला दुसऱ्या गुंतवणुकीची गरज असते. म्हणजे चित्त एका स्थानावरून, विचारावरून, बाजूला काढून, ते दुसऱ्या विचारावर एकाग्र करावं. म्हणजेच थोडक्यात त्याचं channelisation करणं. 

अर्थात अश्या channelisation साठी नवीन पद्धत ही तितकीच सकारात्मक असणं अत्यंत महत्वाचं आहे. याचसाठी श्रीकृष्णांनी स्मरण शरण या दोन्हींचा उपयोग करण्याचा सल्ला अर्जुनाला दिला आहे. यामुळे मनाची एकाग्रता टिकून, राहते आणि ती सकारात्मक होऊन, चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होते. मनाची अश्याप्रकरे गुंतवणूक केल्याचे अनेक फायदे आहेत. 

त्यांचा विचार आपण उद्याच्या भागात करूया. पण नाम मात्र घेताच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...