Skip to main content

भोग आणि ईश्वर ५८३

भोग आणि ईश्वर  ५८३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
कर्माचं गणित मांडताना काही गोष्टी किंवा मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत. सर्वसाधारणपणे कर्म जाणून घेताना या गोष्टी उपयोगात येतात. 

कर्म म्हणजे काया वाचा बुद्धी व मन या चार माध्यमातून, आसक्तियुक्त  असं जे काही प्रत्येक जीवा करतो, त्याला कर्म म्हणता येईल. 

कर्म म्हणजे फक्त काही करणं असं नाही, तर काहीही न करणं सुद्धा, कर्मच गणल जातं. 

कर्म हे काहीतरी फलनिष्पत्ती निर्माण करतं. म्हणजे त्याचा चांगला वा वाईट असा परिणाम निर्माण होतो.

हा परिणाम म्हणजे फल. हे फल आपल्या अपेक्षेप्रमाणे असेल किंवा अपेक्षेप्रमाणेच नसेल. अपेक्षा ही आसक्ती, इच्छा, कामना, वासना इत्यादी मधून निर्माण होते.  

हे फल, प्राप्त होण्याचा कालावधी, कमी अधिक असतो. 

प्रत्येक क्षण, प्रत्येक जीव कर्म करतच असतो. घेतलेला प्रत्येक श्वास देखील कर्म निर्माण करतो. त्यामुळे अर्थातच उच्श्र्वास देखील कर्मच ठरतं. 

प्रत्येक कर्म बद्धता निर्माण करतं. म्हणजेच प्रत्येक क्षण माणूस कर्म आणि त्याचं फल निर्माण करून, काळाच्या गतीनुसार कर्मफल शृंखला निर्माण करतो. 

या श्रृंखले नुसार, प्रत्येक जीव आधीच्या किंवा सद्य कर्माचचं फल भोगत, नवीन कर्म त्यात वाढवत जातो. 

आयुष्यात केलेली कर्म वजा भोगलेली फल हे संचित ठरवतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आयुष्यात क्ष कर्म केली आणि त्यातील य इतक्या कर्मांची फल भोगून वा उपभोगून झाली की क्ष वजा य ह्या कोष्टकानुसार, शिल्लक उरलेली कर्माफळ आत्मा पुढील जन्मासाठी घेऊन जातो. याचं शिल्लक कर्म फळांना संचित म्हणतात. 

माणूस आयुष्यात जे अनुभवतो, जे फल भोगतो, त्या फळांना कारणभूत कर्म त्याने स्वतःच या जन्मात किंवा मागील अनेक जन्मात केलेली असतात.  कर्मफळं परिपक्व झाल्यावरच, त्यांची पक्व फळे, आपल्या समोर येऊन उभी राहतात. त्यामूळे कधीही इतर कोणत्याही व्यक्तीचं भाग्य, भोग वा कर्मफल आपल्याकडे भोगण्यासाठी येत नाहीत. 

म्हणजेच आपण जे म्हणतो की, कोणामुळे मला वाईट दिवस आले किंवा इतर कोणाच्या तरी वाट्याचं आपण कधीच भोगू शकणार नाही. 

कर्मावर अजूनही चिंतन करूया, पण उद्याच्या भागात. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...