Skip to main content

#श्रीकृष्णनीती #भाग२१

#श्रीकृष्णनीती #भाग२१

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

महाभारत , जे मुख्यत्वे असत्य, दंभ, दुराचार, अन्याय, लोभ,अनीती,अत्याचार,टोकाचा अभिमान आणि गर्व, यांविरुद्धची सभ्यता,सुसंस्कृतपणा,निकोप व्यवहार, नीती, निगर्वीपणा,न्याय याच्याशी असलेली लढाई वा युद्ध यांची महागाथा. मुळात यातील काही संघर्घ जो स्वतः श्रीकृष्ण यांचा. त्यांनी अनेक असुर शक्तींशी संघर्ष केला ज्यात स्वतः कंस, चाणूर, नरकासुर,  शिशुपाल इत्यादी ज्या सर्वांना त्याने मारलं. काही शक्ती ज्यांचा ते वध करू शकत नव्हते त्यांना त्यानी परस्पर वा दुसर्यांकरवी वध करवून संपवलं. 

उदाहरणार्थ यवनासूर, जरासंध इत्यादी. श्रीकृष्णाने आपलं दैवत्व अनेक प्रसंगात सिद्ध केलं आहे. जे जन्मतः कंसाच्या कारागृहातून गोकुळला वसुदेवाच्या माध्यमातून झालेला प्रवास येथेच सिद्ध होतं . तरीही वयाच्या काही महिन्यात पुतना, तृणासुर,  वृषभासुर आणि बकासुर, आठव्या वर्षी कंस आणि चाणूर यांचा वध इत्यादी घटनांमधून दर्शवून दिलं.
 
श्रीकृष्णाचं अस्तित्व वा नियंत्रण देखील अनेक प्रसंगात दिसून येतं . त्यावेळच्या काही मोजक्या मुसद्दी व्यक्तिमत्वात श्रीकृष्ण नक्कीच उच्च होते. यात वाद नाही. त्यांचा मुसद्दीपणा व दूरदृष्टी अनेक घटनांमधून दिसून येते. ज्येष्ठ बंधू श्रीबलराम यांचा विरोध असल्याकारणाने परस्पर अर्जुना करवी सुभद्राहरण करवून सुभद्रा व अर्जुन यांचा घडवून आणलेला विवाह,   महाभारत युद्धात कर्णाचं इंद्रास्त्र काढून वा वापरून संपावण्यासाठी घटोत्कचाचा उपयुक्त वापर, इत्यादी. समस्त महाभारत हे नीच आणि उच्च व्यक्तित्वांचा संघर्ष आहे. कळत नकळत प्रत्येक जण यात कुठल्यातरी बाजूला ओढला गेला आहे. तटस्थ राहिलेले फक्त श्रीबलराम. 

कौरव आणि पांडव यांना प्रतिकात्मक पाहिलं तर मूळ पंचमहाभूतांच्या शरीरात स्थित आत्मरूपातील श्रीकृष्ण, पंचेंद्रियरूप पाच पांडव, अनंत रूपातील या जन्मातील व संचितात मिळालेल्या वासनारूपातील शत कौरव आणि त्यांच्यातील काम आणि क्रोधरूप दुर्योधन व दुःशासन, मनातील वासनेचा ओढ लागलेला आणि वासनेवर पुत्रवत प्रेम करणारा आंधळा धृतराष्ट्र, मनातील वासनेत सापडलेले द्वंद्व रूपातील भीष्म, 

गुरुसम वाटणारे परंतु अंती आपल्याच विरुद्ध जाणारे भौतिक जगतातील मिथ्यारूप शिक्षणाचे द्रोण आणि या वासनेच्या महासागरात परिस्थितीवश हतबल कर्ण आणि मिळालेल्या संधीचा वा जन्माचा सदुपयोग न करून घेता संसाररूपी चक्रात स्वतःला मुद्दाम , जाणूनबुजून वा कळतनकळत अडकवलेला अश्वत्थामारूप देह जो यासर्व युद्धात देहाच्या , वासनेच्या , भोगाच्या माध्यमातून अनंत जन्मांसाठी आत्म्याला पुन्हा पंचमहाभूतरूप देहात गुंतवून भोग भोगायला लावणारा. 

इतका सोप्पा अर्थ लावला तर लक्षात येईल की हे महायुद्ध हे खरंच धृतराष्ट्र आणि कृष्ण यांच्यातीलच मुख्य द्वंद्व आहे. कारण वासनेला पोसणारं, त्याला सांभाळणारं आणि त्याला प्रेमाने प्रतिपाळ करणारा आंधळा धृतराष्ट्र आणि अंतरातम्याच्या आवाजातील व्यासरूप आपला स्व जो ओळखून आत्मरूप श्रीकृष्णाच्या अनुषंगाने व त्याच्या आज्ञेने जीवनाचं हित साधलं तर पंचेंद्रियरूपा तील अर्जुन बंधू नौका नक्कीच भावसागरातून पार नेतील. 

यातील अजून एक गर्भितार्थ हा आहे की जर वासनेच्या तालावर चालणारा देह नितीमत्तारूप द्रौपदीला हात लावून तुम्हाला पथरहित करण्याचा यत्न करतोच, अश्यावेळी अंतरातम्याच्या श्रीकृष्णाचा धावा करून संकटसमयी साद घातल्यास आत्मा नक्कीच सहाय्यार्थ येईल. परंतु त्यासाठी आत्म्याचा आवाज ऐकण्याची मनाला जाणीव असली पाहिजे, नव्हे तशी सवय मनाला जाणीवपूर्वक जडवून घेतली पाहिजे. तरच आपला आतला आवाज आपल्याला ओळखता येईल. 

आता उद्यापासून धृतराष्ट्र आणि श्रीकृष्ण यांच्यातील संघर्ष बघूया.

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले

भाग एकविसावा  समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...