Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

भोग आणि ईश्वर ६२५

भोग आणि ईश्वर ६२५     वास्तविक प्रत्येक मनाला एकाग्र करून, अंतिम उद्देशा साठी तयार केल्यानंतर, त्या शांत झालेल्या मनाला, साधनेचा परिसस्पर्श देऊन, त्या एकमात्र ईश्वरी नामाला स्मरण्याची पायरी गाठली की, सर्व उद्देशांची पूर्तता झालीच असं म्हणता येईल. पण... आणि हा पणच, हे उद्देश आणि आपला निर्धार, यामधील मुख्य अडथळा होतो. कारण मनाची एकाग्रता साधण्यासाठी, अनेक खटपटी लटपटी करूनही, मन कोणत्या गोष्टीने, भरकटेल आणि व्यर्थ कर्मात, धर्मात अडकून, प्रवाह सोडेल, हे ईश्वराच्या हातात सुद्धा नाही.  ही गोष्ट वा गुह्य प्रत्यक्ष ईश्वर जाणूनही, बदलू शकत नाही. कारण त्यासाठी लागणारी, एकाग्रतेची ऊर्जा, शक्ती, तेज आणि ओज हे मानवी मनाला प्रदान केल्यानंतर, ईश्वराने स्वतःला, त्या सर्वांपासून अलग केलेलं आहे. हे सर्वात मोठं गुह्य आहे. ईश्वराचा त्यातील सहभाग, मानवी मनाने त्याला अंतरात्म्या पासून साद घातली तरच, घडून येऊ शकतो.  त्यामुळे मनाचा इश्वराशी संवाद साधण्यासाठी, मनाला एकाग्र आणि शांत करून, तयार करणं, ही यातील प्राथमिक आवश्यकता आहे आणि हाच सर्व साधनांचा प्राण आहे. जर हे एकदा साधलं आणि मनाला या...

भोग आणि ईश्वर ६२४

भोग आणि ईश्वर ६२४     काल आपण पाहिल्याप्रमाणे, मनाला शांत किंवा एकाग्र होण्यासाठी, कुठल्यातरी नादाचा, कल्पनेचा, स्वर सुर यांचा, आनंदात घालवलेल्या क्षणांचा, अश्या कुठल्यातरी माध्यमाचा धागा पकडावा लागतो. हे मानसशास्त्र सुद्धा सांगतं आणि धर्मशास्त्र सुद्धा सांगतं. यामध्ये एकाग्र होण्यासाठी हा शब्द मुद्दाम वापरला, कारण सुरवातीला, आपल्याला मनाला कुठेतरी गुंतवून शांततेचा आणि एकाग्रतेचा अनुभव द्यावा लागतो. म्हणजे एकदातरी या अनुभवाची गोडी घडवावी किंवा व्हावी लागते. तरच मनाला, त्याचा आस्वाद जाणवतो आणि मन ती शांतता आणि एकाग्रता यांत,स्वतःला गुंतवून घेण्यासाठी सिद्ध किंवा तयार होतं. ही जाणिवेची जागृती, हाच जगतातील सर्व साधनांचा उद्देश आणि आत्मा आहे. नवविधा भक्तीचा, कर्मकांडाचा, ज्ञान, वैराग्य, सन्यास इत्यादी सर्व मार्गांचा, अंततः उद्देश मनाला त्या गोडीपर्यंत घेऊन जाणं हाच आहे. हेच अध्यात्मिक ज्ञानाचं सर्वात मोठं गुह्य आणि सार आहे.  एकदा माणसाच्या मनाला, याची गोडी, स्वाद, आस्वाद यांचा अनुभव आला की, मनच आपोआप त्याच्या प्राप्ती साठी मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न करतं. अशांत, अस्वस्थ, ...

भोग आणि ईश्वर ६२३

भोग आणि ईश्वर ६२३     कालचा विषय पुढे नेऊया.   या संपूर्ण विश्वाचा आधार असलेला विश्वात्मा, नेहमी शांततेत रत असतो. कारण मन प्रगाढ शांततेत असताना, मन खऱ्या अर्थाने आनंद अनुभवतं. म्हणजे एरवी त्याला अनुभवास येणारा आनंद हा प्रसंगानुसार येणारा असतो. वास्तविक अर्थाने तो खरा आणि नित्य अनुभव किंवा आस्वाद नाही. खरंतर आस्वाद हा एखाद्या गोष्टीची चव चाखली की वापरला जाणारा शब्द आहे.  तो शब्द इथे कसा वापरता येईल, असा एक सहज प्रश्न मनात येऊ शकतो. पण आपण तेही जाणून पुढे जाऊ. आस्वाद हा एकप्रकारचा अनुभव असतो. सहसा चवीसाठी वापरतो. पण कोणत्याही गोष्टीचा अनुभव जेंव्हा जिव्हे व्यतिरिक्त मन घेतं, तेंव्हा तोही एक प्रकारचा आस्वादच असतो. आस्वाद घेणं ही एखाद्या पदार्थाचा गंध आल्यानंतर मनात, त्याबद्दल इच्छा जागृत झाल्यानंतर घडणारी कृती आहे.  तर असा आस्वाद शांततेचा घेण्यासाठी मनात तशी इच्छा जागृत होणं महत्वाचं आहे. यासाठी आपलाच एखादा अनुभव आठवावा. उदाहरणार्थ, आपण कधीतरी एखाद्या थंड हवेच्या स्थळी, किंवा आपल्या आवडत्या गावी जातो. तिथे आपण एक वेगळाच आनंद अनुभवतो. तो वास्तविक अनुभव असतो. प...

भोग आणि ईश्वर ६२२

भोग आणि ईश्वर ६२२     कालचा विषय पुढे नेऊया. पण खरच असं connect करता किंवा होता येतं का आणि यासाठी काय, कसे प्रयत्न करावेत, कोणत्या घटकांची जाणीवपूर्वक मशागत मनात करावी व कोणते तण काढून टाकावेत, यावर आजच्या भागात चर्चा करूया.   मुळात मनाला असं connect किंवा dosconnect करता येतं, हीच बऱ्याच जणांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे. कारण देहाच्या वेष्टनात, नसानसात भरून राहिलेलं मन, ज्ञानेंद्रियांच्या समक्ष, साक्षीने वा समोर घडणाऱ्या घटनांच्या प्रभावापासून अलग किंवा aloof ठेवता येणं ही एक तपश्चर्या आहे. तपश्चर्या यासाठी की, तसं स्वतःच्या मनाला देहापासून विलग करता येण्यासाठी मनाला काही शिस्त किंवा सवय करावी किंवा एकप्रकारची विशिष्ट वागणूक द्यावी लागते.  यासाठी मनाला एकतर शांत, आजूबाजूच्या कोणत्याही घटनेपासून separate करता येण्याची लावण्यासाठी, सर्वात प्रथम, अतिचंचल, शीघ्र दोलायमान होण्यापासून परावृत्त करता येण्याचा अभ्यास करता आला पाहिजे. याचं एक शास्त्र आहे. या प्रक्रियेत सर्वात आधी मनाला शांत करण्याचा अभ्यास करावा लागतो.  यासाठी योग, ध्यान, नामस्मरण इत्यादी माध्यमातून ...

भोग आणि ईश्वर ६२१

भोग आणि ईश्वर ६२१    श्रावणात सुरू झालेला उत्साहाचा झरा, पुढे गणपतीला एका छोट्या नदीचं रूप धारण करतो. मधले पक्षातले पंधरा दिवस, जरा त्या नदीला वळणं लावण्यात जातात. त्यानंतर नवरात्रात, उत्साहाची तीच छोटी नदी, एका मोठ्या विस्तीर्ण नदीचा आकार धारण करते.  नवरात्रातील या पूर्णस्वरुप नदीच्या पात्रातील उत्साह, संपूर्ण मन:क्षेत्र व्यापून टाकण्यासाठी, वाहायला सुरुवात होते. साधारण दसऱ्याला, मनाचा हा उत्साह, मनाचं हे स्वास्थ्यरुप तेजोवलय, मनातील अनेक निरुत्साही, निराशाग्रस्त, नकारात्मक वलयाना, लहरींना, नष्ट करून, शुद्ध, सकारात्मक, उत्साहित लहरी व वलयात परावर्तित वा रूपांतरित करतो.  इथून, म्हणजे दसऱ्यापासून या उत्साहाच्या प्रचंड जलाशयाची वाटचाल, दिवाळी नामक महाप्रचंड महासागराकडे सुरू झालेली असते. मनाला पंचगुणीत, शतगुणीत, सहस्त्रगुणीत आनंदी आणि उत्साही करण्याच्या मार्गातील, हा दसरा हा खूप महत्वाचा आणि उत्साहाचा प्रारंभ दिन आहे.  म्हणूनच, या दिवशी, उत्साहाच्या या महासागराकडे नेणाऱ्या, आनंदाच्या विस्तीर्ण जलाशयातील काही भाग, आपण आपल्या मनाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. यास...

भोग आणि ईश्वर ६२०

भोग आणि ईश्वर ६२०     माणूस उपभोग घेत असताना कधीही हा विचार करत नाही, जो भोग भोगताना करतो. तो विचार म्हणजे, आता भोगांची परिसीमा झाली, माझी इथून पुढे भोग भोग ण्याची तयारी व इच्छा नाही. पण हाच विचार मनुष्य उपभोग, सुख इत्यादी काळात कधीही करत नाही. त्या काळात, हेच सुख, हाच काळ, हेच सर्व अमर्याद काळा पर्यंत असच सुरू राहूदे, हाच विचार त्याच्या मनात सतत येतो. तश्याच इच्छा मनात जागृत होतात. म्हणजेच सुखाबाबत मनुष्य नेहमी सकारात्मक असतो.  पण दुःख व भोग याबाबत कायम असाच विचार माणूस करतो की, मला हे का प्राप्त झालं, मी असं काय कर्म केलं, किंवा मी कुणाचं असं काय वाकडं केलं की, हे भोग मला प्राप्त झाले. अजून कितिकाळ हे दुःखं माझ्या वाट्याला येणार आहे. इथेच खूप मोठी चूक आपण करून बसतो. म्हणजे काय करतो तर, नकारात्मक दृष्टी धरून, अनिच्छेने स्वीकारून, त्यावर मनाला, टोचण्या देतो. त्याचा अत्यंत चुकीचा परिणाम होतो. कसा त्यावर चिंतन करूया.  मुळातच दुःख भोग हा नकारात्मक काळ असतो. त्यातच आपण विचारही नकारात्मक करतो. तेही एकप्रकारचं कर्मच आहे. तेही आपला परिणाम दाखवणार किंवा घडवून आणणार. अश...

भोग आणि ईश्वर ६१९

भोग आणि ईश्वर ६१९     इच्छा नसतानाही या मालिकेत दीर्घ खंड पडला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, मालिकेचा मागील शेवटचा लेख पुन्हा मांडत आहे, म्हणजे विषयाची सलगता राहील. त्यामुळे संध्याकाळी लेख क्रमांक ६२० मांडून, महाराज कृपेने, ही मालिका पुन्हा सुरू होईल, हा विश्वास धरुया.  भोग या शब्दाचा विचार केला तर त्यातच आपल्याला आपल्या भोग आणि उपभोग याचं रहस्य सापडेल. दोन्ही शब्दात भोग हा शब्द आहेच. म्हणजे सुखात आणि दुःखात दोन्ही परिस्थितीत देह जे भोग भोगतो, त्याची संपूर्ण जबाबदारी वास्तविक स्वत:वर येते. कारण भोग भोगण यात भोगणारा तोच असतो, जो त्यांची इच्छा मनात धारण करतो. आता इथे प्रश्न निर्माण होतो की कोणी कधीतरी भोग अर्थात दुःख किंवा त्रास यांची कामना करेल का.  प्रश्न योग्य आहे. कारण कोणीही कधीही आपल्याला उपभोग प्राप्त व्हावा यासाठीच कर्म करतो. कर्माचा सबंध देह, बुद्धी व मन यांच्याशी येतो. देहाने केलेलं कर्म बुद्धी व मन यांना मान्य असो वा नसो, पण देह मन व बुद्धी तिन्हींना भोगावे लागतात आणि उपभोग सुद्धा तिघांनाही प्राप्त होतात. आता मूळ प्रश्नाकडे येऊन, त्यांचं चिंतन करूया...

भोग आणि ईश्वर ६१८

भोग आणि ईश्वर ६१८ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)  अतींद्रिय शक्ति म्हणजे विधात्याने या देहात केलेली अत्युच्च यंत्रणा सुरू होऊन, अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक, काही संदेशयंत्रणा सुरू झाली, की विधात्याशी संवाद साधण्याच्या कामाला कुठेतरी, सुरुवात होऊ शकते. पण या अतींद्रिय शक्तीचा वापर हा फक्त सकारात्मक आणि सहाय्यक कार्यासाठी केला जावा, अशी विधात्याची देखील इच्छा किंवा अपेक्षा आहे. म्हणूनच या शक्तीचा अती व गैरवापर टाळणे हे श्रेयस्कर. मनाच्या एकाग्रतेचा सहजसुंदर परिणाम अस, ज्याला म्हणता येईल आणि मनाच्या शक्तीच्या विकासाच्या पात्रतेवरून या शक्तीचा विकास अवलंबून असतो. किंबहुना अध्यात्मिक मार्गावरील सर्वच वाटचाल ही मनाच्या विकसित होण्यावर आणि अतिरिक्त ऊर्जा व शक्ती प्राप्त करण्यावर अवलंबून आहे. अतींद्रिय शक्ती ही अनेक प्रकारच्या उपसानेतून प्राप्त करता येते. प्राप्त केलेली, टिकवून ठेवणं आणि टिकल्यानंतर, तिचा सुनियोजित व योग्य पद्धतीने उपयोग किंवा सदुपयोग करण महत्वाचं आहे. अतींद्रिय शक्ती प्राप्ती किंवा विकास हे कुंडलिनी शक्ती प्राप्ती, या इतकचं गूढ आणि गहन आहे. मुळात ती कोणाला प्राप...

भोग आणि ईश्वर ६१७

भोग आणि ईश्वर ६१७ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)     अतींद्रिय शक्ती म्हणजे नेमकं काय हे जरा विस्ताराने जाणून घेऊ. या जगात, जे आपल्या ज्ञानेंद्रियांना दिसतं, जाणवतं, कळतं ते फक्त देहाच्या क्षमतेवर. तेच सर्वमान्य ठरतं. कारण जे दिसतं तेच योग्य समजलं जातं. म्हणजे जाणिवांची ज्ञानाची, अनुमानाची, अभ्यासाची मर्यादा ही फक्त देहाच्या शक्ती व ऊर्जेवर अवलबून आहे, असं सर्वसामान्य ज्ञान सांगतं. म्हणजे जे आणि जेवढ आपण, ज्ञानेंद्रियांचा आधार घेऊन आणि त्यांच्या अत्युच्च क्षमतेनुसार, प्राप्त ज्ञानाचं, लहरिंच आकलन, संकलन, केलं, तरी त्याला काही मर्यादा आहेत आणि असतात. परंतु, मनाच्या अमर्याद शक्तीचा विकास, विस्तार आणि वापर केला तर, या विश्वातील, विधात्याच्या अमर्याद साधनांचा उपयोग करून, विधात्याला अपेक्षित, अध्यात्मिक मार्गावर प्रगती पथावर मार्गक्रमण करू शकतो. यासाठी लागणारी ज्ञानेंद्रिय आणि जाणिवांची शक्ती ऊर्जा आणि पात्रता मिळवण्यासाठी, भौतिक जगतातील उपायांच्या पलीकडे जाऊन उपाय करण गरजेचं आहे. अशी पात्रता एखाद्या जन्मात क्वचितच पाहायला मिळते. अर्थात एखाद्याला अशी पात्रता मिळालेली क...

भोग आणि ईश्वर ६१६

भोग आणि ईश्वर ६१६ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)     कालच्या विषयाबाबत एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल. ती म्हणजे, अशी शक्ती अस्तित्वात आहे की हे भास असतात. मुळात अशी काही शक्ती आहे का. तर याचं उत्तर श्रीविष्णू सहस्त्रनामस्तोत्रम् यामधे सापडतं. महा विष्णूच्या नामावलीतील एक नावच, याचं खुलासा करतं. अठराव्या श्लोकात श्री विष्णूंचं एक नाम आहे अतींद्रियो. याचे अनेक अर्थ होतात. मुख्य दोन अर्थ म्हणजे, इंद्रियांना प्राप्त न होणारा किंवा इंद्रियांच्या अतीपार असणारा.  पण दुसऱ्या अर्थाने इंद्रियातीत अशी शक्ती जी, या जगताच्या पार असणारं ज्ञान प्राप्त करून देते. म्हणजेच ज्या ज्यावेळी अश्या शक्तीला साद घातली जाईल, त्या त्यावेळी, ती शक्ती कार्यरत होऊन, साधकाला संकेत प्राप्त करून देईल आणि त्याला साधनेत प्रगती प्राप्त करून देईल. याचा दुसरा अर्थ असा होतो की, यामधे प्राप्त संकेत, त्या शक्तीच्या इच्छेनेच प्राप्त होतात, हे नक्कीच. पण असे संकेत वा संदेश विशिष्ट व्यक्तींना आणि विशिष्ट वेळीच प्राप्त होतात का. याचं उत्तर हो असच देता येईल. विशिष्ट व्यक्ती जिला आपल्या साधनेत काही प्रमाणात...

भोग आणि ईश्वर ६१५

भोग आणि ईश्वर ६१५ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)    अतींद्रिय शक्ती किंवा अंतर्ज्ञान असं ज्याला सर्वसामान्य पणे संबोधलं जातं, त्यांचं सुद्धा एक विज्ञान आहे. मुळात सर्वच सृष्टी.विधाता नामक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांने, जेंव्हा वैज्ञानिक आधारावरच रचली, त्यावेळी त्यासंबंधीच्या सर्व छोटयातील छोट्या गोष्टींपासून, तारांगण, जीवसृष्टी, ग्रह, आकाशगंगा, अवकाश या मोठ्यातील मोठ्या, सर्वच गोष्टी विशिष्ट नियमांवर आधारित केल्या आहेत. म्हणूनच विश्व नियंत्याच्या बाबतीत, किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी असलेला मार्ग आणि त्या संबंधीचे नियम शास्त्रीय वैज्ञानिक आधारावरच रचले गेले आहेत. अष्टांगयोगविज्ञान , शस्त्रविज्ञान, शास्त्र, नवविधा भक्ती, हे सर्वच विशिष्ट नियमांवर बेतलेलं आहे. म्हणूनच त्याचाच भाग असलेले, अंतर्ज्ञांन किंवा अतींद्रिय शक्ती किंवा intution व telepathy, यांचे देखील काही नियम व आधार आहेतच. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल काही अनुभव आल्यावर आपण असं नेहमी म्हणतो की, त्या व्यक्तीला अंतर्ज्ञांन आहे किंवा काही व्यक्तींना स्वप्नात काही संकेत मिळतात आणि त्यातील बरेचसे खरे होतात. पण हे म्हणताना...

भोग आणि ईश्वर ६१४

भोग आणि ईश्वर ६१४ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)     आपल्याकडे एक म्हण आहे की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. पण हे अध्यात्मात जास्त सत्य आहे. कारण सामान्यपणे देह, जो चर्मचक्षूना दिसतो, त्याच्या संदर्भात आपण सर्व भाव भावना किंवा एकूणच सर्व प्रपंच करतो. याचं कारणच आहे की, जे डोळ्यांना दिसतं, ते सत्य. याबाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की, बुद्धीला काही प्रमाणात आणि मनाला संपूर्णपणे, देहाच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचं ज्ञान, जाणीव, आकलन, अनुमान, अवलोकन होऊ शकतं.  अवलोकन यासाठी म्हटलं की, देहाच्या नेत्राप्रमाणे, मनाला आणि बुद्धीला, स्वतःचे नेत्र अर्थात चक्षु असतात, ज्यांना जाणीवा म्हटलं जातं. म्हणून मन, जर सक्षम किंवा शिक्षित असेल तर, या बुद्धीचे आणि मनाचे हे नेत्र उघडून चक्षुपलीकडील जग पाहू किंवा समजू शकतं. म्हणजे डोळे आणि कान यांच्या पलीकडे जग नक्कीच जाणता येतं. हे जरी सहजसाध्य नसलं, तरी बुद्धीला व मनाला त्याची सवय किंवा शिक्षण असावं लागतं का, किंवा असं शिक्षण घेऊन या गोष्टी आत्मसात करता येतात का.  यावर विचारपूर्वक चिंतन करतांना हे लक्षात येईल की, या ग...

भोग आणि ईश्वर ६१३

भोग आणि ईश्वर ६१३ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)    या जगतात आल्यावर आपण अनेक प्रकारचे भ्रम किंवा अज्ञान यात जगत असतो. हे अज्ञान अनेक गोष्टींबद्दल असतं. याला तीन चार भागात विभागता येईल. एक स्वतःबद्दल विश्वाबद्दल, विश्वनियंत्याबद्दल, एकूण. व्यवस्थे बद्दल. स्वतःबद्दल असलेल्या अज्ञानात मुख्यतः, अहं अनेक प्रकारचे भ्रम आणि अज्ञान निर्माण करतो. कारण अहं किंवा अहंकार असणं म्हणजे बुद्धीच्या आणि मनाच्या चक्षुंवर एक प्रकारची पट्टी असणं. ज्यामुळे विचारांना, मतीला अर्थात बुद्धीला एक वेगळीच दिशा मिळते. ज्यामुळे आपले तर्क, अनुमान, निष्कर्ष, अंदाज, आडाखे सर्व चुकतं जातात. अहं बरेचवेळा बुद्धीवर एक प्रकारचा पडदा निर्माण करतो. याचं अहंसह येतो तो क्रोध. हा क्रोध अनेक दुर्गुणांचा राजा आहे. ज्यामुळे सत्यसुद्धा विपरीत दिसतं आ ननi आपली स्वतःची अधोगती होत आहे, याचंदेखील भान राहात नाही. कारण क्रोध अनेक चुकांचा पाया आहे. त्यामुळे अहं आणि त्यासोबतच येणारा क्रोध हे दोन खूप मोठ्या अज्ञानाचे जनक आहेत.  विस्ताराने किंवा दूरदृष्टीने विचार केला तर, माणसाचे स्वतःबद्दल असलेलं ज्ञान किंवा अज्ञान यावर...

भोग आणि ईश्वर ६१२

भोग आणि ईश्वर ६१२ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)  शरण आणि स्मरण या दोन मार्गांनी कोणतीही व्यक्ती, निश्चितपणे, सन्मार्गाला वाटचाल करायला सुरुवात करू शक्ती. यामधे श्रद्धा आणि विश्वास यांचा हात धरला तर नक्कीच सामान्य माणूस, आपल्या संचीतातील एक एक पदर सोडवून घेऊ शकतो. ईश्वराच्या स्मरणात इतकी प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे की, त्यापुढे ब्रम्हांडातील कोणतीही शक्ती नक्कीच निष्प्रभ आणि शक्तिहीन होऊ शकते.  अर्थात म्हटलं तर हे सोपं आहे आणि म्हटलं तर कठीण आहे. म्हणजे कसं हे पाहूया. आपण आपल्या प्रापंचिक व्यापात असताना सुद्धा, ज्या ईश्वराने अर्थात परम पित्याने, आपल्या सर्व पुत्रांना या भूलोकी धाडून, संसार, जगरहाटी, भुलोकीचा वास, करण्यास पाठवून, इथून पुन्हा परत त्या परम पित्याकडे,. जाण्याची वाट वा मार्ग धरण्याची इच्छा, उत्पन्न होण्यासाठी, या जगताची अशाश्वत व्यवस्था निर्माण केली, त्याचं परम पित्याला विसरून, मायेचा हात हातात घेऊन, अनेक जन्माच्या मुक्कामाची सोय, त्याचेच पुत्र, स्वकर्माने करतात, त्या आपल्या पुत्राच्या स्थितीकडे पाहून, त्याचं ईश्वराची अवस्था काय होत असेल, याची कल्पना आपल्या स...

भोग आणि ईश्वर ६११

भोग आणि ईश्वर ६११ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)  ईश्वर स्वतः त्याच्या नियमांनी बद्ध आहे, हे नक्कीच. तो त्या नियमांना बदलणार नाही आणि त्याविरुद्ध जाणार नाही हे देखील शतशः सत्य आहे. पण तरीही दयेचा सागर आणि करुणेचा अपार पर्वत असलेला ईश्वर, स्वतः नक्कीच काहीतरी व्यवस्था करण्यास, समर्थ आहेच. पण त्यासाठी तो ईश्वर काहीतरी ठोस व्यवस्था नक्कीच करणार, हे उघड आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे, आजपर्यंत त्याने ब्रम्हांडातील केलेली प्रत्येक निर्मिती ही एक उत्तम व्यवस्थेचं उदाहरण आहे.  म्हणूनच या गुंतागुंतीच्या ब्रम्हांड व्यवस्थेतून, सहजी बाहेर पडण्यासाठी, ज्ञान, सांख्ययोग, कर्मयोग इत्यादी अनेक योग असल्याचं, वेद, पुराणं, अवतार, ऋषी मुनी, साधु संत, महात्मे, यांच्या उदाहरणातून दाखवून दिल्यानंतर सुद्धा,त्याचं ईश्वराने मात्र दया आणि करुणेपोटी, आपल्या सारख्या सर्वसामान्य जनांना, एक इतका सोपा मार्ग घालून व सांगून दिला आहे की, त्या मार्गाचा अवलंब करण्याचं नुसतं ठरवलं तरी, त्या संकल्पाने सुद्धा तो ईश्वर हरखून जातो आणि त्या संकल्प करत्याच, हित, क्षेम, कुशल ईश्वर पाहतो.  नव्हे तसं वचनच त्य...

भोग आणि ईश्वर ६१०

भोग आणि ईश्वर ६१० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनाला ईश्वराकडे वळवावं असं काल म्हटलं. पण हे का त्यावर आज चर्चा करूया. मुळातच पंचमहाभूांचे म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, याचं बरोबर बुद्धी, मन आणि अहंकार हे अष्टांग मिळून, भगवंतांनी तयार केलेली या जगताची अभिव्यक्ती आहे. ती त्याच पद्धतीने भगवंताकडे परत गेली पाहिजे. कारण त्यातून सर्व जगतातील जीवसृष्टी ईश्वराने निर्माण करून, जगताचा हा खेळ सुरू केला.  पण या अष्ट अंगांची निर्मिती स्वतः ईश्वराने केलेली असल्यामुळे, वास्तविक यातील प्रत्येक गोष्ट, ईश्वरा प्रती लीन असली पाहिजे. किंवा नैतिक दृष्टीने, तसं अपेक्षित आहे. या जगताचा आधारच तो आहे की, जे जिथून निर्माण झालं, ते त्याच्याकडे पुन्हा पोचतं केलं पाहिजे. या तत्वाच्या पूर्तीनुसर पंचमहाभूते ही देहाच्या निर्मितीसाठी वापरली जातात आणि देहाच्या समाप्तीनंतर ही पाचही तत्व अनंतात विलीन होतात. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या पाचही जण, त्या त्या तत्वतः संमिलित होतात.  आता राहता राहिली तीन तत्व जी विधात्याने निर्माण करूया मानवाला पूर्णत्व प्रदान केलं. मन बुध्दी आणि अहंकार. वास्तविक अहंकार म्हणजे...

भोग आणि ईश्वर ६०९

भोग आणि ईश्वर ६०९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनाच्या या स्थितीला आपण स्वतःच जबाबदार असतो हे एकदा लक्षात आल्यावर, आपण सुधारून, निदान इथून पुढे नीट वागून, मनाची सद्यस्थिती योग्य पदावर आणली पाहिजे. असं खरतर सहज व्हायला हवं. पण असं हित नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. म्हणजे आपला स्वतःचा सुद्धा स्वतःबद्दल नक्की हेच म्हणू की, आपण जरी एखादी गोष्ट समजलो, तरी त्यानुसार तसे वागतोच असं नाही.  याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे माया. जी माया वास्तविक ईश्वराची छाया आहे, तीच या जगतातील प्रत्येक जीवाला, इश्वरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. कदाचित हे विभ्रम, आभास, अहं, न्यून, इत्यादी सर्व ही मायेच्या माध्यमातून भगवंतांचीच योजना असेल. प्राणी मात्रांना विषयात,क्रोधात,भावनेत,अज्ञान अधःकारात आपल्या चुकांच्या फेऱ्यात फिरत असताना, आपल्या चुकांची कुठेतरी जाणीव होऊन, मार्ग शोधण्यासाठी तरी, आजूबाजूला बघेल, शोधेल, विचार करेल. या विचारातून, त्याला चिंतनाची गोडी लागेल, त्या चिंतनातून, माणसं हा विचार करतील की, हे असं का घडतंय, आपण कधीतरी केलेल्या चुका, पुढे आपल्याला त्रास देतात. तर मग यातून, निदान पुढच्या...

भोग आणि ईश्वर ६०८

भोग आणि ईश्वर ६०८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आपण गेल्या दोन तीन भागात पाहिलं त्याप्रमाणे माणसाच्या मनाची जडणघडण ही तीन घटकांची मिळून होते. भौतिक रासायनिक आणि जैविक. पण आपण पाहिलं त्याप्रमाणे हे तीन घटक वेगवेगळे नाही तर एकत्रित संयुक्तपणे माणसाची मानसिक जडणघडण ठरवतात. म्हणून आता या घटकांचा एकत्रित विचार करूया. माणसाच्या मनाची सर्वात प्रथम देहात येताना उभारणी होते.  म्हणजे जैविक घटक प्रथम येतात. त्या व्यक्तीचं कुटुंब, पूर्वज आणि त्यांच संचित या घटकांचं मिळून जैविक विश्लेषण करताना, एक गोष्ट लक्षात येते की, साचितात असेल त्यानुसार त्या कुटुंबात, त्या परिस्थितीत, त्या काळात, त्या त्या कर्मांची फेड करून घेण्यासाठी, त्या व्यक्तीचा जन्म होतो. म्हणजे संचितात जे आपण आपल्या कर्मानुसार आधी लिहून ठेवलं असेल त्यानुसार आपणच आपल्या मानसिक घडणीचे घटक ठरवतो.  म्हणजे, जर काही कष्ट काळज्या, चिंता, त्रास त्या आयुष्यात आपणच लिहून ठेवले असतील, त्यानुसार आपण त्या कुटुंबात जन्म घेऊन, ते भोग भोगण्या साठीची मनाची घडण प्राप्त करवून घेतो. आता या ठिकाणी हे लक्षात येईल की, भौतिक घटकांची ही पार्श्वभू...

भोग आणि ईश्वर ६०७

भोग आणि ईश्वर ६०७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     मानसिक जडणघडण ही जशी भौतिक घटकांवर अवलंबून असते, तशीच ती रासायनिक व जैविक घटकांवर सुद्धा अवलंबून असते. भौतिक घटक आपण पाहिले. आता हे जैविक व रासायनिक घटक आपण एकत्रित पाहूया. म्हणजे आपल्याला त्यांच्या परिणामांचा योग्य अभ्यास करता येईल.आपण पाहिलं की रासायनिक घटक म्हणजे, शरीरांतर्गत मूलद्रव्य, रासायनिक प्रक्रिया, पाझरणारे रस, स्त्राव, रक्त प्रवाह इत्यादी सर्व.  यातील बऱ्याच घटकांवर शारीरिक ऊर्जा, शक्ती आणि त्याद्वारे मनाच्या ऊर्जा व शक्ती काही प्रमाणात अवलंबून असतात. निदान काही बाबतीत, मानसिकता, मनाचं स्वास्थ्य, सामर्थ्य हे यावर अवलंबून असतं. मुळात रासायनिक प्रक्रिया, जिच्या आधारावर नसा, धमन्या, मज्जासंस्था,चेतापेशी, मेंदूचं, हृदयाचं,पोटाच, जननेंद्रिय, इत्यादी अनेक कार्ये अवलंबून असतात. या प्रक्रिया, अनेकदा माणसाच्या शरीराचं स्वास्थ्य, ठरवत असतात. त्यामुळे त्यांच्या कुशलतेवर, मन आणि इच्छाशक्तीच्या लहरी अवलंबून असतात. यातील, मूलतः जन्मतः मिळालेल्या गोष्टी किंवा सुदृढता वा दुर्बलता या पूर्वसंचिताचा भाग असल्यामुळे, या जन्म...

भोग आणि ईश्वर ६०६

भोग आणि ईश्वर ६०६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     भौतिक कारणं आणि त्याचे मनावर किंवा मानसिकतेवर होणारे परिणाम, हा स्वतंत्र विषय आहे. पण संक्षिप्त पणे विचार करताना,यामधे दोन प्रकार मुख्यतः होऊ शकतात एक म्हणजे आपल्या नियंत्रणाबाहेर असलेले भौतिक घटक आणि आपल्या अर्थात मानवी नियंत्रणात असलेले भौतिक घटक. यातील आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या घटकांवर आपण चिंतन व चर्चा करणं हे निरर्थक आहे. पण यामधे आपल्याला लक्षात घेण्या सारखी गोष्ट ही की, यातील सकारात्मक घटकांनी आपण जास्त वाहावत जाता कामा नये आणि नकारात्मक घटकांनी आपण निराश होता कामा नये. याचं कारणच हे आहे की, या घटकांवर आपलं कोणतंही नियंत्रण नाही, अर्थातच आपण या घटकांशी जुळवून घेऊनच पुढे जाऊ शकतो.यामधे नैसर्गिक घटक, सामाजिक घटक, आर्थिक घटक, पारिवारिक घटक, राजकीय घटक असे अनेक भौतिक जगतातील घटक असू शकतात. या सर्वांचा एकत्रित आणि वेगवेगळा विचार केल्यावर लक्षात येईल की, मानसिकता घडायला या गोष्टी सकारात्मक असणं आपण इच्चेमध्ये आणू शकतो.  पण त्या इच्छेमागे आत्मशक्ती, इच्छाशक्ती याचं पाठबळ जोडून काही प्रमाणात आपल्याला सुसंगत परिण...

भोग आणि ईश्वर ६०५

भोग आणि ईश्वर ६०५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     आजच्या दीप आमावस्ये निमित्ताने घरी आणि मंदिरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या दीपपूजनाने, मनाला एकप्रकारची प्रसन्नता, सात्विकता आणि उल्हासाचा अनुभव आपल्या पैकी बऱ्याच जणांना आला असेल. यामधे भौतिक आणि रासायनिक दोन्ही प्रकारच्या अनुभवांचा समावेश होतो. पुजे निमित्ताने लावलेले दिवे, त्यांच्या ज्योतीच्या माध्यमातून, वातावरणात सात्विक ऊर्जा व शक्ती प्रसारित करतात.  त्याच्या सानिध्यात आल्यानंतर, आपल्या मनातील, सात्विक, प्रसन्न आणि आल्हाद या केंद्रांना त्या लहरींचा स्पर्श होतो आणि त्या उर्जेतून देह बुद्धी मन आणि आत्मा या चारही माध्यमांना चैतन्याने भरून व भारून टाकतो. या संपूर्ण क्रियेमुळे, आपल्या सनातन धर्माने, दीप प्रज्वलन, पूजन यांना अनन्य महत्व दिलेलं आहे. आपण त्याचं शास्त्रीय व वैज्ञानिक महत्व जाणून, मगच या प्रथांना पुढे नेलं पाहिजे.  अश्या भौतिक घटकातून लाभ आणि हानी दोन्ही प्रकारचे ऊर्जा व शक्ती लहरी प्रवाहित होत असतात. त्यातून निघणाऱ्या लहरी, आपल्या देह बुद्धी व मन या तिन्ही वर परिणाम करतात. म्हणूनच आपण नेहमी स्वच्छ, स...

भोग आणि ईश्वर ६०४

भोग आणि ईश्वर ६०४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)      खूपवेळा आपण मानसिकता हा शब्द प्रयोग करतो. म्हणजे नक्की काय याबद्दल जरा विचार करूया. मानसिकता हा थोडा गुंतागुंतीने तयार होणारी गोष्ट आहे. मुळात ती एक समिश्र स्थिती आहे. अर्थातच मानसिक असल्यामुळे, अनेक गोष्टींची पार्श्वभूमी त्यामागे असते आणि अनेक गोष्टीतून ती जाते. त्याला जितकी आजू बाजूची परिस्थिती घडवते तितकीच लहानपण ते आता पर्यंत त्या व्यक्ती संदर्भात घडलेल्या, वा घडणाऱ्या छोटया तील छोट्या गोष्टीसुद्धा जबाबदार असू शकतात.  मुळात ती जैविक,भौतिक आणि रासायनिक अशी तिन्हींच्या माध्यमातून तयार झालेली स्थिती असते. या मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या तीनही घटकांचा आपण जरा विचार करूया. भौतिक अर्थाने, जन्माच्या आधीपासून असणारी स्थिती, परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्या व्यक्तीच्या संपर्कात जन्मा आधी पासून आलेल्या व्यक्ती, इत्यादी अनेक गोष्टींचा वर्षानुवर्षे झालेला, होत असलेला व होऊ शकणारा परिणाम म्हणजे भौतिक पार्श्वभूमी. या सर्व गोष्टींचा किंवा त्यातून निघणाऱ्या व निघत असलेल्या लहरी, कंपंनं यांचा संयुक्तिक परिणाम म्हणजे भौतिक जगत...

भोग आणि ईश्वर ६०३

भोग आणि ईश्वर ६०३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     मनाला निश्चित असं ध्येय किंवा उद्देश असावा. नव्हे असलाच पाहिजे. याचं कारण म्हणजे, असं मन भरकटत नाही. किंवा असं नीट उद्देशाने बांधलेलं मन म्हणजे आपल्या काठाच्या आतून नीट वाहणाऱ्या नदीच्या पात्रासमान असतं. विद्यार्थीदशेत एक उद्देश ध्येय समोर असतं. त्यामुळे सहसा त्या वयात मन वाहावत नाही. पण तरुण वय हे अवखळ पाण्यासमान असतं.  म्हणून मनावर लहान वयात उत्तम संस्काराची मशागत झाली की, माणूस सहसा, कोणत्याही वयात असंस्कारी होत नाही. पण मनाला सर्वात उत्तम संस्कार जर कोण घडवत असेल तर ते आपले मंत्र, स्तोत्र इत्यादी. याचं कारण त्या संस्कृत भाषेत असलेली विलक्षण ऊर्जा, चेतना आणि शक्ती माणसाला कोणत्याही वयात, उत्तम मार्ग सोडू देत नाही. किंबहुना आपण आजही, आपल्या पूर्वीच्या दिवसांची विशेष करून लहानपणी ची आठवण काढली की, सर्वात जास्त भावणारी वा मनाला भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे, त्या वयात म्हटलेलं देवाचं, स्तोत्र वगैरे.  त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या वयात ऐकलेली ही स्तोत्र कोणत्याही वयात, थोडाफार सराव केला की, पुन्हा मुखोदगत होऊ...

भोग आणि ईश्वर ६०२

भोग आणि ईश्वर  ६०२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     आपल्या मानसिक स्थिती प्रमाणे, माणूस आपली मत ठरवतो आणि बनवतो किंवा बनवलेल्या मतांमध्ये, पुन्हा  बदल किंवा दुरुस्त्या करतो. काल म्हटल्या प्रमाणे, तात्विक अर्थाने मतातील हे परिवर्तन अती शीघ्र ते अती मंद असते किंवा असू शकते. हा मतातील बदल, अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. पण मुख्यतः अनुभव आणि धारणा यांचा संयुक्त परिणाम होऊन, माणूस आपलं मत बनवतो किंवा दुरुस्त करतो. मत तयार होऊन, त्यात होणाऱ्या बदलाचा वेग, मनाच्या, बुद्धीच्या चपळता ते लवचिकता यावर आधारित असतो.  म्हणजे मन बुद्धी व जाणीवा यांच्या संयुक्त वेगावर हे अवलंबून असतं. यामधे जाणीवा प्रगल्भ, मन अथांग सागरा प्रमाणे खोल आणि बुद्धी स्थिर असेल तर, तो माणूस सहसा मतं बदलणारा किंवा हवेनुसार निर्णय बदलणारा असतं नाही. अशी माणसं कठीण परिस्थितीत सुद्धा आपलं मत किंवा निर्णय यावर ठाम असतात. कारण अशी मतं सखोल विचार करून किंवा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेले असतात.  हे एवढं सगळं तपशीलवार सांगायचं कारण म्हणजे, अश्या सखोल विचार करून मत बनवणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या लोकांना ...