Skip to main content

"आत्मनिर्भर भारत"

आत्मनिर्भर भारत 

करोनाच्या सकारात्मक बाजूचा विचार करूया. 

ज्यावेळी देशामागून देश या कोविड -१९ या आजाराने धाड धाड कोसळायला लागले, त्यावेळी या देशातील  तमाम देशद्रोह्यांनी (तथाकथित पुरोगामी), मनात विचार केला कि, आता भारत संपला. 

त्यांनी विचार केला बहुसंख्य भारत हा अजूनही गरीब आहे. इथे पुरेशी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर वैद्यकीय सुविधा नाहीत. (जसे काही यांना देशाची , या आधी फार चिंता होती)

त्यांनी विचार केला कि, मोदी या विपत्तीच्या काळात उपचारासाठी व्हेंटीलेटर्स , हॉस्पिटल्स , वैद्यकीय सुविधा , औषधं हे सर्व कुठून आणणार. 

एक वॉशिंग्टन मधून शिकून आल्याचा आव आणणारा , स्वघोषित तज्ज्ञ , प्रत्यक्षात इडियट असलेला   (व्हाट्सअप तज्ञहि आले यात) टीव्ही आणि इतर प्रसार माध्यमांवर सांगायला लागला कि, आता भारतीयांनी त्सुनामी साठी तयार राहावे. कमीतकमी ३० करोड भारतीय बाधित होतील आणि १ करोड च्या वर जीव गमावतील . 

बीबीसी , एन डी टीव्ही , न्यूयॉर्क टाइम्स , वॉशिंग्टन पोस्ट सर्व म्हणायला लागले, कि, जर अमेरिकेची हि हालत होत आहे, तर भारत संपलाच. लुटीयन गॅंग आणि प्रेश्या यांना तर मौका मौका असा आभास पण झाला. आता या उत्पादा नंतर मोदी संपतील आणि आपल्याला रॉल दा विंची ला लाँच करायला चांगली संधी मिळेल. 

तो इडियट तर म्हणायला लागला इंडिया संपेल म्हणून मला अमेरिकन अर्थ तज्ञ बोलावून देशाला यातून वाचवू द्या. 

जो देश १००० वर्षाच्या इस्लामिक राजवटीनंतर आणि १९० वर्षांच्या गुलामीनंतरही टिकून राहिला तो कोविड -१९ या आजारानंतर संपेल हा भ्रम होता त्यांचा. 

कोणतीही संस्कृती , कोणत्याही विपरीत परिस्थितीशी लढून, त्यातून टिकून, वर येण्यास सक्षम नसेल,  तर ती १००० वर्षाची इस्लामी राजवट सहन करूच शकली नसती. 

प्रत्येक वेळी जेंव्हा जगाला असं वाटतं कि, आता भारत संपला, त्या त्या प्रत्येक वेळी आपण त्याच संकटाचं संधीत रूपांतर करून सशक्त होऊन उभे राहतो. हा इतिहास आहे आपला. 

आणि प्रत्येक वेळी या देशाचं प्रारब्ध, त्या त्या संकटाच्या काळात देशाला उभं करण्यासाठी एक सक्षम नेतृत्व प्रदान करतो, जणूकाही त्याला त्याच कार्यासाठी पाठवण्यात आलय. 


आधी असंही म्हणण्यात आलं कि, तुम्ही टेस्ट्स कमी करता म्हणून तुमच्याकडे केसेस कमी आहेत. परंतु आपण १लाख केसेस दर दिवशी टेस्ट करतो आणि आपलं समीकरण २५ टेस्ट्स मध्ये १ पॉसिटीव्ह हे आहे आणि हेच अमेरिकेत ५ टेस्ट्स समोर १ पॉसिटीव्ह असं आहे. 

अमेरिकन म्हणाले आमच्याकडे पुरेश्या PPE किट्स नाहीत. आपण २लाख किट्स दर दिवशी बनवून, सर्व विकसित देशांना निर्यात केल्या आणि करतोय. आपल्याकडे बऱ्याच कंपन्या आपलं मूळ उत्पादन बंद करून या किट्स बनवण्यासाठी आवश्यक बदल करून  आणि  या किट्स तयार करून विकसित, तसेच अन्य देशांना (जे या कीट्ससाठी झगडत आहेत अश्यांना) निर्यात करत आहे. 

त्यांना औषध नव्हते तेंव्हा आपण हैड्रोक्लोरोक्वीन जवळजवळ ८० देशांना निर्यात केलं. 

ते म्हणाले आता किमती आकाशाला भिडतील. आपण त्याही नियंत्रणात ठेवून वितरित करतोय, सार्वजनिक प्रणाली आणि खाजगी वितरणातून. 

जगातील सर्वोच्च देश टॉयलेट पेपरसाठी झगडत होता आणि आम्हाला चिंता आहे तयार झालेले आंबे लोकांपर्यंत कसे वितरीत करावेत. 

जेंव्हा जगात सर्व देशातील अर्थव्यवस्था ठप्प होण्याच्या मार्गावर आहे, तेंव्हा त्यांनी विचार केला कि, आता लाखो बेकार व स्थलांतरित मजूर लोक रस्त्यावर उतरून विद्रोह करतील. 

पण मोदींनी २० लाख करोडच्या आर्थिक सहाय्याची घोषणा करून त्याच अर्थव्यवस्थेत नवीन जीव फुंकला. 

कोणताच देश आता चीनबरोबर संबंध ठेवू इच्छित नव्हता. परंतु मार्ग सापडत नव्हता. त्याचवेळी मोदींनी पुढे जाण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नवीन मंत्र देऊन स्वतःच्या देशात स्वतः बनवलेल्याच वस्तू वापरण्याचा नवा मंत्र देऊन चीनला उत्तर देऊन, त्यायोगे जगाला नवी वाट दाखवली. यात आता भारत देशातच किती रोजगार निर्मित होईल. कदाचित पूर्ण आत्मनिर्भर होण्याकरता ५ ते १० वर्ष जातील. पण तोपर्यंत अर्थव्यवस्था पुन्हा उत्तेजित होईल. कारण अजून जगाने करोनाचा after effect बघितलाच नाहीये. पण मोदींनी तो विचार करून आत्मनिर्भर भारतासाठी देशाला आणि अर्थव्यवस्थेला उभारी दिली. कदाचित made in India हा पुढचा परवलीचा शब्द  असेल, जगात. चीनला साफ करायला जगातील बऱ्याच देशांना इकडे यावंच लागेल हे ओळखून खूप विचारांनी आणि दूरगामी परिणाम करणारी दिलेली हि हाक आहे आणि घेतलेला निर्णय आहे. 

कारण कोणालाच आता यापुढे चीनशी व्यवहार नकोय. पण पर्यायही उपलब्ध नाहीये. तो पर्याय भारत असेल. जो स्वतःच्या देशात स्वतः बनवून स्वतः वापरेल आणि जगाला देखील वितरित करेल. आत्मनिर्भरतेचा व्यापक आणि दूरगामी अर्थ तो आहे. कारण खरे नेते तेच असतात जे संकटातून संधी शोधून देशाला मार्ग दाखवतात.  हा आत्मनिर्भरतेचा मार्ग खरंच व्यापक अर्थाने देशाने अवलंबला तर फारच थोड्या वर्षात भारत चीनला मागे टाकून एक उत्तम अर्थव्यवस्था आणि विकसित देश म्हणून पुढे येईल. तेही विश्वासार्ह आणि खात्रीशीर देश म्हणून. फसवा देश म्हणून नाही. 

कारण आपल्याकडे जमीन आणि मनुष्यबळ पुरेसं आहे. जर राज्यांनी याचा पुरेसा फायदा घेऊन संधी उपलब्ध करून दिल्या तर चीनमधील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या इथे नक्कीच येतील. किंबहुना योगीजींनी त्यासाठी तयारी याआधीच सुरु केली आहे. त्यांनी तर घोषणाच केली आहे कि मी माझ्या राज्यात ५० लाख नवीन रोजगार निर्माण करिन आणि आजपर्यंत जे कामगार इतर राज्यात जाऊन पोट भरत होते, त्यांना यापुढे इतर राज्यात जावंच लागणार नाही. पण हे कसं शक्य होईल. एकच मार्ग. इतर देशांमधील विशेषतः चीनमधून बाहेर पडणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या राज्यात आणून. याला खरा नेता म्हणतात. 

  
यात आपणही आपला हातभार लावू शकतो. फक्त भारतातच तयार झालेल्या वस्तू खरेदी करून. कारण तरच इथली निर्मीतीव्यवस्था, रोजगारव्यवस्था , वितरणव्यवस्था आणि त्यायोगे अर्थव्यवस्था सुधारेल. इथे बहुराष्ट्रीय कंपन्या येऊन, इथेच उद्योगव्यवस्था स्थापित करतील. 

म्हणून नवीन मंत्र  "आत्मनिर्भर भारत"

प्रसन्न आठवले. 
१५/०५/२०२०











































Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...