Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८८

भोग आणि ईश्वर  ५८८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल. 

 मनाच्या सामर्थ्याचा सदुपयोग वा दुरुपयोग हा त्या शक्तिमागील उद्देश व प्रेरणा, यावर अवलंबून आहे किंवा असतं. म्हणजे जर उद्देश स्वार्थ असेल तर त्यामागील प्रेरणा ही,या स्वार्थापायी मिळू शकणारे किंवा अपेक्षिलेले लाभ ही असेल. म्हणजे यानंतर साध्य आणि साधन हे त्या चुकीच्या ध्येयासाठी एकत्रित कार्य करण्यास प्रोत्साहित होतात. त्यानुसार अयोग्य व अहितकारक मार्गांचा वापर, हे साधन ठरते. 

याऊलट ज्यावेळी उद्देश हित असेल तर नक्कीच प्रेरणा ही विवेक व विचार हे असतात. त्यामुळे या उद्देश व प्रेरणेने मनुष्य कार्य करत राहून, आपल्या उद्देशासाठी योग्य मार्गांचा वापर करतो. मनातील इतर सर्व विचार हे, मूळ उद्देशामागे त्याचं पद्धतीने कार्यरत होऊन, संपूर्ण स्वभाव व वृत्ती त्याचप्रकरची होतात. म्हणजे हेतू, मार्ग आणि त्यावरून स्वभाव व वृत्ती माणसाची ओळख बनतात. 

यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, एखाद्या माणसाचा स्वभाव व वागणूक कळतो किंवा कळू शकतो.  कारण आपल्या मनातून आपला हेतू, उद्देश, प्रेरणा इत्यादीं बाबत, ज्या लहरी संप्रेरीत होतात, त्या आपल्या आधी किंवा आपल्यासोबत आपली अदृश्य प्रतिमा घेऊन फिरतात.म्हणूनच ज्यांना ज्यांना अश्या लहरी जाणण्याची कला प्राप्त असते, त्यांना त्यांना, हे सहज कळू शकतं. 

म्हणूनच काही लोक आल्या आल्या त्या जागेतील, वातावरणात बदल घडतो आणि असा घडून आलेला बदल आपल्या लक्षात येतो. अर्थातच आपल्या जाणीवा जागृत होऊन, त्या अश्या लहरी प्राप्त करून, त्यांचं वाचन मेंदू व मन यांद्वारे संयुक्तपणे करवून, आपल्याला त्याची जाण घडवून देतात. म्हणजे लहरी प्राप्त होणं, जाणिवांची केंद्रे त्यांना ग्रहण करून ते ज्ञान व माहीत सांकेतिक भाषेत मेंदू व मन यांना एकाचवेळी पोचवतात. त्याचं पृथक्करण मेंदू व मन आपल्या प्राप्त ज्ञान, अनुभव याद्वारे करतात. 

त्यातून काढलेले निष्कर्ष पुन्हा तपासले जाऊन, योग्य संदेश पुन्हा जाणीवा पर्यंत पोचवला जातो.  या सर्व प्रक्रियेला काही अल्प क्षण अर्थात fraction of seconds काळ लागतो. म्हणजे आपण आपल्या सोबत नेत असलेल्या लहरी, आपली सकारात्मक वा नकारात्मक प्रतिमा समोरच्या व्यक्तीच्या मनात निर्माण करते. या लहरी, अर्थातच आपले विचार ठरवतात. आपले विचार आपलं चिंतन, मनाची सकारात्मकता किंवा नकारात्मकता, हेतू, उद्देश, प्रेरणा हे सर्व मिळून ठरवतात.

हे सर्व एकत्रित ठरताना, यातील जो घटक सर्वात प्रभावी त्यावर या लहरींचा गुण व शक्ती ठरवतो.  यावर उद्याच्या भागात सविस्तर चर्चा करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...