Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

भोग आणि ईश्वर ६०१

भोग आणि ईश्वर  ६०१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) काल मी जो विषय मांडला, त्यावर पुढे चिंतन सुरू करूया. मूळ मनाची प्रवृत्ती ही, कोणत्यातरी संचितातून किंवा प्रसंग वा अनुभव उपरांत तयार झालेली असते. जन्मतः एखादी प्रवृत्ती असते, ती गर्भसंस्कार किंवा पूर्वजन्म संस्कार अश्या कोणत्या तरी संस्कारातून आलेली असते. म्हणजे मनावर काही संस्कार घडलेले किंवा घडावे असं काही आधी पाहिलेलं, ऐकलेलं आणि मनावर खोल रुजलेल असेल, तरच त्यातून प्रवृत्ती तयार होऊन, माणूस काही मानसिक भूमिका घेतो. हे झालं खोल रुजलेल्या संस्कारी मनाबाबत अर्थात सखोल प्रवृत्ती बाबत. यामधे आस्तिक, नास्तिक दोन्ही आले. याविपरित काही व्यक्ती उथळ प्रवृत्तीच्या असतात. म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, कर्म करणं, निर्णय घेणं हे प्रसंगावर, त्या प्रसंगाच्या मानसिक स्थितीवर आणि त्या स्थितीचा त्यांच्या मनात तयार झालेला आलेख व परिणाम यांचा संयुक्त परिणाम यांवर अवलंबून असतं. म्हणजे यांची मनोभूमिका ही प्रसंगोपात बदलती, दोलायमान अशी असू शकते. पण या दोन्ही प्रकारच्या लोकांतून आपल्या निर्मात्यावर विश्वास दाखवणारी श्रद्धाळू आणि अविश्वास दाखवणारी आणि नास्...

भोग आणि ईश्वर ६००

भोग आणि ईश्वर  ६०० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    आज अखंडित ६०० दिवस लिहिण्याचा एक वेगळाच आनंद आहे. खरा पाहिलं तर, दडपण हे पहिले १०० ते १५० दिवस होतं. त्यानंतर, मात्र एका वेगळ्याच भूमिके तून आणि वेगळ्या पातळीवर ही लेखमाला गेली. मुळात या लेखमालेचा विषय हा गहन, अती चिंतनशील आणि तरीही लोकांच्या जिव्हाळ्याचा होता. मुळात आपल्याच मनातील प्रश्नाचा मागोवा घेता आला तर ती सर्वात आनदाची ठेव असते.  यात जिज्ञासा पूर्ण होणं, याहीपेक्षा मनातील शंकांचं निरसन होणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात अश्या अनेक गोष्टी घडून जातात, घडतात किंवा पुढेही घडतील, ज्याबद्दल अनेक शंका निर्माण होतात. त्या सर्व शंका फिटतील असं नाही. पण या मालिकेत, बऱ्याच प्रश्नांची उकल करून देण्याचा प्रयत्न महाराजांनी केला, हे नक्की. कर्माच्या गतीचा सिद्धांत हा अनेकवेळा, पूर्णपणे लागू होईल अशी परिस्थिती असेलच असं नाही. बरेच जण या छोट्या छोट्या शंकांना मनात धरून, त्यांचं निरसन न झाल्या कारणाने,नास्तिक किंवा देवावर दैवावर अविश्वास दाखवणारे असतात. यामधे मी बांधलेले काही आडाखे, काही अंदाज आणि काही मनसुबे, जसेच्य...

भोग आणि ईश्वर ५९९

भोग आणि ईश्वर  ५९९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करावी असा मानस आहे.  आज मालिकेचा विषय सोडून, आज माझे अनुभव कथन.     वास्तविक आतापर्यंत मी लिहिलेल्या लेखमालेत, सर्वात जास्त दिवस सलगपणे मी जानकी पुनः वनवास अर्थात उत्तर रामायण लिहिलं. जे मी पहिल्या प्रयत्नात सलग १०० दिवस आणि नंतरच्या दुसऱ्या भागात पुढचे ९५ दिवस लिहिलं होतं. पण त्यात सलगता नव्हती कारण, मधे मधे एखाद दोन दिवसाचा खंड पडला होता, हे नक्की. पण प्रयत्न या अर्थाने इतकाच होता. त्यानंतरही मी बऱ्याच लेखमाला लिहिल्या, पण त्यातील श्रीरुक्मिणी स्वयंवर, ९५ भागातील लेखमाला हीच सर्वात मोठी होती.  बाकी सर्व लेखमाला, जसं मुरली ५५ भाग, सुभद्रा हरण ३६ भाग, श्रीकृष्ण नीती ४६ भाग, इत्यादी ८ ते १० मालिका माझ्या कडून  लिहिल्या गेल्या आहेत. पण सर्वात जास्त सातत्य, फार अनुभवास होतं अशातला भाग नव्हता. त्यामुळे मागच्या अनुभवांच्या आधारावर, भोग आणि ईश्वर १ डिसेंबर, २०२० ला सुरू केल्यानंतर फार फार तर १०० ते १५० भागात संपेल, असा होरा होता. त्यातही, मी स्वतः हे नक्की आधीच निश्च...

भोग आणि ईश्वर ५९८

भोग आणि ईश्वर  ५९८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करावी असा मानस आहे.  आज मालिकेचा विषय सोडून, आज माझे अनुभव कथन.     खरतर भोग आणि ईश्वर ही मालिका, हाच एक चमत्कार आहे. चमत्कार या अर्थाने,की कोणतीही संहिता, विषय सुची  पूर्व लेखन, अगदी वाचनसुद्धा न करता फक्त आणि फक्त महाराजां वरील विश्वास श्रद्धा आणि आत्मचिंतन, या बळावर, पहिल्या दोन भागात संपवूया, या उद्देशाने १ डिसेंबर, २०२० ला फक्त दोनच लेख लिहून, दुसरा विषय घ्यावा, असा साधा उद्देश ठेवला मी. पण पहिले दोन लेख वाचक सूचनेनुसार पुन्हा वाचताना लक्षात आलं की, आपण विषयाची सुरवातसुद्धा न करता, इतिश्री करणार होतो. आजही २ डिसेंबर, २०२० चं माझं फेसबुक पेज पाहिल्यास लक्षात येईल की, दुसऱ्या लेखाचं शिर्षक भोग आणि ईश्वर (इतिश्री) असं आहे. असो. त्यानंतर या लेखमालेने मला अनेक गोष्टी मिळवून दिल्या आहेत. या लेखमालेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की, यातील प्रत्येक लेख, त्या लेखाखाली दिलेल्या तारखेलाच लिहिला आहे. म्हणजे एकही लेख आधी किंवा आगाऊ लिहून ठेवला नव्हता. अनेक अडचणीच्या काळातस...

भोग आणि ईश्वर ५९७

भोग आणि ईश्वर  ५९७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.     आत्मा हा देह, बुद्धी व मन याहून भिन्न आहे. त्याचं कार्य निश्चित आहे आणि ते साध्य करण्यासाठीच हा देह, हे कर्माचं बंधन हे सर्वकाही घडलं वा घडवलं गेलं. पण हे ज्ञानाने आणि योगानेच जाणता येतं की, मी या देहाहून, भिन्न आहे. जरी मी या देहात अभिन्न भासत असलो तरी, एका ठराविक काळानंतर, मला हा देह सोडून, बाहेर जायचं आहे. कुठे याचा शोधच घेण्यासाठी ईश्वराने, हा देह, बुद्धी आणि मनरुपी स्वतंत्र इंद्रिय किंवा एक स्वाप्रेरीत यंत्रणा दिली आहे.  त्याच्या सहाय्याने, मानवाने, आपल्या संपूर्ण आयुष्यात, हा शोध घ्यावा की, माझा प्रवास कुठून कुठे आहे, मी कोण आहे. पण या देहात आल्यावर आत्म्याचा, पूर्व जन्मांचा, सर्वांचा विसर पडल्यामुळे, मानव, मूळ उद्देश विसरून, संसारात रममाण होतो. इतका रममाण की, ज्यासाठी हा सुसज्जित देह ईश्वराने प्रदान केला, तो कार्यभाग न पार पाडताच, माणूस एका देहातून, दुसऱ्या देहात, संचीताचे भोग भोगत वणवण फिरतो.  यातून आपण काय साधलं, हा विचारदेखील, त्याच्या मन...

भोग आणि ईश्वर ५९६

भोग आणि ईश्वर  ५९६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.     कदाचित मनाच्या इच्छाशक्तीने, आसक्ती, कामना, वासना, इत्यादी गोष्टी पटकन यश देऊन जातात. याचं कारण म्हणजे ऊर्जा व शक्तीचा नियम. जेंव्हा एखादी वस्तू चार्ज होते, तेंव्हा ती त्यासमान गोष्टींना आकर्षित करते. मन जेंव्हा तश्या प्रकारच्या इच्छा करतं, तेंव्हा ते नकारात्मक ऊर्जेने चार्ज झालेलं असतं. त्यामुळे अर्थातच, तश्याच गुणांकडे ते आकर्षित होतं. किंवा तसेच गुण त्या मनाकडे आणि मनाच्या माध्यमातून, देह व बुद्धी यांना आकर्षित करते.  याचं अजून एक कारण म्हणजे असे हे दुर्गुण जलद प्रवाही असतात, अतीऊर्जा आणि अतिशक्ती यामुळे. म्हणूनच एकाच्या रागाने दुसऱ्याचा राग वाढतो. असे हे दुर्गुण, सहसा कोणत्याही गुणांना शरण जात नाहीत. कारण अतिऊर्जेमुळे, त्यांच्यात स्थिरतेचा अभाव असतो. याऊलट शांत शुद्ध आणि सात्विक गुण हे शीतल असल्या मुळे, कमी प्रवाही, कमी उर्जायुक्त असतात. परिणामी त्यांचं चलन वा वहन, संथ असतं. त्यांना गतिशीलता कमी असते.  म्हणून एखाद्या व्यक्तीचे स्वच्छ, शुद्ध विच...

भोग आणि ईश्वर ५९५

भोग आणि ईश्वर  ५९५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.     एक गोष्ट आपण नोट केली आहे का मनाची साथ किंवा एकग्रता असली किंवा नसली तरीही देह काही गोष्टी आपसूक करतो. ही गोष्ट तंद्रीत काही काम केल्यानंतर, आपल्याला तंद्रि भंग झाल्या, जाणवतं. आपण आश्चर्य चकित होऊन, विचार करतो की, आपण दुसराच कुठला तरी विचार करण्यात गुंग होतो तरी, काम पण कसं केलं. बरेचदा, हे केलेलं काम फारशा चुका न होता, व्यवस्थित झालेलं असतं.  यामागे काय विज्ञान आहे ते जाणून घेऊ. मुळात यात विज्ञान कसलं हा प्रश्न मनात येईल. तर कालपण आणि मागेसुद्धा अनेकवेळा मी म्हटल्या प्रमाणे, हे जगत पूर्ण पणे विज्ञानाधारीत आहे. त्यामुळे या जगतात कुठेही घडलेली वा घडणारी कोणतीही गोष्ट, घटना इत्यादिमागे, विज्ञान आहेच आहे. आपण ते समजतं नाही किंवा समजून घेऊ इच्छित नाही. म्हणजे अज्ञान किंवा अहं असतो. अज्ञान समजून घेऊ शकत नाही तर अहं समजू घेऊ देत नाही.  तर ज्यावेळी मन दुसरा विचार करतं, पण देह वेगळ्याच कार्यात मग्न होतं, त्यावेळी दोन वेगळ्या पातळीवर, दोन वेगळे तरंग व लहरी...

भोग आणि ईश्वर ५९४

भोग आणि ईश्वर  ५९४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.    मागेच सांगितल्याप्रमाणे, आपल्या मनातील प्रबळ इच्छा, आकांक्षा, आसक्ती आणि त्यातून घडणारी कर्म हे तीव्र लहरींचे स्त्रोत आहेत. त्यामुळे, त्यांना कधिनाकधी इच्छित स्थानी पोचून, आपलं लक्ष साधावं लागतं. त्यांच्याकडून ते घडवून घेण्यासाठी लागणारी ऊर्जा व शक्ती मनाची कार्यशक्ती, मनच त्या लहरिंमागे लावतं. म्हणूनच बरेचदा आपल्यालाच आश्चर्य वाटतं की, हे माझ्याकडून घडलं की, ब्रम्हांडाबाहेरील कोण्या शक्तीने करवून घेतले.  जरी एखाद्या शक्तीने असे कार्य केले असेल, हे काही प्रकरणात सत्य मानलं तरी, त्या शक्तीला आवाहन, आपणच आपल्या तीव्र इच्छाशक्तीने, केलं. ज्यामुळे विश्वात संचार करणारी, ती शक्ती जागृत होऊन, आपल्या कार्यार्थ, आपल्या प्रयत्नांना साथ देती झाली. यामागे सुद्धा एक विज्ञान आहे. जे विधात्याने हे जगत निर्माण करताना, घडवून आणलं. किंबहुना या जगताचा आधार फक्त आणि फक्त विज्ञानच आहे. बाकी चमत्कार वगैरे गोष्टी आपल्या त्रिमिती जगतातील, आपल्या तुटपुंज्या ज्ञानामुळे, आपल्याला समजलं...

भोग आणि ईश्वर ५९३

भोग आणि ईश्वर  ५९३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.  खरतर मनाची विलक्षण शक्ती, या ब्रम्हांडातील अनेक रहस्ये जाणून घेऊन, त्यातून आत्मशक्ती वाढवून व आत्मवृद्धी करण्यासाठी आहे. मनाच्या या शक्तीचा उपयोग मानवाने करावा, यासाठीच विधात्याने, ती शक्ती मानव या एकाच प्राण्याला दिली. उद्देश हाच की, या अद्भुत शक्तीचा प्रत्यय येताच, त्या अनुभूतीने, मानवी मन, ब्रम्हांडातील विश्व शक्तीचा अनुभव घेऊन, त्या शक्तीपुढे नतमस्तक होईल.  विश्वाच्या निर्मितीत नियंत्याने अनेक गुह्य गोष्टी निर्माण केल्यात, त्यातील अनेक गुह्य गोष्टींची ओळख, माणसाने पुरातन काळातच करून घेतली. सनातन धर्मियांनी, त्यांना धर्माच्या चौकटीत बसवून, मानवाला, इष्ट उद्देशा कडे नेण्यासाठी, अनेक मार्ग शोधून उपलब्ध करून दिले. या कार्यात, भगवंताने, मानवाला मदतच केली आहे. उदाहरणार्थ, या विश्वाचं, गुह्यतम ज्ञान सूर्याच्या मार्फत या जगतातील ज्ञानी लोकांना पोचवून, विश्वा बाहेरील रहस्याकडे मनाला नेऊन, त्यामार्फत आत्मतत्वाला ईश्वराकडे नेण्याचा प्रयत्न करावा.  मूळ संकल्पना असलेलं ...

भोग आणि ईश्वर ५९२

भोग आणि ईश्वर  ५९२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.  आपलं जीवन हे युगानुयुगे स्थित्यंतरे होत असताना सुद्धा एका ठराविक साच्यातून जात आलंय आणि जात राहील, हे खरच असच अपेक्षित आहे का आपल्याकडून, हे विधाता जाणे. पण वेद, पुराणं, धर्मग्रंथ, संत महंत यांचे व्यक्तिगत अनुभव आणि जीवनचरित्र नीट बारकाईने अभ्यासल तर लक्षात येईल की, ज्यांनी ज्यांनी ही सांसारिक चाकोरी सोडून, आत्मतत्वाला जाणून, या देहाच्या पलीकडे पाहून, जन्म मृत्यूच्या चौकटी पलीकडे पाहिलं, त्यांना या जगण्याचा खरा अर्थ सापडला.  त्यांनी त्यातून आपलं खरं उद्दिष्ट जाणून, या देहाचा सदुपयोग करून घेतला. त्यांना ते एकाच जन्मात साधलं, याचा खोलात जाऊन विचार केला तर, लक्षात येई की, यातील बहुतेकांना खूप लहानपणीच जगण्याचं प्रयोजन लक्षात आलं होतं. त्यांच्या पारमार्थिक जाणीवा, अत्यंत लहान वयात किंवा योग्य वयात, प्रगल्भ झाल्या होत्या.  परिणामी, ज्या गोष्टी आपण सांसारिक मानव उच्च दर्जाच्या मानतो, त्या गोष्टी, त्यांनी त्याज्य मानल्या. भले भले आपल्या इच्छा, आकांक्षा, लालसा, मोह, मा...

भोग आणि ईश्वर ५९१

भोग आणि ईश्वर  ५९१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.    मनाला नियंत्रित करण्यासाठी अनेक युक्त्या प्रयुक्त्या अनेकांनी सांगितल्या आहेत. त्या सर्वांचा वापर प्रत्येकाने आपल्या आपल्या उद्देशांसाठी करावा. पण यातही स्वार्थ आणि परमार्थ असावा किंवा असल्यास, अनेक लाभ हे नकळत मिळत जातात. मनाची एकाग्रता ही अनेक क्षेत्रात किंबहुना प्रत्येकच क्षेत्रात, प्राथमिक गरज आहे. कारण मन जर एकाग्र होत असेल, तरच आपल्या सर्व ऊर्जा व शक्ती एकत्रितपणे उपयोगात आणता येतात.  एक नक्की ध्यानात ठेवा की, या देहात असलेल्या प्रत्येक पेशीमध्ये, ईश्वराने शक्ती व ऊर्जा भरून ठेवली आहे. त्या त्या प्रसंगात, तो तो अवयव, इंद्रिये आपला कार्य करतात. पण हे कार्य उत्तम तऱ्हेने करवून घेण्याचा अधिकार व जबाबदारी, ही मनाची आहे. कारण अपरिमित ऊर्जा व शक्ती यांचा अभूतपूर्व संगम जर कशात असेल तर तो मनात.  मनाची अजून एक ताकद वा गुण हा आहे की, ते देह बुद्धी आणि चैतन्य शक्ती असलेला आत्मा, यांच्याशी संधान आणि संबंध प्रस्थापित करून, त्यांच्या गुणांचा व दोषांचा वापर करून...

भोग आणि ईश्वर ५९०

भोग आणि ईश्वर  ५९० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.    मनाच्या अनेक अवस्थांमध्ये मनाची जडणघडण कशी आहे, यावर ते मन अनेक कसोट्यांवर कसं प्रतिक्रिया देतं, काय कृती करतं, हे अवलबून आहे. मनाच्या अवस्थेतून मनाची लवचिकता किती आहे, हे  लक्षात येतं. मनाला सर्व परिस्थितीशी जुळवून पुढे जाण्याची सवय असावी. पण यातील काही गोष्टी आपल्या हातात असतातच असं नाही, असा एक समज असतो.  असा समज होण्याचं कारण म्हणजे आपण मनाच्या ताब्यात असलेल्या बुद्धीने कार्य करतो आणि विचार करतो. जर आपण अश्या कोणत्याही बंधनाशिवाय बुद्धीला विचार करायला लावलं, तर नक्कीच लक्षात येईल की, मन हे जर नियंत्रणात आलं, तर नक्कीच त्याचा उपयोग अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी होऊ शकतो. पण या स्थितीला येण्या साठी मनाला शांतपणे विचार करायला लावायची सवय जडवून घ्यावी लागते.  अर्थात काही जणांना उपजत शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची सवय असते, अगदी जन्मतः. यावर विचार केला तर लक्षात येईल की, याची बीजं एकतर जन्माआधीच्या संगोपनात असतील किंवा आदल्या जन्मातील अर्धवट राहिल...

भोग आणि ईश्वर ५८९

भोग आणि ईश्वर  ५८९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.  एखाद्याच्या मनातील लहरींचा परिणाम आपल्यावर किंवा आपल्या मनावर व्हायला, आपणही तसेच संवेदनशील असावं लागतं. याचीच दुसरी बाजू म्हणजे, असा एखाद्या लहरींचा परिणाम व्हायला त्या लहरिंमधे तशी शक्ती व ऊर्जा असावी लागते. त्याला आपण प्रेरक ऊर्जा वा शक्ती म्हणू शकतो. अशी शक्ती आणि ऊर्जा लहरिंमध्ये प्रकट व्हायला,मुळात त्या व्यक्तीमध्ये तसे गुण तीव्र स्वरूपात असणं गरजेचं आहे.  अश्या व्यक्तित्वाच्या व्यक्ती दिसताच आपला छाप वा प्रभाव पाडून समोरच्या व्यक्तीला प्रभावित व प्रेरित करतात. अर्थात अश्या व्यक्तींमधे सकारात्मक वा नकारात्मक विचार वा विचारांचा पाया तीव्रतेने भरलेला असतात. मनाच्या जडण घडणीत असे तीव्र स्वरूपाचे विचार निर्माण होण्याचा योग, कर्मात, संचितात असतो.  यामधे मध्यम विचारांची, वर्तणुकीची लोक दोन्ही प्रकारच्या व्यक्ती विषेषाने प्रभावित होतात वा भारली जातात. त्यांना, ज्या प्रकारच्या व्यक्तींशी संबंध येईल, त्या प्रकारच्या व्यक्ती भावतात. म्हणूनच अश्या व्यक्ती सात्विक ते...

भोग आणि ईश्वर ५८८

भोग आणि ईश्वर  ५८८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.   मनाच्या सामर्थ्याचा सदुपयोग वा दुरुपयोग हा त्या शक्तिमागील उद्देश व प्रेरणा, यावर अवलंबून आहे किंवा असतं. म्हणजे जर उद्देश स्वार्थ असेल तर त्यामागील प्रेरणा ही,या स्वार्थापायी मिळू शकणारे किंवा अपेक्षिलेले लाभ ही असेल. म्हणजे यानंतर साध्य आणि साधन हे त्या चुकीच्या ध्येयासाठी एकत्रित कार्य करण्यास प्रोत्साहित होतात. त्यानुसार अयोग्य व अहितकारक मार्गांचा वापर, हे साधन ठरते.  याऊलट ज्यावेळी उद्देश हित असेल तर नक्कीच प्रेरणा ही विवेक व विचार हे असतात. त्यामुळे या उद्देश व प्रेरणेने मनुष्य कार्य करत राहून, आपल्या उद्देशासाठी योग्य मार्गांचा वापर करतो. मनातील इतर सर्व विचार हे, मूळ उद्देशामागे त्याचं पद्धतीने कार्यरत होऊन, संपूर्ण स्वभाव व वृत्ती त्याचप्रकरची होतात. म्हणजे हेतू, मार्ग आणि त्यावरून स्वभाव व वृत्ती माणसाची ओळख बनतात.  यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, एखाद्या माणसाचा स्वभाव व वागणूक कळतो किंवा कळू शकतो.  कारण आपल्या मनातून आपला हेतू, उद्देश, प्...

भोग आणि ईश्वर ५८७

भोग आणि ईश्वर  ५८७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.  मनाची शक्ती, व्याप्ती व ऊर्जा ही अतिप्रचंड आहे, यावर पुरेसं चिंतन आपण यालेखमालेत आधी अनेक लेखात, केलं आहे. पण मनाची खरी कार्यक्षमता ही आहे की, देह, बुद्धी व वाचा या तीनही कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये यांच्यावर नियंत्रण ठेवून, त्यांच्या कडून अपेक्षित, इच्छित कर्म करवून घेऊ शकते. म्हणजे यातच मनाच्या कार्मक्षमतेची विशालता वा व्याप्ती ध्यानात येईल. पण यात एक गुह्य दडलं आहे. ते म्हणजे, एकदा जर या मनावर नियंत्रण मिळविता आलं की, देह, बुद्धी इंद्रिय यांसह संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण मिळवता येईल.  या गुह्याच्या प्राप्तीसाठीच अनेक मार्ग, अनेक साधनं, अनेक सिद्धी जन्माला आल्या. कारण एकदा मनातील या अद्भुत सामर्थ्याचा धागा सापडला की, त्या आधारे, मनात इच्छा उत्पन्न करून, मनाच्या सामर्थ्याच्या सहाय्याने, इच्छित कार्य पूर्ण करता येऊ शकतं. पण या सर्वाचा मुख्य गाभा मनाच्या अद्भुत शक्तीला साद घालून, त्याद्वारे सर्व व्यवस्था इच्छित कार्य पूर्ण क्षमतेने आणि कुशलतेने सिद्धीस नेण्यासाठी मन...

भोग आणि ईश्वर ५८६

भोग आणि ईश्वर  ५८६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    मनाच्या एकाग्रतेच महत्व इतकं अद्भुत आणि अलौकिक आहे, की एका स्थिर चित्ताच्या सहाय्याने माणूस अभ्यास चिकाटी, ध्यान, तप आदी मार्गांनी आपल्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. खरतर यामागे शास्त्र आणि विज्ञान आहे. यात कोणताही चमत्कार नाही. कारण हे संपूर्ण जगत विज्ञानावर आधारित आहे आणि प्रत्येक क्षण घडणाऱ्या छोट्यातील छोट्या घटनेपासून, अनेक वर्षांनी घडणाऱ्या अद्भुत खगोलीय किंवा अध्यात्मिक घटनेमागे सुद्धा वैज्ञानिक व शास्त्रीय कार्यकारण भाव असतोच असतो.  आपण या सर्व गोष्टी, पृथ्वीवरून अर्थात मर्त्य जगतातून बघत असल्यामुळे, आपल्या आकलनाला निश्चितच मर्यादा असतात. पण मग आपण या अनेक घटनांमागची कारणं कधीच जाणून घेऊ शकत नाही का. तर याचं उत्तर थोडं विचित्र आहे. म्हणजे आपण या जगतातील पंचमहा भूतरूप देहाच्या कक्षा व मर्यादा ओलांडू शकलो तर नक्कीच या त्रिपरिमिती जगताच्या पार जाऊन, अनेक अद्भुत रहस्ये, गुह्य गोष्टी जाणून घेऊ शकतो, ज्या गोष्टी सामान्य बुद्धीच्या जाणिवांच्या पलीकडे आहेत.  यासाठी, ईश्वराने मनाला दिलेल्या अमर्याद ...

भोग आणि ईश्वर ५८५

भोग आणि ईश्वर  ५८५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     मनाची महती गावी तितकी थोडी आहे. या मनाच्या सामर्थ्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. तरीही अजून बरंच काही सांगायचं राहूया गेलं आहे, असच सांगणाऱ्याला वाटतं असेल. पण मुख्य सामर्थ्य , मनातील जाणीवा जाग्या करून, आसक्ती कमी करून, देह बुद्धी मन यांचं संतुलन व एकाग्रता साधून, मिळालेल्या आयुष्यातील जास्तीतजास्त वेळ सत्कारणी लावून, ईश्वरी भेटीच्या उद्देशापर्यांत जाणं, हे आहे.  मनाच्या या अफाट शक्तीची आणि त्याद्वारे भक्तिच्या, मार्गातील श्रद्धा नामक अपूर्व ईश्वरी देणगीची जाण मनाला आली की, त्या जाणीवेतून माणसाला आपल्या खऱ्या मार्गाची, त्यावर चालायची बुद्धी जागृत होते. मनाला भगवंतांनी दिलेल्या या अफाट आणि अचाट सामर्थ्याचा प्रत्यय आला किंवा नाही आला तरीही मन आपला हे सामर्थ्य दाखवत. पण आपल्याला त्याच्या या सामर्थ्याचा प्रत्यय न आल्यामुळे, आपण त्याचा सदुपयोग करून घेण्यास सक्षम नसतो. म्हणजे सामर्थ्य आहे, पण त्याची जाण नसल्यामुळे, आपली अवस्था, शक्ती विसरलेल्या हनुमंता सारखी असते, जो प्रचंड शक्ती, ऊर्जा यांचा प्रत्यक्ष महासागर असू...

भोग आणि ईश्वर ५८४

भोग आणि ईश्वर  ५८४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    कर्म हे फलद्रूप होणार हे नक्की. पण कोणतं कर्म फलद्रूप होणार हे जाणून घेणं सुद्धा, महत्वाचं आहे. मुळात माणूस कारा, वाचा, मन आणि बुद्धी, यातील एक किंवा सर्व मार्गाने जे काही करतो, ते कर्म.  पण या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा घटक, जो प्रत्येक कर्मात अविभाज्य भाग गणला जातो, तो म्हणजे सर्व कर्मात असलेला मनाचा सहभाग. मन हे असं इंद्रिय आहे, हे काय वाचा व बुद्धी, यांना प्रेरक आणि पूरक आहे.  प्रेरक म्हणजे, इतर तीनही इंद्रियांना चालना देऊन, त्यांना कार्यरत ठेवून, त्यांच्याकडून आपल्या, अर्थात मनाच्या, अपेक्षा, आसक्ती, वासना, इच्छा, दृढ निश्चय, हे सर्व साध्य करण्यासाठी आवश्यक सर्व शक्ती पणाला लावून, प्रसंगी, शरीर, बुद्धी व वाचा याचं नुकसान सुद्धा सहन करायला लावण्याची दाहकता, या मनात असते. जे मन प्रसंगी मऊ लोण्यासरखं असतं, तेच वेळप्रसंगी एक दोन नव्हे तर काही लाख बळी घेण्याइतक, कठोर किंवा निष्ठुर होऊ शकतं. म्हणजेच एखाद्या छोट्याश्या कर्मात सुद्धा मनाचा सहभाग असतोच असतो. देह, बुद्धी व वाचा यांना मनात असलेला विचार, अव्यक्त भाव, ज...

भोग आणि ईश्वर ५८३

भोग आणि ईश्वर  ५८३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    कर्माचं गणित मांडताना काही गोष्टी किंवा मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत. सर्वसाधारणपणे कर्म जाणून घेताना या गोष्टी उपयोगात येतात.  कर्म म्हणजे काया वाचा बुद्धी व मन या चार माध्यमातून, आसक्तियुक्त  असं जे काही प्रत्येक जीवा करतो, त्याला कर्म म्हणता येईल.  कर्म म्हणजे फक्त काही करणं असं नाही, तर काहीही न करणं सुद्धा, कर्मच गणल जातं.  कर्म हे काहीतरी फलनिष्पत्ती निर्माण करतं. म्हणजे त्याचा चांगला वा वाईट असा परिणाम निर्माण होतो. हा परिणाम म्हणजे फल. हे फल आपल्या अपेक्षेप्रमाणे असेल किंवा अपेक्षेप्रमाणेच नसेल. अपेक्षा ही आसक्ती, इच्छा, कामना, वासना इत्यादी मधून निर्माण होते.   हे फल, प्राप्त होण्याचा कालावधी, कमी अधिक असतो.  प्रत्येक क्षण, प्रत्येक जीव कर्म करतच असतो. घेतलेला प्रत्येक श्वास देखील कर्म निर्माण करतो. त्यामुळे अर्थातच उच्श्र्वास देखील कर्मच ठरतं.  प्रत्येक कर्म बद्धता निर्माण करतं. म्हणजेच प्रत्येक क्षण माणूस कर्म आणि त्याचं फल निर्माण करून, काळाच्या गतीनुसार कर्मफल शृंखला निर...

भोग आणि ईश्वर ५८२

भोग आणि ईश्वर  ५८२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     आता एक नक्की आहे की कर्म व फल यांची संगती आणि विसंगती आपण जाणली. आता याच विषयात पुढे जाऊ. या जन्मात आपण, अशी फल भोगतो जी या जन्मातील कर्माशी विसंगत आहेत किंवा असतात. म्हणजेच आधीच्या काही जन्मात आपण अशी काही कर्म केली असतील, जी त्या जन्मात फल देऊ शकले नसतील. त्या सुप्त कर्मानी आपलं फल, आपल्या पुढ्यात या जन्मात वाढलं.  आता याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, आपल्या सध्याच्या जन्मातील काही कर्में, नक्कीच या जन्मात सुप्त राहिली असतील. ती सर्व सुप्त कर्म, नक्कीच पुढच्या जन्मात आपलं फल देणार. मग जर या जन्मा तील नकारात्मक, अनिष्ट व पाप कर्में, जी आज सुप्त राहतील, तर त्यांचे भोग आपल्याला पुढच्या जन्मात नक्कीच फल देणार. हाच नियम या जन्मातील, चांगल्या, सकारात्मक, इष्ट कर्माना लागू पडतात.  त्यामुळे आपल्या प्रश्नाचं काही प्रमाणात उत्तर यात दडलेलं आहे. सर्वात प्रथम कर्म सुधार घडवणं. ज्यामुळे कुठेतरी अनिष्ट कर्म व त्यातून समोर येणारं, अनिष्ट फल, यांची साखळी तुटेल. दुसरं म्हणजे चांगल कर्म हातून घडेल, याची काळजी घेणं. जेणे करू...

भोग आणि ईश्वर ५८१

भोग आणि ईश्वर  ५८१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     कर्म आणि फल याची संगती, या विषयावर आपण काळ बोलत होतो. अशी संगती काही बाबतीत लावता येते आणि कर्मफळ सिद्धांत काही बाबतीत आपण सिध्द करू शकतो. म्हणजे काही बाबतीत असा सिद्धांत पटतो किंवा पटू शकतो. पण काही घटना, प्रसंग वा परिणाम याबाबत अशी सगती लावता येत नसल्यामुळे, काही गोष्टी, प्रसंग,घटना वा परिणाम याबाबत ते आपण नाकारत नसलो तरी भ्रमित नक्कीच होतो.  हे भ्रमित होणं, किंवा अशी संगती लावता न आल्यामुळे, कर्मफल सिद्धांत, नाकारतो किंवा एकूणच देव वा त्याच्या अस्तित्वाबद्दल आपण साशंकित होतो. काहीजण अनेक उदाहरणं देऊन, असा काही सिद्धांत नाहीच असं ठामपणे सांगतात. तर काहीजण एकूणच देव वा दैव आणि ईश्वर यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभं करतात. याबद्दल, आपण काही चिंतन अवश्य करू शकतो.  मुळात अश्या विचारांच्या व्यक्ती काही व्यक्तिगत उदाहरणं सांगून वा मांडून. देवाचं अस्तित्व पूर्ण नाकारून, तश्याप्रकारे इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न करतात. अश्या प्रकारच्या मुद्द्यातून, त्या व्यक्तींचा दृष्टिकोन असा असतो की, जे मला पटलं, ते या ...

भोग आणि ईश्वर ५८०

भोग आणि ईश्वर  ५८० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    खरंतर जन्म आणि मृत्यू, ही आपल्यासमोर घडणारी घटना आहे. म्हणजे आपला जन्म आणि मृत्यू हे आपण पहात नाही तरी, आपल्या आयुष्यात अनेक जन्म आणि अनेक मृत्यू आपण पाहतो. एका ठराविक क्षणी आपलं सुद्धा अस्तित्व या जगातून नष्ट होईल, हे वादातीत सत्य आहे. फरक इतकाच की, एका ठराविक क्षणानंतर या देहाला, मनाला, बुद्धीला, ते जाणवण्या साठी, ते तिन्ही घटक चैतन्यावस्थेत नसणार. नंतर सुरू होईल तो फक्त आत्म्याचा, कर्मसंचीत सोबत घेऊन, पुढील जन्माची, देह मिळण्याची प्रतीक्षा करत. ही प्रतिक्षासुद्धा, किती काळ असणार, हे त्या कर्माचं संचित काय आहे,त्यातील भोग आणि उपभोग काळाच्या कोणत्या पटलावर सुयोग्य पद्धतीने, आत्म्याला देहाच्या माध्यमातून भोगायला योग्य आहे, त्यानुसार, अचूक त्याचं काळात हा जन्म होऊन, काळाचा साठ, सत्तर वा तत्सम काही काळ, त्या देहात राहून, कर्माच्या संचिताचा तितकाच भाग भोगून होईल, जितका त्या संचितात लिहिला आहे. कारण यांचं सुद्धा एक गणित नक्किच असणार.  आता जो देह आता आपल्याला मिळाला आहे, त्यानें काय काय भोग भोगून झाले आणि काय काय भोग अजून ...

भोग आणि ईश्वर ५७९

भोग आणि ईश्वर  ५७९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    मनाची सर्वात महत्वाची खासियत म्हणजे, त्या मनाला कधीही रीता ठेवता येत नाही. किंबहुना भाव व विचार रहित मन ही संकल्पना तशी बऱ्यापैकी अशक्य कोटीतील वाटते. म्हणजे योगी, साधक व समाधी पर्यंत पोहोचलेले महान आत्मे यांनी कदाचित शून्य विचार ही गोष्ट साधली असेल, हे निश्चित. पण सर्वसामान्य माणसाला, या गोष्टी जमणं ही नक्कीच कल्पने पलीकडील आहेत. कारण मुळात मन हे स्थिर होऊ शकतं, हेच आपल्याला पटणार नाही.  कारण मन हे सतत काही ना काही विचार करणारच. मग त्याला स्थिर कारण कसं शक्य आहे. यावर एक विचार सांगतो, त्यावर चिंतन करा. मनाला स्थिर करण्याचा विचार करण्यापेक्षा, मनातील विचारांना स्थिर करण्याचा उपाय करून बघू शकतो. म्हणजे संकल्पना अशी की, अनेक विचारातून मनाला स्थिर करण्याच्या फंदात न पडता, मनातील अनेक विचारातून, मनाला एका विचारावर स्थिर करणं, आपण नक्कीच साध्य करू शकतो.  म्हणजे अनेक विचारातून शून्यावर येण्याआधी किंवा येण्यापेक्षा, त्यातील एका विचाराच्या धाग्याला पकडून, बाकीच्या विचारांना आपोआप side track करणं किंवा बाजूला सारणं हे नक्...

भोग आणि ईश्वर ५७८

भोग आणि ईश्वर  ५७८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  काल आपण म्हंटल्याप्रमाणे, आपण मनाचा तो गुणधर्म पाहू, ज्याचा आपण सदुपयोग करून, अहित टाळून, हित साधू शकतो. मनाचा गुणधर्म म्हणजे मनाला सतत काही ना काही गुंतवणूक लागते. मन एका क्षणातून दुसऱ्या क्षणात जाताना, त्या मनाला कुठेतरी गुंतवाल तर, आधीच्या क्ष्णातील गोष्ट, भाव विचार बदलतात. ते नवीन ट्रॅकवर जातात. म्हणजेच मनाला सतत कार्यरत ठेवणं. जेणेकरून, त्याला आसक्तीतून बाहेर काढता येईल. पण यातसुध्दा अडचण अशी आहे की, सतत काय करणार आणि कसं मनाला कार्यरत ठेवणार.  म्हणजे मन सतत कार्य करत राहील आणि त्याला विचारमग्न ठेवण्यासाठी, तशाच प्रकारचं कार्य असणं आवश्यक आहे. पण अजून एक अडचण यामधे अशी आहे की, मन हे देहाच्या इतर इंद्रियांप्रमाणे मज्जा संस्थाच्या आधीन असणारं इंद्रिय नाही. तर ते स्वयंप्रेरीत आणि स्वयंनियंत्रित इंद्रिय आहे आणि अश्या इंद्रियाला, दमन करून, नियंत्रित करता येत नाही.  त्या मनाला मुळात नियंत्रित करता येत नाही. तर त्या मनाला एकाग्र करता येतं. याचसाठी गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे. म्हणजे विचार करा की,  एखाद्या व्यसनात गु...