Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

एक पौराणिक कथा :

 प्रस्तुत काळासाठी एक  कथा : पुराणकाळातील गोष्ट आहे. एकदा जगत्पालक भगवान महाविष्णू शेषशायी समाधी अवस्थेत होते. माता लक्ष्मी चरणांशी बसून भगवंतांचे पाय चुरत होत्या. बराच काळ याच स्थितीत गेला. अर्थातच देवर्षी नारद यांचं आगमन त्याठिकाणी झालं.  नारद : " नारायण नारायण. माते मी अवेळी येऊन भगवंतांच्या आणि आपल्या समाधीत बाधा तर आणली नाही ना.  देवी : अर्थात आता या प्रश्नाला काही अर्थ आहे असं वाटतं  का आपल्याला.  नारद : नारायण नारायण. माते क्षमस्व.   सर्वकाळी सर्ववेळी विश्वसंचाराचं माझं  नित्य व्रत असल्यामुळे, माझाही नाईलाज असल्यामुळे मला कार्यहेतू प्रित्यर्थ आगमन व गमन करावंच लागत.  अर्थात मर्त्यलोकात विहार करताना काही शंका  मनात निर्माण झाल्यामुळे आगमन करावं लागलं. कारण  देवी: कारण आपण मनात आलेली शंका विचारल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही आणि मुनीवर हे आपले दुसरे व्रत आहे.  नारद : माते आपण त्रिकालज्ञानी आहात. आता विनाविलंब माझे आराध्य कधी समाधीअवस्थेतून जागृतावस्थेत येतील हे कृपा करून आपण सांगितलंत तर बर...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १९

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १९ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्‌ । तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्‌ ॥३६॥.  भवबीज. भव म्हणजे  संसाररूप सागर, जन्ममृत्यूचा फेरा, कर्मबंधनाची शृंखला. बीज म्हणजे या सर्वांची निर्मिती करणारं बी. म्हणजेच सहा शत्रू काम, क्रोध,लोभ,  मोह, मद आणि मत्सर. या प्रत्येकाची उपअंग वा उपप्रकार आहेत. जसे क्रोधातून इतर विकार, मद यातून अहंकार इत्यादी. या भवबीजांचं समूळ उच्चाटन करून आत्मोन्नती साधल्यास जन्ममृत्युच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकते. त्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. जसे अष्टांगयोग याग, भक्ती, कर्म, ज्ञान इत्यादी नऊ मार्ग शास्त्राने सांगितले आहेत. ज्यांचा अवलंब करून प्राणी मोक्ष, मुक्तीच्या मार्गाकडे क्रमणा करू शकतो. हे सर्व एकप्रकारचे यज्ञ आहेत जे ह्या भवबीजांना जाळून वा ज्ञानाने दूर सारून मार्ग सुकर करतात.  अश्या अनेकविध मार्गपैकी एकाचा अवलंब करून भवबीजातून आपली सुटका करून घेता येईल. या सर्व मार्गानी भवाचं हे बीज नष्ट करता येऊ शकतं. भर्जन म्हणजे  उष्णतेच्या सहाय्याने पदार्थामधील अशुद्ध तत्व बाष्परूपाने बाहेर काढून पदा...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १८

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १८  कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्‌ । आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥३४॥ आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्‌ ।  लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥३५॥ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्‌ । तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्‌ ॥३६॥ एखादं चरित्र जर आधी कोणी विस्ताराने अविस्मरणीय श्लोकांमध्ये युगानुयुगांची संपत्ती म्हणून मांडलं असेल आणि त्याच अलौकिक व्यक्तित्वावर आपण लिहीत वा बोलत असू तर ज्यांनी हे चरित्र मूलतः लिहून अजरामर केलं आहे अश्या महान व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे विनयशीलतेचं लक्षण आहे. कारण त्यांनी मांडलेल्या गुणविशेषांच्या आधारे आपण ते चरित्र पुनः मांडतो, पण मूळ व्यक्तित्वाचा गाभा तोच असतो. आपला सहभाग हा त्यातील काही विशेष पुनः लोकांसमोर मांडणं हा असतो.  इथे तर श्रीबुधकौशिक ऋषी, श्रीशंकरांच्या आज्ञेवरून, हा स्तोत्ररूपी मंत्र जनसामान्यांना पोचवत आहेत. तरीदेखील ज्या महर्षी वाल्मिकी यांनी हे अद्भुत श्रीरामचरित्र रामायण या रुपात प्रथम सादर केलं, त्या महर्षींचा उल्लेख कृतज्ञतापूर्वक करताना श्रीब...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १७

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १७ दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा । पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम्‌ ॥३१॥ लोकाभिरामं रनरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्‌ । कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥ मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ । वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥ यस्य म्हणजे ज्यांच्या. अर्थात ज्यांच्या दक्षिण दिशेला लक्ष्मण उभा आहे, तर  वाम म्हणजे उत्तर दिशेला जनकाची आत्मजा म्हणजे देवी सीता उभी आहे आणि ज्यांच्या पुढ्यात, पुरतो, समोर, पायाशी साक्षात मारुतीराया आहे, अश्या रघुनंदन श्रीरामांना मी वंदन करतो. आपण ज्यावेळी पूर्वेकडे मुख करून उभे राहतो, त्यावेळी उजवीकडे अर्थातच दक्षिण दिशा येते आणि डावीकडे उत्तर दिशा येते. ओघानेच आले की श्रीराम देवी सीता आणि लक्ष्मण पूर्वाभिमुख उभे आहेत. कारण त्या अनुषंगाने दिशा स्पष्ट केल्यात.  लोकाभिरामं म्हणजे एक अर्थ समस्त लोकांत अति सुंदर आणि दुसऱ्या अर्थाने समस्त लोकांना सुखदायक असणारे, रणांगणी धीरोदात्त, धीराने वागणारे, धीर म्हणजे हिम्मत असणारे (अजून ए...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १६

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १६  माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी, रामो मत्सखा रामचन्द्रः । सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं, जाने नैव जाने न जाने ॥30॥ तिसाव्या श्लोकापर्यंत येताना एकोणतीसाव्या श्लोकात सर्व समर्पण करून शरणागती पत्करल्यानन्तर, आता प्रभू हेच माझं सर्वस्व ही भावना भक्तांच्या हृदयात स्थित व्हायला पाहिजे. परंतु माझं सर्वस्व म्हणजे नक्की काय याचा उलगडा करताना ऋषींनी चार नातेसंबंधांचा उल्लेख केला आहे. माता पिता स्वामी आणि सखा. थोडं खोलात गेलं तर काही गोष्टींचा बोध होऊ शकतो. माता म्हणजे जन्मदात्री अर्थात लौकिक अर्थाने जन्मदात्री ही भिन्न आहे.  पण इथे अध्यात्मिक भक्तीच्या मार्गात आता प्रभू श्रीराम यांनी मला पुत्र वा पुत्री म्हणून स्वीकारून, मला मातेसमान ममत्व देऊन भक्तीमार्गात पुढे न्यावं. इथे ही अपेक्षा नाही तर हट्ट आहे वा असावा. कारण असा हट्ट आईकडेच करता येतो. माझे आजपर्यंतचे अपराध, कर्माचे दोष पोटात घेऊन पुढील मार्गात मातेसमान मार्गदर्शन करावं. परंतु हे करत असताना काही चुका कर्माचे दोष पुढेसुद्धा होऊ शकतात. अश्यावेळी काही क्षणी काही वेळा ...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १४

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १४ रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम्‌ । काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम्‌ । वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥२६॥ इथे सविसाव्या श्लोकात भगवान श्रीराम यांचे काही गुणविशेष वा विशेषणं ऋषींनी कथन करून श्रीरामांना वंदन करण्यास सूचित केले आहे. त्याचा शोध घेऊ.  लक्ष्मणं पूर्वजं म्हणजे सरळ सरळ अर्थ होतो लक्ष्मणाचे पूर्वज म्हणजे श्रीराम. वास्तविक ज्येष्ठ किंवा अग्रज हा शब्द वापरता आला असता, परंतु पूर्वजंचा मी असा अर्थ काढतो की शेषनाग अर्थात  लक्ष्मण हा रामावतारात प्रथम महाविष्णूं सोबत पृथ्वीवर मानवी रुपात अवतीर्ण झाला. त्याआधी महाविष्णूचे सहा अवतार झाले. त्यात श्रीमहाविष्णू एकटे अवतीर्ण झाले. त्याअर्थी पूर्वजं असा अर्थ असावा.  रघुवरं म्हणजे रघु राजाच्या वंशात जन्मलेले असे श्रीराम. सीतेचे पती या अर्थी अजून एका नावाने श्रीराम प्रसिद्ध आहेत. सुंदरम् म्हणजे देहाने अर्थात शारीरिक सुंदरता आहेच. परंतु जे ऋषींवर भौतिक जगताच्या पार गेलेले असतात, त...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १५

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १५ रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम्‌ । काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम्‌ । वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥२६॥ रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥ श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम । श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥  श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि । श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि । श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि । श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥ सविसाव्या श्लोकातील पुढच्या दोन ओळी आपण जाणून घेत आहोत.  राजेन्द्रं. सर्व राजांचा राजा अर्थात ज्यांनी अश्या राजाचं सार्वभौमत्व मान्य केलं आहे, असा राजा म्हणजे राजेंद्र.  हे इहलोकीच्या अर्थाने आणि स्वर्गलोकी सर्व देवांचा राजा इंद्र तो देखील भगवंताचं प्रतिरूप या अर्थाने श्रीराम हे राजेंद्र.  सत्यसंधं. सत्य म्हणजे जे मिथ्या नाही ते, जे परिस्थितीला धरून आहे ते, ज्यात असत्याचा अंश किंचितमात्र...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १३

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १३   संनद्ध: कवची खड्‌गी चापबाणधरो युवा । गच्छन्‌मनोरथोSस्माकं राम: पातु सलक्ष्मण: ॥२१॥  रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली । काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघुत्तम: ॥२२॥ वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम: । जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेय पराक्रम: ॥२३॥ इत्येतानि जपेन्नित्यं मद्‌भक्त: श्रद्धयान्वित: । अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशय: ॥२४॥ रामं दूर्वादलश्यामं पद्‌माक्षं पीतवाससम्‌ । स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर: ॥२५॥ आता इथे श्रीबुधकौशिक ऋषी श्रीराम यांच्या काही वैशिष्ट्यांची माहीती देत आहे. श्रीराम व लक्ष्मण कसे आहेत तर सतत तत्पर संनद्ध कवचधारी, खड्गधारी, चाप आणि बाण अर्थात धनुष्य आणि बाण घेऊन सुसज्जीत असलेले, युवा अवस्थेतील असे हे श्रीराम आणि यांसह लक्ष्मण हे सतत माझ्या मनोरथांच्या पुढे पुढे राहून माझं रक्षण करोत. मनोरथ म्हणजे मनाचा अश्व असलेला देहरूपी आत्म्याचा रथ. अर्थात मनातील इच्छांच्या पुढे उभे राहून ते माझ्या इच्छाचं रक्षण करोत. याचा एक अभिप्रेत असलेला अर्थ हा देखील आहे की मला त्या इच्छा येवोत ज्य...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १२

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १२  तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ । पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥ फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥ शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ । रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ ॥१९॥ आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्‌ग सङि‌गनौ । रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम्‌ ॥२०॥ वनवासातील प्रभू श्रीराम यांचं वर्णन करताना ऋषींवर सांगतात की,जे तरुण आहेत, जे रुपसंपन्न आहेत, जे सुकुमार असूनही महाबली अर्थात महाशक्तीशाली व महापराक्रमी आहेत,  पूर्ण उगवलेल्या कमलासम (पुंडरीक म्हणजे तेजस्वी कमलपुष्प)  विशाल नयन आहेत आणि ज्यांनी कृष्ण अर्थात काळ्या हरिणाचं कातडं वस्त्र म्हणून परिधान केलं आहे.   तरुण आणि रुपसंपन्न अशी दोन विशेषणं ऋषींनी वापरली आहेत. मिथिलनगरीवरून जानकीशी विवाह झाल्यानंतर काही काळातच वनवासयोग नशिबी आलेला. त्यामुळे दोघेही तरुणपणीच राज्यवैभव सोडून आलेले आणि सोबत माता जानकी.  अत्यंत रूपवान. असे हे श्रीराम व लक्ष्मण. वनात रहात...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ११

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ११ जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ । यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥१३॥ वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥१४॥ आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर: । तथा लिखितवान्‌ प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥ आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्‌ । अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान्‌ स न: प्रभु: ॥१६॥ जगज्जेता हे विशेषण खास करून प्रभू श्रीराम यांच्या बाबत वापरलं जातं. याचं कारण की, श्रीराम त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कोणत्याही असुर वा अन्य शक्तीकडून कधीही पराभूत न झालेले योद्धे म्हणून संबोधले जातात. असे हे जगज्जेते श्रीराम यांचं नाम, त्यांच्या नामांचं हे स्तोत्रमंत्र जे रामनामाने रक्षित आहे. अश्या या रामनाम अभिरक्षित स्तोत्राचं पठण करून त्याला कंठस्त करेल म्हणजेच मुखोद्गत करेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. करस्था: सर्वसिद्धया म्हणजे त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात. शास्त्रीय अर्थ असा आहे की, त्याने स्वहस्ते केलेली सर्व कार्य सिद्ध होतात वा यशस्वी होतात. इतकं महत्व रामरक्षा स्तोत्र पठणा...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १०

 श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १० एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठॆत्‌ । स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥१०॥ पातालभूतलव्योम चारिणश्छद्‌मचारिण: । न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥ रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्‌ । नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥ इथे रामबल हा शब्द आला आहे. खरतर हा शब्द बाकि कुठेही आढळत नाही. वा मला आढळला नाही. पण तर्काने आपण त्याच्या अर्थापर्यंत पोचू शकतो. आपण महाबली हनुमान हे हनुमंताचं विशेषण ऐकलं व वाचलं आहेच. हनुमंत स्वतः महाबली म्हणजेच सर्वात बलवान आहे. हनुमंताची सर्व शक्ती हि त्याच्या अखंड राम नामाची परिणती आहे. म्हणजेच सर्वकाळी सर्वशक्तिमान हनुमंत आपल्या शक्तीचं श्रेय रामनामाला देतो, जे सुयोग्यच आहे.  त्यामुळे त्या शक्तीचं उगमस्थान असलेलं प्रभूंचं नाम किती बलवान असेल आणि त्या बलवान नामाच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडलेलं श्रीरामरक्षास्तोत्र हा मंत्र किती परमशक्तीशाली असणार याची कदाचित आपल्याला कल्पना येणार नाही. पण त्या निष्ठेने, श्रद्धेने आणि प्राणपणाने आपण म्हणून ते जाणू शकतो. ....

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ९

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ९ जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः । पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥ सुग्रीव मैत्री , वालीवध इथपर्यंतचा कथाभाग संक्षिप्त स्वरूपात पाहिला. आता सीता मातेच्या शोधार्थ व सुटकेसाठी निघालेलं नर आणि वानर यांचं सैन्य रामेश्वर इथे येऊन थांबलं. आता हनुमंत सोडून बाकी कुणीही समुद्र उल्लंघून लंकेमध्ये जाऊ शकत नव्हतं. प्रभू स्वतः लक्ष्मणा सह हनुमंताच्या मदतीने लंकेत जाऊन रावणासह सैन्याला परास्त करून आपलं कार्य सिद्ध करून परत येऊ शकले असते. कारण दंडकारण्यात खर व दूषण यांचा १४००० सैन्यासह वध करण्याचं कार्य एकट्या प्रभू श्रीराम यांनी केलं होतं. परंतु मैत्री मित्रता , वानरांचा उत्साह, शारीरिक व मानसिक क्षमता व बल यांसह, त्यांचा या कार्यातील सहभागाचा संकल्प, यांना प्रभू वाऱ्यावर सोडू शकत नव्हते. किती चिंतनशील विचार होता. म्हणून समस्त वानरसेनेसह लंकेत जाण्याचा मार्ग मिळावा म्हणून तीन दिवस समुद्रदेवतेची आराधना तद्नंतर उग्ररुप आणि त्यायोगे सेतूचा मार्ग हे सर्व प्रभुलीलेने घडवून आणून सेतुबंधनापर्यंत कार्य सिद्ध करून घेतलं. यात लीला यासाठी की, सर्...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ८

 श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ८  करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥ सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥ सातव्या श्लोकातील दुसऱ्या ओळीतील उत्तरार्ध आपण आता पाहूया. या श्लोकातील जाम्बवदाश्रयः हा थोडा क्लिष्ट संदर्भ आहे. रामायणात दोन प्रचलित कथा  आहेत. एकानुसार जांबुवंत हा किष्किंधा नगरीतील ज्येष्ठ सल्लागार होते. त्यामुळे वाली वधानंतर वालीचे  सल्लागार सुग्रीवाच्या सल्लागार मंडळात असावे  का (शत्रूचा माणूस म्हणून) असा प्रश्न निर्माण झाला.  त्यावेळी प्रभुनी आपल्या आत्मज्ञानाने जांबुवंतांचा पूर्वइतिहास ओळखून ज्येष्ठ सल्लागार म्हणून महाराज सुग्रीव यांना जांबुवंताना आश्रय देण्यास सांगितले. त्याअर्थाने जांबुवंत (जाम्बवद म्हणजे जांबुवंत या प्राकृत नामाचे संस्कृत नामउच्चारण).   दुसऱ्या कथेनुसार श्रीराम आणि श्रीलक्ष्मण यांचे सत्य जाणण्यासाठी जांबुवंतानी  सुग्रीवाला सल्ला देऊन हनुमंताला त्यासाठी पुढे पाठवलं आणि श्रीराम श्रीह...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ७

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ७  जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः । स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥ करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥ आपल्या देहातील शीर, भालप्रदेश, दृष्टी, श्रुती, घ्राणेंद्रिय, मुख यांच्या रक्षणार्थ रामनामाची जपावली मनात योजल्यांनातर ऋषींवर पुढे सांगतात, आपल्या जीभेचं रक्षण विद्यानिधी स्वतः करोत. जिव्हेचा मुख्य उपयोग हा विद्याभ्यास करून त्याच्या प्रसारासाठी आहे वा असावा अशी शास्त्राची अपेक्षा आहे. म्हणून खूप ज्ञानीजन हे अत्यंत मार्मिक आणि गरजेचं बोलून जिव्हेचा सदुपयोग ज्ञान जतन करून त्याचा वापर करण्यासाठी करतात.  म्हणून हे मर्म या ठिकाणी श्रीबुधकौशिक ऋषी सांगतात की याच कारणासाठी आपल्या जिव्हेचा सदुपयोग करणाऱ्या जनांसाठी श्रीराम, जे स्वतः विद्येचा निधी अर्थात विद्येचे उगमस्थान आणि आश्रयदाते आहेत ते विद्यानिधी या रुपात करोत. इथे अजून एक बोध होतो प्रभूंच्या जीवनातील विद्यार्जनाचं पर्व संपलं असही यातून सुचवायचं असेल.  कंठ हा मुख्यतः स्वरयंत्र धारण केलेला भाग जिथून प...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ६

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ६ रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥ कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥ रामरक्षा स्तोत्राचं पठण करण्याआधी आपण प्रभूंचं ध्यान मनात योजलं. त्यांचं सगुण रूप, सत् चित् स्वरूप कल्पनेत आणलं. आता रामरक्षा स्तोत्राच्या पठणाचा काय परिणाम आहे त्याने काय काय साध्य होणार आहे, यावर प्रकाश टाकताना श्रीबुधकौशिक ऋषी सर्वात प्रथम सुरवात करतात ते प्राज्ञेपासून. रामरक्षेच्या पाठाने प्राज्ञा वृद्धी होते, असा उल्लेख ऋषींवर करतात. प्रज्ञा म्हणजे बुद्धी किंवा बुद्धीचं सामर्थ्य. प्राज्ञा म्हणजे बुद्धीची खोली, चलाखपणा, चतुराई, बुद्धीचा चतुरस्त्रपणा. यात ब्रूद्धी होते. प्राज्ञा म्हणजे पत ही सामाजिक आत्मिक दोन्ही प्रकारची असू शकते. म्हणजे विचारांची व्याप्ती वाढते. माणूस आत्मकेंद्रित न राहता बाह्यकेंद्रीत होतो. ज्याला आपण विचारांना परिपक्वता येणे म्हणतो ते होतं. माणूस सखोल विचार करू लागतो. असा बहुकेंद्रीत झालेला, विचारांना परिपक्वता आलेला माणूस जीवनाकडे अधिक...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ५

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ५ चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥१॥ ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥२॥ सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम्‌ । स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥३॥ श्रीरामचंद्रप्रभूंचं ध्यान केल्यानन्तर त्यांच्या रूपाबद्दल सांगून झाल्यावर ऋषींवर प्रभूंच्या बाकीच्या गुणवर्णनाकडे वळतात. कोणत्याही व्यक्तित्वाची ओळख त्या व्यक्तीचं चरित्र सांगतं. इथे चरित्र हे त्या व्यक्तीच्या अंगचे गुणधर्म आणि त्याचा समाजाप्रती जनमानसाप्रती व्यवहार, जनसामान्यांच्या मनात त्यांची सत्यप्रतिमा, जनसामान्यांना वाटणारा त्यांचा आधार या सर्वांची गोळाबेरीज आहे वा असते किंवा असायला हवं. कारण व्यक्तीगत चरित्र सर्वोत्तम असलेली व्यक्तीच समाजात जगतात सार्वजनिक जीवनात आदर्श , मूल्य, नीती यांचा परिपाठ स्थापित करू शकते. अश्या या मापनश्रेणीवर प्रत्यक्ष प्रभूरामचंद्रांच्या चरित्रविषयी सांगताना श्रीबुधकौशिक ऋषी या चरित्राच्या प्रभावाची कल्पना आपल्याला देताना म्हणतात की प्रभूंचं चरित्र किती काळ व्याप्त...

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ४

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ४ अथ ध्यानम   ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं, पीतं वासो वसानं नवकमल दलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् । वामांकारूढ़सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् । ज्या प्रभुरामचंद्रांच्या प्रित्यर्थ आपण हा स्तोत्रमंत्र म्हणणार आहोत आणि त्यांचं ध्यान करणार आहोत त्या  प्रभूंचं रूप स्वरूप कसं आहे, याची कल्पना आपल्याला पुढच्या श्लोकात ऋषींवर्य देत आहेत. एक लक्षात घ्या ही रामरक्षा प्रत्यक्ष भगवान शंकरांनी कथित केलेली आहे. म्हणजेच या रुपाचे साक्षीदार स्वतः भगवान शंकर आहेत. तरीही एक शंका मनात येते की, निर्गुण निराकार ईश्वराच्या या सगुण साकार रुपाला का भजायचं.  त्याचं कारण असं आहे की, जगात कोणत्याही गोष्टीची कल्पना करता येते पण आईची कल्पना करता येत नाही. ती प्रत्यक्षात असावीच लागते आणि तिच्या प्रेमाचा अनुभव यावाच लागतो. तरच तिच्या प्रेमाची साक्ष पटते. मग इथे तर संपूर्ण विश्वाची जननी असलेल्या ईश्वराला ज्यांनी पाहिलंय त्यांनी केलेल्या गुण व रूप वर्णनावरून आपण नक्कीच विश्वासून पुढे जाऊ शकतो. मला इथे ...

श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग ३

श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग ३ अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता। अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान कीलकम। श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः। श्रीबुधकौशिक ऋषी, ज्यांनी श्रीरामरक्षा हे स्तोत्र लिखित स्वरूपात आपल्याला प्रदान केलं, ते मूळ भगवान श्रीशंकर यांनी स्वप्नात दृष्टांत स्वरूपात श्री बुधकौशिक ऋषींना विवेचित केलं. तदनंतर प्रातःकाली उठून ऋषीवरांनी भूर्जपत्रावर हे लिहून लोककल्याणार्थ जगाला समर्पित केलं. भगवान शिवशंकर यांनी देवी पार्वती यांना एका कथनात श्रीरामनामाचा महिमा सांगताना म्हटलंय कि, रामनाम हे विष्णुसहस्त्रनामइतकंच पुण्यप्रभावी व फलदायी आहे. स्वतः भगवान शंकर हे रामनामाचाच जप करतात हे सर्वश्रुत आहे.  रामरक्षेच्या सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे श्रीरामरक्षास्तोत्र हा एक मंत्र आहे. जो श्रीबुधकौशिक ऋषींनी आपल्याला पोचवला आहे. याचे मूळ रचयिता भगवान शंकर आहेत. कोणताही मंत्र म्हटलं कि त्याची सिद्धी आणि त्या सिध्दीने प्राप्ती हे ओघानेच आलं. त्याचबरोबर...

श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग २

   श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग २ आपदाम्-अपहर्तारम् दातारं सर्व संपदां । लोकाभिरामं श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ॥ श्लोकाच्या याच ओळीत पुढील भागात आलेला शब्द दातारम हा आहे. दाता, दातृत्व, दानी यांचे सर्वसामान्य अर्थ आणि दातारम याचा अध्यात्मिक पातळीवर अर्थ समजून घेऊ. दाता म्हणजे आपल्याकडील मिळकत व संपत्तीतील काही हिस्सा समाजासाठी, गोरगरिबांसाठी, पीडित जनतेसाठी , याचकांसाठी  देणं  हे आपलं कर्तव्य समजून, त्याचा कोणताही मोह वा मद आपल्या मनावर चढू न देता, अत्यंत निरलसपणे, निष्काम वृत्तीने जो दान करतो तो खरा दाता . जो या दानाच्या बदल्यात समाज, ईश्वर वा अन्य कोणाकडूनही काहीही अपेक्षा मानसिक, आत्मिक वा शारीरिक ठेवतो तो दाता नसून एक व्यवहारी असतो. असा शुद्धवृत्ती दाता एकप्रकारे समाजाला वा ईश्वराला आपल्या ऋणात बांधून पुण्यसंचय करत असतो.  इथे पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो कि, दान सत्पात्रीच असावं.का ?  कारण तसंच दान पुण्य संचय करतं. यात दोन शब्दांचा समावेश आहे. सत् आणि पात्री सत् ज्या शब्दाबरोबर जोडलं जातं, त्याचा अभिप्रेत अर्थ ह...