Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६०

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६० (प्रसंग अकरावा समाप्त)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll गदाने धनुष्यास बाण लावून जरासंधाच्या दिशेने सोडला. जरासंधाचे सुरक्षा कवच भेदून बाण त्याच्या मुकुटी आपटला आणि जरासंध धक्क्याने हादरला. तो स्वतःला यातून सावरणार तोच गदाने अजून एक बाण मारला, ज्याने जरासंधाच्या हातातील धनुष्य गळून खाली पडलं.  जरासंध अवचितपणे सावध झाला. त्याच्या पोटात भीतीने गोळा आला आणि गाळण उडाली. त्याने आजूबाजूला पाहिले. मागे कोणीही नव्हते जे सहाय्यास येऊ शकेल. आता मात्र त्याच्या रणमद खाडकन उतरला. कारण श्रीबलीभद्राने त्याच्या सहाय्यार्थ आणलेले अनेक राजे व त्याचे सैन्य , मगधाचे अनेक वीर आणि बरेचसे सैन्य एकाहाती , गवत कापून काढावे तसे, कापून काढले होते. परिस्थिती आपल्या विपरीत आहे हे ध्यानात येताच जरासंध रथ उलटा वळवून त्वरेने पाय काढता झाला. त्याला तसे पळताना बघून त्याचे सैनिक , त्याच्या सहाय्यार्थ आलेले राजे आणि त्यांचे सैनिक हे सर्व रणातून पळून जायला ला...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५९ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll जरासंध आणि यादववीर गद समोरासमोर आले आणि जणू दोन महापर्वत , दोन महाशिला वा दोन महावादळे एकमेकां समक्ष आल्यावर जशी भीतीदायक स्थिती निर्माण होते तशीच स्थिती निर्माण झाली.  समोर पाहून विकट हास्य करत जरासंध क्रोधवश बोलला. "अरे बुद्धीमंदा माझ्याशी स्वतः गोविंद लढू शकत नाही आणि तू विचार तरी कसा केलास युद्धाचा. अरे मुढा एकवेळ सूर्य अंधारात बुडेल, डिंभक (छोटी पांढरी अळी) भिंत चढून जाईल, पण तुझे माझे युद्ध अशक्य आहे.  एखाद्या मशकाच्या प्रहाराने मेरूपर्वत चूर्ण होईल, एकवेळ एखादा मूषक इंद्राशी युद्ध करू शकेल, परंतु तुझे माझे युद्ध ही कल्पना तरी कशी केलीस तू.  अरे एखाद्या घटात समुद्र बुडेल , एका जांभईत आकाश सामावले जाईल, एखाद्या छोट्या हरळीने वारा अडेल पण माझं आणि तुझं युद्ध त्रिवार अशक्य.  एखादा क्षुद्र कीटकाच्या पोटात समुद्र मावेल, एखादवेळी मुंगी गजास गिळंकृत करेल, आकाशात अधांतरी टाकी बांधता ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५८

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५८  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll तिकडे वक्रदंताने सात्विकाला आव्हान दिले. " अरे सात्विका तू तर तपस्वी लोकांच्या समूहातच शोभतोस. कारण तुझे नावच सात्विक आहे. तुझे या युद्धभूमीवर काय कार्य. तू येथून पळ काढ. कारण मी जर कोपलो तर तुझी सात्त्विकता पार पाताळात जाईल. त्यामुळे तू इथून निघून गेलेला बरा."  त्याचे हे बोल ऐकून सात्विक संतप्त होऊन म्हणाला " हे वक्रदंता माझी सात्त्विकता, फक्त सात्विक आणि पुण्यवान लोकांसाठीच आहे. तुझ्यासारख्यासाठी माझी सात्त्विकता युद्धभूमीवर येण्याआधी मी उतरवून येतो. तुझ्या नावा प्रमाणेच तुला वक्र करून तुझे दात पाडण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे. तुला घावही न लागता तुझे प्राण हरण करण्याची क्षमता  देखील माझ्यात  आहे. त्यामुळे तू माझ्या सात्विकतेची चिंता न करता आपली चिंता कर"  या सात्विकाच्या  बोलानंतर वक्रदंत खवळून उठला त्याचा तमोगुण जागा झाला. सात्विकाचा सात्विक संताप जागा होऊन त्यानेही यु...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५७ (प्रसंग दहावा समाप्त)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   अनेकानेक देह जे देहइंद्रियांसहित मृत्यू पावले , ते हरिचरणी शरण आले. जे शीर उडून वैकुंठाला पोचले ते ते त्या स्थळी म्हणजेच वैकुंठी हरी नाही हे देखून पुनः रणभूमीवर श्रीहरी चरणी येऊन पडत असे.  निजगमन देहाचे झाले  तेथे अभिमान रिक्त झाले ते ते हरी सन्मुख पातले स्वरूपाशी मिसळले आत्मन देह त्यागीता अभिमान रहित होता स्वपापाची जाणीव होता कळो आले प्रत्ययास निजरूप निजचित्ती जाणले त्यागीता गती परमार्थाची परिणती देहाभिमान सोडता तुज जे न कळे आता कळे देहत्याग होता तैसेची प्रत्येक मृता कळो आले मरणांती हरी समोर उभा असता कैसे स्वर्ग कैसी ब्रम्हता कैसे वरदान स्वर्गसुखता एक सत्य हरिचरण जाणले न या देही राहून निज देह त्यागीता जाणून पातले हरी चरणांशी येऊन मुक्ती चारी येथ मिळती येऱ्याचे नव्हे हे भाग्य जाण हरी सन्मुख जाईल प्राण ते भाग्य लाभले रणी अर्पण करिता देह हरिसी तर्पण युद्धात म...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५६ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   शाल्व राजाने वार चुकवला आणि वेगात रथाबाहेर उडी घेतली अन्यथा शेवट निश्चित होता. उसळून पुन्हा उभा रहात शाल्व गदा घेऊन बलरामाकडे धावला आणि गदेने बलरामाच्या छातीचा वेध घेत घाव घातला. या प्रहाराने बलराम मात्र आकाशाच्या दिशेने थोडा उडाला आणि पुनः जमिनीवर उभा राहिला. या अवधीत शाल्व रथारुढ झाला आणि पुढला पवित्रा घेणार इतक्यात बलरामाने मुसळ उचलून बरोबर शाल्व राजावर वार केला.  रुधिराच्या वांतीने शाल्व मूर्च्छित पडला.  त्याला मुसळीने घाव घालत बलरामाणे त्याचा अंत आपल्या नांगराने केला आणि शाल्व यमसदनी पोहोचला.  यानंतर बलरामाने युद्धभूमीवर  अक्षरशः तांडव सुरू केलं. नांगर हाती घेऊन रणभूमी शब्दशः नांगरून काढली. अनेक वीर मातीत मिसळले. समोर शत्रूचा सैनिक वा वीर दिसला की त्याला नांगराने एकाच घावात रुधिराच्या वांती व अभिषेकासह रणात धारातीर्थी पाडलेच म्हणून समजा. त्याच्या नांगराचा फिरस्ता पाहून ...

गणेशवंदन

आज माघी गणेश जन्मोत्सवानिमित्त  तीन अक्षरी कवितेतून श्रीगणेशपूजन आणि वंदन श्रीगणेशाय नमः  तुज करुनि मोरया  तूज आळवितो पुण्यार्था नमितो तुज निजभावा करुनि क्षण स्मरणार्था साधक तुज भजतो गणेश तव वंदनार्था  तुज पूजीन आरंभे यश लाभो कार्यार्था शेंदूर गंध भाळी  लंबोदर तू शूर्पकर्णा तव नामे चालले जगी तूच सर्वार्था रक्तवर्ण अर्पूनी पुष्पे प्रसन्न हो सिद्धार्था  आठवले त्या शब्दांनी वंदितो तुज सेवार्था ©® कवी : प्रसन्न आठवले माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघी गणेशोत्सव २८/०१/२०२० ०६:१२

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५५

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५५ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll गवेषणाला रोखण्यासाठी बलराम आता अस्त्र शस्त्र घेऊन रथातून उडी घालून खाली उतरून गवेषणाकडे निघाला. शेषांवतारी बलराम दातात वराहशक्ती , पाठीला कूर्मशक्ती आणि हाती अनंत शक्तींचे बळ घेऊन गवेषणाच्या दिशेने निघाला. हातात हल अर्थात नांगर गदा आणि मुसळ घेऊन शेषाचा अवतार गवेषणाकडे निघाला. गवेषणाने बलरामाला येताना पाहिले आणि बाणांची वृष्टी सुरू केली. बलरामाने त्याच्या सर्व अस्त्रांना नांगराने उडवून आपल्यापर्यंत येऊच दिले नाही. वाटेत बलरामाला अडवण्या साठी अनेक राजांनी गजदल मध्ये घातलं. येणाऱ्या प्रत्येक हत्तीला मुसळीच्या प्रहारासरशी गंदस्थळ फोडून, पायाला नांगराने ओढून , वा गदेच्या प्रखर आघाताने जागच्या जागी मृत्यूसदनी धाडत बलीभद्र निघाला गवेषणाच्या रथसमीप येताच नांगरदात रथ चाकाखाली घालून पूर्ण रथ , बलरामानाने उलटा केला. सारथी एका दिशेला आणि गवेषण एका दिशेला धरतीवर  पडले. गवेषण इतक्या जोरात तोंडावर आपटला कि, त्य...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५४ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    रणांगणी मध्यात उभे राहून विकट हास्य करत गवेषणाने यादववीरांना युद्धास आव्हानीत केले. त्याला तसे आव्हान देताना पाहून यादववीर सारण त्वरेने बाण घेऊन त्या दिशेने निघाला. वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बाणांनी घायाळ करत प्रसंगी यमसदनी धाडत, बाणांनी कित्येकांचे हात व पाय उडवत वेगात पुढे निघाला. त्याला तसे येताना पाहून गवेषण देखील आवेशाने त्याच दिशेने पुढे निघाला. इकडे केशिकाने यादवसेनेचा ऱ्हास करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे श्रीहलधर आपली आयुधे हल आणि गदा यांच्या सहाय्याने शत्रुसैन्यावर तुटून पडला होता. बलीभद्राला रोखण्यासाठी अनेक वीर प्रयत्नांची शिकस्त करत होते. त्यासाठी धनुष्यबाण, तोमर (भाल्या सारखे एक शस्त्र , पण याचा दांडा लाकडी असतो, भाला पूर्णपणे लोखंडी असतो) , खड्ग,  गदा यांनी बलरामाची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करत होते. परंतु बलराम निष्णात योद्धा आणि चपलांगीं असल्यामुळे स्वतः पर्य...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५३  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll  केशिक आणि बलराम यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. दोघेही शक्तीवान युद्धशास्त्रात निपुण , महारथी , महावीर म्हणून ख्यात होते. आज युद्धात त्याचा प्रत्यय येत होता. हलधर आपले हल हे आयुध , गदा आणि मुसळ यांनी युद्ध करत होता. तर केशिक धनुष्यबाण, गदा आदी अस्त्रांनी युद्ध करत होता.  याचदरम्यान राजा गवेषण मगधाचे सैन्य घेऊन यादवांवर तुटून पडला. महाबलवान गवेषण युद्धात निपुण आणि शत्रुसैन्याचा निःपात करण्यात प्रवीण होता. अनेक राजे महाराजे युद्धात जरासंधाच्या बाजूने तुंबळ युद्ध करत होते. मुकुटांचा, रथाच्या सांगाड्यांचा, अगणित शस्त्रांचा, मृत सैनिकांच्या देहाचा नुसता खच पडला होता. यादववीर अनेक आघाड्यांवर एकाच वेळी तीव्र प्रतिकार आणि तीव्र प्रतिहल्ला यांनी जरासंधाच्या नेतृत्वाखालील सैन्याला क्षती पोचवण्यात यशस्वी होत होते. समस्त आकाश बाणांनी आच्छादून गेले होते, इतके की दिवसाची मध्यान्ह असूनसुद्धा सायं सम...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५२ (प्रसंग नववा समाप्त)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll त्याचे पुढील लक्ष चक्रदेव  आहे हे जाणून महाबली यादववीर कंक हत्तीवरून अंगाकडे झेपावला.  महाताकदवान कंकाने काही क्षणातच अंगाला त्याच्या हत्तीसहित यमसदनी धाडले. इकडे सात्यकीने कलिंगाच्या सैन्यात विध्वंस करण्यास सुरुवात केली. ते पाहून कलिंग क्रोधाने पुढे सरसावून सात्यकीपर्यंत पोचला.  सात्यकीला त्याने वीस बाण एकत्र मारून पार हतबल केले. सात्यकी रथातून रथाबाहेर पडला. त्वरित स्वतःला सावरत सात्त्यकीने आपल्या बाणाने कलिंगाचा मुकुट आणि रथाचा मेढा पाडला. यावर रागाने कलिंगाने सात्यकीच्या रथाचा चक्काचूर केला. कलिंगाच्या या वर्तनाने क्रोधीत होत सात्त्यकीने आपली कुऱ्हाड अर्थात परशु बाहेर काढला आणि परशूच्या  शक्तीप्रहाराने कलिंगाचा  रथ ध्वस्त केला. तद पश्चात रथाच्या चारही घोड्यांना मुष्टिप्रहाराने यमाकडे धाडले.  हे देखून कलिंग क्रोधाने लाल होऊन सात्यकीवर चालून ग...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५१

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५१ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll पौंड्रकाला मूर्च्छित पाहून यदुरथ त्वरित कृतवर्माकडे त्वेषाने धावू लागला. त्याला तसे करताना पाहून वीर अक्रूर वायूवेगे आपला रथ घेऊन शीघ्र गतीने यदुरथाकडे धावला आणि आपला रथ त्याच्या रथा समोर उभा करून म्हणाला. "तुला मी युद्धाचं आव्हान देतो." याला प्रत्युत्तर म्हणून यदुरथ अक्रुराला म्हणाला " अरे अजिबात क्रूरता नसलेला तू म्हणून तुझं नाव अक्रूर. तुझा काय माझ्यापुढे पाड लागणार. खरतर तू युद्धभूमी योग्यच नाहीस."  यदुरथाचं हे दरपोक्तीपूर्ण प्रत्युत्तर ऐकून अक्रूर त्वेषाने म्हणाला " अक्रूर म्हणजे अति अर्थात महाभयंकर क्रूर. आता तुला कळेल रणात राहण्यास कोण अपात्र आहे."  इतकं बोलून अक्रूराने धनुष्यास बाण लावून वायूवेगे यदुरथावर सोडला. यदुरथ यावर त्वरित बाणानेच उत्तर देता झाला. त्यानंतर या दोन वीरांचे घनघोर बाणयुद्ध सुरू झाले. त्यांचे बाणांच्या प्रत्युत्तराने समस्त आकाशच जणू व्यापून गेले. अगदी सूर्य झाकोळला...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५०

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५०  (अर्धशतकी लेखांक आणि प्रसंग नववा सुरू)  (कालच्या लेखावर प्रसंग आठवा समाप्त लिहायचे राहिले) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll दादांचे आणि गदाचे हे रणातील आलिंगन दृश्य आणि हास्य पाहून जरासंध रागाने खवळून त्वेषाने आपल्या सैन्याला ललकारी देत गरजला. त्याच्या गर्जनेने जरासंध सेनेतील रथी जरासंधासमीप येऊन प्रतिज्ञा करते झाले " हे महावीर जरासंध आपण जराही चिंता करू नये. आम्ही धनुष्ये, खड्गे हाती विनाकारण बाळगली नाहीत. पराक्रम करत इतःपर आलोय.  म्हणूनच आपल्या समूख उभे राहण्याचे धैर्य मनात आले आहे. हे यादववीर ते काय करतील त्यांना अश्या काही पराक्रमाने पळवून लावू की, काही क्षणात येथून, नोवरी सोडून पळून जातील." पराक्रमी यादव सेनेबद्दल हे अनुदार उद्गार ऐकून संतापून गद अति क्रोधाने पेटून आणि श्रीहलधर ज्वाला होऊन तर महारथी प्रबळ अग्निसम लाल होऊन शत्रूसेनेवर तुटून पडले.त्यांचा तो विलक्षण आवेश पाहून शत्रूचे सैनिक भांबावून गेले.  सर्व...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४९ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll अश्याच  विचारमग्न अवस्थेत ती होती. तिची ती अवस्था पाहून श्रीकृष्णाला बोध झाला की, ही स्वतःला दोष देत असेल किंवा हिला या घनघोर युद्धाच्या परिणतीची शंका आली असेल. म्हणून तिला धीर द्यायला श्रीकृष्ण म्हणाला " हे रुक्मिणी , तू चिंता करू नकोस. तुझे दिर आणि इतर यादववीर हे या सर्वांना लोळवून तुला सुखरूप द्वारकेस नेण्यास समर्थ आहेत. या सेनेत जे वीर रथी महारथी आहेत त्यांच्याबद्दल ऐकशील तर तुला कल्पना येईल की किती सुरक्षित हातात तू पोचली आहेस आणि तदपश्चात तुझ्या सर्व चिंतांचं आणि शंकांचं  निवारण होईल.  यात मुख्य वीर श्रीबलभद्र अर्थात ज्येष्ठ बंधू श्रीबलरामदादा,  यासोबतच अक्रूर , कृतवर्मा, गद, सारण , सात्विक, चक्रदेव, सात्यकी, अतिदांत , श्र्वशल्फ, महाबाहू, वीर, कंक हे मुख्य वीर यादवसेनेत आहेत. या मुख्य वीरांव्यतिरिक्त अगणित यादव वीर आज इथे उपस्थित आहेत. जे शत्रुसैन्याला त्राही करून सोडतील. विस...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४८

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४८ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll मगधनरेश जरासंधाने घोषणाच केली की आता निर्णायक युद्ध. सर्व शस्त्रसज्ज सैन्य यादवांच्या विशाल सेनेपुढे येऊन उभे राहिले. शल्य, मगधनरेश, चेदिराज, रुक्मि आणि इतर अनेक वीर एका बाजूस आपापल्या विशालकाय सेनेसह आणि दुसरीकडे श्रीबलभद्र आणि श्रीकृष्ण आपल्या अति विशाल यादव सेनेसह एकमेकांसमोर ठाकले. आता तुंबळ युद्ध होणार याची काळालाही काळजी लागली. मगधनरेश जरासंध आणि चेदिराज शिशुपाल कृष्णाला आवाहन करताना गरजले. " अरे गवळ्याच्या पोरा, दूध दही लोणी चोरणारा चोरटा तू , आता ते चोरता चोरता आमच्या विवाहातल्या लेकीबाळी पण चोरायला लागलास.पण हे तुझे चोरीचे धंदे गोकुळात खपवून घेतले जात असतील. इथे क्षणमात्र खपवून घेतले जाणार नाहीत. स्वतःस फार वीर पराक्रमी आणि अवतारी पुरुष असल्याचे भासवतोस मग हे असे विवाहातून दुसऱ्यांची वागदत्त वधू पळवण कितपत तुझ्या अवतारकार्यात शोभतं.  तुला अजूनही समय आहे.काही न बोलता रुक्मिणीस इथेच ठेवून ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४७ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll श्रीकृष्णाने रुक्मिणीस हरण करून यादवांच्या गोटात नेले आणि इकडे अंबामंदिराजवळ हलकल्लोळ माजला. जणू गिधाडांच्या झुंडीत घुसून आपला भाग त्यांच्या डोळ्यादेखत वनकेसरीने न्यावी त्यासम स्थिती झाली. सखींच्या घोळक्यात सुरक्षित असलेली वागदत्त वधू कृष्णाने नजरे समोर नेली त्यामुळे त्या सख्या उद्विग्न अवस्थेत रुदन करत होत्या. इतकी दारुण स्थिती एका क्षणात त्या सर्वांची केली की एक क्षणापूर्वी याच ठिकाणी आनंदीआनंद नांदत होता हे सांगूनसुद्धा खरं वाटलं नसतं. सर्व रथी महारथी यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.  मगधनरेश जरासंध क्रुद्ध होऊन रुक्मिवर अक्षरशः धावून गेला आणि म्हणाला  " मोठा आला होतास ज्येष्ठ बंधू सर्व समर्थ म्हणवून घेत होतास स्वतःला. रक्षणासाठी सज्ज होतास. काय कारणे बंधू आणि रक्षणकर्ता म्हणवून घेतोस. लाज वाटली पाहिजे. तुझ्या डोळ्यादेखत तो यादवचोर तुझ्या बहिणीला वधुवेशात उचलून घेऊन गेला, तेही तुझ्या रा...

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४६ (रुक्मिणी हरण मुख्यकथाभाग आणि प्रसंग सातवा समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४६ (रुक्मिणी हरण मुख्यकथाभाग                                       आणि प्रसंग सातवा समाप्त)   llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll इकडे कृष्णाने रुक्मिणीस पाहून,  मात्र नजरेने, शेवटच्या पायरीजवळ क्षणीक थांबण्यास खुणावले. मी येतोय. या नजरे नजरेतील खेळाचा थांग पृथ्वीवर कोणासही आला नाही, दादा बलराम सोडून. अर्थात स्वर्गस्थ देव, ब्रम्हलोकी ब्रम्हाजी आणि कैलासावर कैलासेश्वर सपत्नीक हा रुक्मिणी हरण सोहळा पाहण्यास अति उत्सुक होते. रुक्मिणीच्या हातात पुरोहितांनी दिलेली वरमाला होती. ती घेऊनच तिने एक एक पायरी उतरायला सुरुवात केली. तीन चार पायऱ्या बाकी असताना कृष्णाने सारथ्याला चुटकी वाजवून खुणेचा इशारा केला आणि शब्दशः विद्युत गतीने कृष्णाचा अष्ट अश्वांचा रथ मंदिराच्या पायऱ्यांकडे निघाला. घटका योग्य होती आणि घटिका पूर्ण झाली होती, मुहूर्त ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४५

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४५ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     या मनोमिलनाच्या समयी सुमुहूर्त सूर्य स्वये धरता जाहला. माध्यान्ही आलेला सूर्य आणि अभिजित नक्षत्राचा सुयोग, घटिकादेखील भरत आलेली, देव सुरवर ज्या क्षणांची प्रतीक्षा करत होते, स्वर्गीचे भाट ज्यासाठी तानपुरा लावून सज्ज होते, ज्यासाठी गंधर्व स्वरधुनी तयार ठेवून बैसले होते, ज्यासाठी अप्सरा पदी घुंगरू बांधून प्रतीक्षा करत होत्या, ज्यासाठी ब्रम्हा महेश सपत्नीक निजस्थानी समाधी सोडून लोचनात सर्व आत्मन आणून तिष्ठत होते तो क्षण समीप आला.  सर्व पूजा उरकून रुक्मिणीस परत लग्नमंडपी परतण्याची अनुमती पुरोहितांनी दिली. कृष्णाने रथास सज्ज राहण्याचे आदेश सरथ्याला दिले. सारथी घोड्यांचा लगाम हाती धरून सज्ज झाला. कृष्ण म्हणाला  " मी ज्या क्षणी चुटकी वाजवीन त्या क्षणी तू त्वरित मंदिराच्या पायऱ्या आहेत त्या दिशेने रथ हाक , वेग वायूचा असुदे, तू मजकडे पाहू सुद्धा नकोस , माझे कार्य मी विलक्षण चपळाईने अगदी ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४४ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     कृष्ण कृष्ण कृष्णच केवळ आता भावे या मनाला  कृष्ण रुक्मिणी व्हावे मीलन  काळही क्षणभर थिजला रुक्मिणी कृष्णांकीत झाली अगणित वेळा नामाने कृष्ण जपाचा अभिषेक ती करते अर्पण या मनाने  नकोच ऐश्वर्याचा डौल मज श्रीकृष्णाचे नयन मनोहर त्या नयनांचे व्हावे दर्शन  आता भावे केवळ यदुवीर भवतापाचे झाले ओझे  हरिरूपाचे औषध घ्यावे हरीविना या देहमनाला  अन आता काही न भावे  या विलक्षण भाव स्थितीत रुक्मिणी केवळ आणि केवळ हरीचेच चिंतन करते आहे. दुसरे काहीही स्वीकारण्यास मनाची तयारी नाही, देह हरीविना जगणे अशक्य झाले. अश्या स्थितीला ज्या वेळी एखादा प्राणी पोहोचतो, त्याचवेळी त्या प्राण्याच्या मनाची साद हरी पर्यंत पोहोचते आणि हरी कोणत्याही रुपात सुटकेसाठी धावून येतो, नव्हे यावेच लागते.  गेले कित्येक दिवस फक्त श्रीकृष्णाचाच विचार तिने केलाय.  एकही क्षण असा गेला नाही रिता या दे...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४३ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     तिच्या हातात ब्रह्मांडाच्या तेजाने तळपणारे कंकण आहेत. हातातील त्या कंकणांचा रुणझुण आवाज जणू रुक्मिणीला कृष्णभेटीची आतुरता लागली आहे हेच वदवून वदवून सांगत होता.  तिच्या तळहाताच्या रंगाबद्दल सांगताना शब्दसंपत्ती आटून गेल्यासारखे भासते. परंतु तरी प्रयत्नमात्रे सांगतो. निलजलातील सौम्य गुलाबी कमलपाकळ्यांसम मखमली तळहात आहेत आणि आता कृष्णमिलनाच्या आतुरतेमुळे त्यांना मदनलालीमा प्राप्त झाली आहे.  तळपायाला गुलाबी रंगाचे नक्षीकाम केले आहे आणि असे ते चरणकमल नागिणीच्या वळसेदार चालीप्रमाणे नागमोडी आहेत आणि एखाद्या सूक्ष्म पुष्पांच्या पाकळ्यांची नाजूकता त्यांच्यात आहे. असे हे चरणकमल भूधरेवरील खडे व कंटक यांच्यामुळे पीडित होऊ नयेत म्हणून सुरवरांनी स्वये त्या चरणतळी निजदेहाचे आच्छादन पसरले आहे.  ज्यामुळे त्यांना सायुज्ज मुक्तीचा लाभ व आनंद मिळत आहे. परंतु हे त्यांचे भाग्य पाहून अनेक सुरवर ...

गोव्यातील तिन्हीसांज

गोव्यात समुद्रकिनारी सुचलेली पण गोव्यातून आल्यावर लिहिलेली कविता  मखमली अस्तर क्षितिजाला अरुण स्पर्शतो जललाटेला जणू इंद्रधनुचे रंग नभाला  गोव्यातील त्या हेमसांजेला लाटांचा घेऊन मागोवा मागे येती अनेक लाटा  त्या स्पर्शाने मममनाला  गोव्याचा भावला किनारा अद्भुत स्पर्श या वाळूचा उघडून गाभारा मनाचा अलगद कवेत कविमनाला  गोवा ठाव मम घेऊन गेला स्वर्ण झळाळी त्या सांजेला जो जो आला तो तो रमला मनातील थकवाही गेला गोव्यातील त्या हेमसांजेला गोव्यातील त्या हेमसांजेला ©® कवी : प्रसन्न आठवले १४/०१/२०२० ०७:०४

डोळ्यात तिच्या दिसती मजला

डोळ्यात तिच्या  दिसती मजला स्वप्ने सुगंधी फुललेली निशिगंधाच्या पानांवरती दवबिंदूंची झालर ओली क्षण एक किनाऱ्यावरती येते क्षणात हातातून निसटते लाट जशी वाळूवरती मग नक्षी जणू की कोरून  जाते अशीच अवघड वाट मनाला, प्रेमाची ही, मोहून गेली  डोळ्यात तुझ्या दिसती ...... दाट धुके, बघ मेघ उभे हे, आतुर झाले  प्रीतिसाठी उगाच डोळ्यांच्या कोनातून लाज बावरी भेटीसाठी एकवार ये पुन्हा अशी तू घेऊन नयनी सांज अबोली डोळ्यात तुझ्या दिसती ........ उगाच का ते अडते पाऊल धुंदी जरी मनी असे दाटली कोमल किरणांच्या स्पर्शाने राधेसम थरथरते मुरली  कोडे सुटणे तिच्याच हाती माझे सारे ती घेऊन गेली डोळ्यात तुझ्या  © कवी : प्रसन्न आठवले ०२/०८/२०१८

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४२ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     रुक्मिणीच्या भाग्याची भाग्यरेखा रेखाटताना प्रारब्धाने कोणत्या कुंचल्याचा आधार घेतला असेल. हे दैव जाणते. कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण यांच्याशी भाग्यरेखा जोडायची म्हणजे कित्येक जन्मांच्या पुण्यराशी एकत्र करून रुक्मिणीचे पुण्य गोठले असेल, त्या कपाळावरील भाग्य रेखेत, ते फक्त श्रीयदुनाथ जाणतात. त्या कपाळाचा कस्तुरी मळवट विधात्याने श्रीकृष्णाच्या प्रभेने भरला होता.  पौर्णिमेच्या चंद्राच्या शुभ्र प्रभावळीने कपाळावरील मळवट तेज:पुंज दिसत होता. त्या माळवंटाखालील भुवया जणू इंद्रधनुष्याने तयार केल्या होत्या. त्यांचा वक्राकार जेंव्हा श्रीकृष्ण बघणार होता, त्यावेळी त्यांच्या वक्रतेने श्रीकृष्ण घायाळ होणार होता. प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या पुण्याईने भरलेलं अखंड सौभाग्याचं अहेवपणाचं कुंकू तिच्या कपाळी विराजित झालं होतं.  तिचं मुख जणू चंद्र स्वये येऊन प्रभा देऊन गेला नभात, असा तेजःपुंज दिसत होता. नभा...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४१

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४१ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     श्रीकृष्ण ज्या रुक्मिणीच्या हरणासाठी सर्व दळभारे अर्थात सर्व दल म्हणजे पायदल अश्वदल गजदल घेऊन येथे पातला होता त्या रुक्मिणीचं आणि तिच्या सौन्दर्याचं वर्णन करताना शब्द तोकडे होतात. श्रीकृष्णप्राप्तीसाठी धर्मशास्त्र वेद पुराण यात सांगितलेली नवविधा भक्ती , तिच्या स्वरूपातील नऊ मुद्रिका तीने आपल्या हातात धारण केल्या आहेत.  नाथांनी सांगितलेल्या या रत्नांचा तात्विक अर्थ असा की, जिने श्रीकृष्ण अर्थात श्रीविष्णू अर्थात जगतपिता यांना पतिरुपात प्राप्त करून घेण्यासाठी नवविधा भक्तीच्या नऊ मार्गांचा अवलंब करून, त्या सर्व मार्गातून जाऊन, यशस्वी होऊन त्या सर्व भक्तीचा गूढार्थ जाणून, तितके जन्म खडतर तपसाधन करून नारायणाला प्राप्त केले आहे, करून घेतलं आहे. म्हणजे तिने केलेल्या त्या खडतर तापसाधनेची फक्त कल्पना मात्रही आपण करू शकणार नाही. अश्या नवविधा भक्तीच्या नऊ मुद्रिका धारण केलेली ती.  या सृष्...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४० (प्रसंग सहावा समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४० (प्रसंग सहावा समाप्त ) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     असे प्रत्येकजण आपापल्या मानसिक अवस्थेत मार्गक्रमण करत होता , अंबामंदिराचा. रुक्मिणी तिच्या सोबत सखी , सुवासिनी, ब्राम्हण पत्नी असे सारे मौनव्रत चालत होते. यथावकाश हा लवाजमा अंबामंदिरासमीप येऊन पोचला. राणी स्वये रुक्मिणीस घेऊन मंदिरात गेली. मंदिरात द्विजवर पूजेसाठी सज्ज होते. रुक्मिणीस पाटावर बसवून द्विराचमन करून द्विजानी पूजा विधी सुरू केला. रुक्मिणी भान हरपून अंबेच्या मूर्तीकडे एकटक पहात होती. अंबेच्या जागीसुद्धा तिला कृष्णच दिसत होता. द्विज वदत असलेल्या मंत्रोच्चारातून तिला कृष्ण नामाचाच घोष ऐकू येत होता. जणू की कृष्णप्राप्तीसाठी केलेले अनुष्ठान आहे आणि त्यात आपण मंत्रोच्चार विधीने हवन करत आहोत.  पूजाविधी सुरू होते. गणेशपूजन सुर्यादी नवग्रहांच्या पूजना नंतर अंबेच्या पूजनाचा विधी सुरू झाला. प्रत्येक पूजे नन्तर समस्त ब्राम्हणांसह प्रजाजनास अनेक मौल्यवान उपहार ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३९ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     अंबामंदिराकडे निघालेला हा सर्व लवाजमा, अभूतपूर्व होता. तुतारी, भेरी, ललकारी या बरोबरच अनेक वाद्ये, वीणा ,वेणू यांचा नादमधुर स्वरमिलाफ, माहुतांचे हत्तींना हाकतानाचे आवाज आणि मधेमधे येणारे हत्तीचे चित्कार, अश्वाचे किंखाळणे, सैनिकांना दिले जाणारे आदेश त्यानुसार होणाऱ्या सैन्याच्या हालचाली यासर्वांमध्ये पुढील घटनांचा वेध घेत, आपल्या चित्तहरत्याचे स्मरण चालू असल्यामुळे शांतपणे जात असलेली रुक्मिणी असं अलौकिक दृश्य होतं.  तिच्या सख्या विरहाच्या कल्पनेने स्तब्ध आणि त्यातच आपल्याही भविष्यातील विवाहाची चिंता करत शांतपणे चालल्या होत्या. येणाऱ्या विरहाची व्यथा रुक्मिणीलासुद्धा होतीच, परंतु तिला आपलं कृष्णासोबत विवाहाचं मनो वांच्छित स्वप्न कसं पार पडेल हे जास्त चिंता देत होतं. म्हणून या विचित्र मानसिक स्थितीची अनुभूती आणि त्याची तिच्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती मंद वाहणारा पवन कृष्णाप्रत पोचवत होता...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३८

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३८ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     रुक्मि असेच अजूनही बरळत होता.  "त्या अंबा भवनाजवळ यादववीर उतरले आहेत. ते सुंदर सुंदर नारी हुडकून उचलून नेतील. त्यांचा काय भरवसा द्यावा. त्यापेक्षा हे कार्य होता होईल तितकं लवकर उरकून घेऊ. मंदिरात तर लग्नानंतरदेखील जाता येईल." रुक्मि इतके बोलला मात्र , राजा भीमक यांना क्रोध अनावर झाला आणि राजा भीमक वदले "तू व्यर्थ माझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आलास, करंटा पुत्र म्हणून. तू वीर राजापोटी जन्म घेऊन भ्याडपणाच्या गोष्टी करतोस. अरे उद्या वेळ आलीच तर काय युद्ध करणार नाहीस का आणि कोणी असे कसे चोरून नेईल. माझ्यासारख्या पराक्रमी राजाला या वयात देखील भीती नाही वाटत. कारण ज्याचा स्वबळावर विश्वास असतो , त्याला कोणत्याही संकटांची आगाऊ भीती वाटत नाही आणि कुलरीत लग्नाआधी मुलीने अंबा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग विवाहविधी पार पाडण्याची आहे. हे लक्षात ठेव. "  राजाने हे बोललेले रुक्मिच्या वर्मी ला...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३७ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    या ठिकाणी नाथमहाराज सुंदर शब्द वापरतात कृष्णआमोदर रस आणि पुढे लिहितात " नयनद्वारे करिती प्राशन करुनि हृदयी आणती कृष्ण सबाह्य पाहती समान समदृष्टी कृष्णाते."  जनमानसाची इतकी उत्तम स्थिती वर्णन करणं अशक्य आहे. कृष्णाच्या रुपात स्वरूपाला पाहून हरवून सर्व विश्व समसमान देखून कृष्णमूर्तीचे ध्यान करत जनसामान्य अद्वैत समजते झाले. सर्व सृष्टी कृष्णमयी आणि कृष्णामध्ये सर्व सृष्टी ह्या वृत्तीचा अनुभव आणि अनुभूती सर्वांना होत होती, अर्थात जे जे भक्तिमय नजरेने आणि श्रध्दायुक्त अंतःकरणाने कृष्णास पहात होते, त्यांस हा अनुभव येत होता. या रूपाचं दर्शन होऊन सर्वजण हाच विचार करत होते की काल शिशुपालाचे वऱ्हाडी पाहिले. त्यात कुठेही नवरेपणाची शोभा जाणवली नाही. ईर्षा , द्वेष , मत्सर आणि गर्व यांचं अभूतपूर्व प्रदर्शन मात्र दिसलं. पण आज मूर्तिमंत जगदीश्वर दर्शन देता झाला. या रुपाची मोहिनी जनसामान्यांना इतकी झ...

मोदींनी काय केलं !!!

मोदींनी काय केलं। !!  प्रश्न ऐकून भुवया उभ्या राहिल्या असतील ना. पण खरंच खूप विचार केला की याचं उत्तर सापडतं.   पूर्ण साडेपाच  वर्ष अनेक आव्हानं उभी करत, अनेक जणांना प्रश्नात टाकत , अनेक जणांच्या पायाखालची जमीन सरकवत , अनेक जणांच्या बुडाला आग लावत , अनेक समीकरण तोडत , अनेक नवी समीकरणं जन्माला घालत, अनेक सुप्त समंध जागे करत, अनेक वज्राघात झेलत आणि अनेक घात करत, अनेक स्थित्यंतरं घडवत हा माणूस निघालाय. अनेक नवीन गोष्टी कल्पनेपलीकडील करत करत पुढे जातोय.  खूप जणांनी फेकू इत्यादी अनेक विशेषणांनी शेलक्या शिव्या घालत जहरी टीका केली. हा माणूस आपलं काम करत करत पुढे पुढे निघाला. बरं मंत्री आपलं आपलं काम करत आहेत ते चालूच राहील. त्यावर मला लिहायचं नाहीये. कारण त्यावर लिहिणारे अनेक आहेत. मी एका वेगळ्याच विषयावर लिहिणार आहे. कदाचित यावर लिहिणारा मी पहिलाच असेन. कारण यावरील कोणताही लेख वाचनात आला नाही.  तर माझा मुद्दा रीतसर मांडतो. मोदींनी काय काय केलं खऱ्या अर्थाने. इतकी उलथापालथ फक्त एका निर्णयाने केली की आज अनेक अस्तनीतले निखारे आणि अनेक जुने जाणते पक्ष आपलं मुळ रूप घे...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३६ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    रायासवे स्वयं श्रीकृष्ण रथारुढ होऊन कौंडिण्यपूर नगरात जायला निघाले. नगरात आतापर्यंत ही वार्ता सर्वदूर गेली की, श्रीहलधर आणि श्रीकृष्ण विवाहसमारंभानिमित्त दाखल झाले आहेत. इतकंच नव्हे तर नगरात प्रजाजनांच्या आग्रहाखातर व दर्शनासाठी श्रीहरी येत आहेत. मार्गात हजारोंच्या संख्येने,  मार्गाच्या दुतर्फा,  कृष्णदर्शनार्थ उपस्थित राहून प्रजाजन  कृष्ण नामाचा जयघोष करत होते.  अनेकांनी पुष्पहार , पुष्पे इत्यादी देखील आणलं होतं. अर्थात विवाहाप्रीत्यर्थ सर्व तयारी यथोचित असल्यामुळे हार , तुरे, पुष्पे यांचा सुकाळ होता. कृष्ण सर्वांच्या प्रणीपाताचा, नमनाचा  व नमस्काराचा स्वीकार करत आणि सर्वांना आशिष देत मार्गस्थ चालला होता. विवाहविधी सुरू असून देखील तिकडची सर्व गर्दी ही कृष्णदर्शनार्थ लोटली होती.  श्रीकृष्ण साक्षात मूर्तिमंत चैतन्य , समाधान, सात्त्विकता.  निळासावळा देह , ...