प्रस्तुत काळासाठी एक कथा : पुराणकाळातील गोष्ट आहे. एकदा जगत्पालक भगवान महाविष्णू शेषशायी समाधी अवस्थेत होते. माता लक्ष्मी चरणांशी बसून भगवंतांचे पाय चुरत होत्या. बराच काळ याच स्थितीत गेला. अर्थातच देवर्षी नारद यांचं आगमन त्याठिकाणी झालं. नारद : " नारायण नारायण. माते मी अवेळी येऊन भगवंतांच्या आणि आपल्या समाधीत बाधा तर आणली नाही ना. देवी : अर्थात आता या प्रश्नाला काही अर्थ आहे असं वाटतं का आपल्याला. नारद : नारायण नारायण. माते क्षमस्व. सर्वकाळी सर्ववेळी विश्वसंचाराचं माझं नित्य व्रत असल्यामुळे, माझाही नाईलाज असल्यामुळे मला कार्यहेतू प्रित्यर्थ आगमन व गमन करावंच लागत. अर्थात मर्त्यलोकात विहार करताना काही शंका मनात निर्माण झाल्यामुळे आगमन करावं लागलं. कारण देवी: कारण आपण मनात आलेली शंका विचारल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही आणि मुनीवर हे आपले दुसरे व्रत आहे. नारद : माते आपण त्रिकालज्ञानी आहात. आता विनाविलंब माझे आराध्य कधी समाधीअवस्थेतून जागृतावस्थेत येतील हे कृपा करून आपण सांगितलंत तर बर...