भोग आणि ईश्वर ६२५ वास्तविक प्रत्येक मनाला एकाग्र करून, अंतिम उद्देशा साठी तयार केल्यानंतर, त्या शांत झालेल्या मनाला, साधनेचा परिसस्पर्श देऊन, त्या एकमात्र ईश्वरी नामाला स्मरण्याची पायरी गाठली की, सर्व उद्देशांची पूर्तता झालीच असं म्हणता येईल. पण... आणि हा पणच, हे उद्देश आणि आपला निर्धार, यामधील मुख्य अडथळा होतो. कारण मनाची एकाग्रता साधण्यासाठी, अनेक खटपटी लटपटी करूनही, मन कोणत्या गोष्टीने, भरकटेल आणि व्यर्थ कर्मात, धर्मात अडकून, प्रवाह सोडेल, हे ईश्वराच्या हातात सुद्धा नाही. ही गोष्ट वा गुह्य प्रत्यक्ष ईश्वर जाणूनही, बदलू शकत नाही. कारण त्यासाठी लागणारी, एकाग्रतेची ऊर्जा, शक्ती, तेज आणि ओज हे मानवी मनाला प्रदान केल्यानंतर, ईश्वराने स्वतःला, त्या सर्वांपासून अलग केलेलं आहे. हे सर्वात मोठं गुह्य आहे. ईश्वराचा त्यातील सहभाग, मानवी मनाने त्याला अंतरात्म्या पासून साद घातली तरच, घडून येऊ शकतो. त्यामुळे मनाचा इश्वराशी संवाद साधण्यासाठी, मनाला एकाग्र आणि शांत करून, तयार करणं, ही यातील प्राथमिक आवश्यकता आहे आणि हाच सर्व साधनांचा प्राण आहे. जर हे एकदा साधलं आणि मनाला या...