Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८६

भोग आणि ईश्वर  ५८६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
मनाच्या एकाग्रतेच महत्व इतकं अद्भुत आणि अलौकिक आहे, की एका स्थिर चित्ताच्या सहाय्याने माणूस अभ्यास चिकाटी, ध्यान, तप आदी मार्गांनी आपल्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. खरतर यामागे शास्त्र आणि विज्ञान आहे. यात कोणताही चमत्कार नाही. कारण हे संपूर्ण जगत विज्ञानावर आधारित आहे आणि प्रत्येक क्षण घडणाऱ्या छोट्यातील छोट्या घटनेपासून, अनेक वर्षांनी घडणाऱ्या अद्भुत खगोलीय किंवा अध्यात्मिक घटनेमागे सुद्धा वैज्ञानिक व शास्त्रीय कार्यकारण भाव असतोच असतो. 

आपण या सर्व गोष्टी, पृथ्वीवरून अर्थात मर्त्य जगतातून बघत असल्यामुळे, आपल्या आकलनाला निश्चितच मर्यादा असतात. पण मग आपण या अनेक घटनांमागची कारणं कधीच जाणून घेऊ शकत नाही का. तर याचं उत्तर थोडं विचित्र आहे. म्हणजे आपण या जगतातील पंचमहा भूतरूप देहाच्या कक्षा व मर्यादा ओलांडू शकलो तर नक्कीच या त्रिपरिमिती जगताच्या पार जाऊन, अनेक अद्भुत रहस्ये, गुह्य गोष्टी जाणून घेऊ शकतो, ज्या गोष्टी सामान्य बुद्धीच्या जाणिवांच्या पलीकडे आहेत. 

यासाठी, ईश्वराने मनाला दिलेल्या अमर्याद सामर्थ्य प्रदान केलं. किंबहुना, या जगताच्या अमर्याद रहस्यांची, सर्व शक्ती या मनात भरूनच, ईश्वराने हा देह घडवला. याचं महत्वाचं कारण म्हणजे, प्रत्यक्ष ईश्वरच, मन या इंद्रिय रुपात, मानवाच्या समीप राहतो. म्हणजे देहांतर्गत आत्मा हा ईश्वरी अंश आणि त्या देह व बुद्धी यांना चालवणारं मन, हे सुद्धा प्रत्यक्ष इश्वरस्वरुप, आहे. 

म्हणजे आता खरंतर कार्य खूप सहज आणि सोप्पं आहे. पण इथेच खरा भेद सापडतो. याचं कारण मन आणि आत्मा हे दोन्ही एकाच ईश्वराची प्रतिरूपं आहेत, हे दोघांनाही माहीत नसतं. दुसरं कारण की, मन हे बाह्य जगताशी संबंधित असल्यामुळे, त्यावर बाह्य जगताचा व जगतातील सर्व सजीव निर्जीव, वातावरण, हवा पाणी इत्यादी सर्वांचा प्रभाव असतो. आत्मा वास्तविक, देहांतर्गत हृदयस्थ वास करून असतो. पण तेथूनच चैतन्य रुपात पूर्ण देह, देहातील प्रत्येक पेशी इत्यादी सर्वांच्या चलनाची, व्यवस्था पाहतो. 

मन हे एकमेव असं इंद्रिय आहे, जे बाकीच्या इतर इंद्रियांप्रमाणे, दिसतही नाही आणि दाखवता येत नाही. तरीही ते सर्व देह व्यापून, प्रत्येक इंद्रिय व अवयव यांच्याकडून, कार्य करवून घेतं. त्या अर्थाने ते आत्मारूप चैतन्याचा एक भाग असतं. म्हणजे ते आत्मरूप चैतन्या सोबत वावरत असते. पण चैतन्य हे चालना देते आणि मन त्या चालनेला, ऊर्जा व शक्ती स्वरूपात सहाय्य करून, देहाला, बुद्धीला, वाचेला कार्यरत करते. 

याबाबत एक महत्वाचं उदाहरण देता येईल. ते म्हणजे, कोमात गेलेल्या पेशंटचा, मेंदू कार्यरत असूनही, मनाचा आणि मेंदूचा संपर्क संपुष्टात आलेला असतो. त्यामुळे देह आहे, आत्मा आहे पण मन व मेंदू यातील संपर्क संपल्या मुळे, देहाचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. म्हणजेच आत्मा, मन देह बुद्धी या चारही गोष्टी परस्पर पूरक आहेत. पण या सर्वात मन, मनाची कार्यक्षमता आणि कार्यशक्ती ही अमर्याद आहे. 

याचं चिंतनाचा पुढील भाग आपण उद्या पाहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...