Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९३ (कृष्णरुक्मिणीमय द्वारका)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९३(कृष्ण रुक्मिणीमय द्वारका)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
आता वरात नगरात शिरण्याचा अवकाश होता. नगरद्वारी वरात पोचली. मंडळींना थांबवून कृष्णरुक्मिणीसह संपूर्ण वरातीची दृष्ट काढून ती वेशीबाहेर उलट दिशेने उतरवून टाकण्यात आली. 

राजस रुपडं हरीचं
पाहुनी नजर हटेना
जनजन पाहती ऐसें
पापणी डोळा लागेना

कुणी उंच माडी चढले
कुणी फांदी फांदी गेले
पोरसोर खादी बैसले
ढकलती लक्ष्मी पाहण्या

उचलली टाच हो कुणी
हरीरुक्मिणी नजर भरुनी
खांदा उचलली कुणी पत्नी
लाज टाकली हरी देखण्या

गुणिजन नगरवासी सारे
पुष्पे पुष्पहार कुंकू अक्षता
फेकती पाहुनी हरी माथा
अक्षता हर्षे नीजपुण्या

वरात फिरे द्वारकानगरी
मुख्यमार्ग फिरले किती
मूळमाधवापासून वराती
थकले न पदी नाचण्या

भान न राहिले माहुता
फिरे त्याच त्या मार्गा
हास्यविनोदे जन हर्ष
गगनी तुडुंबही मावेना

पोचली द्वारप्रासादी
हरी लक्ष्मी अंबारी 
उतरले जोडीने खाली
देवकी येई औक्षणा

उतरून लिंबलोणा
अर्पिली काष्ठाग्नीला
जळे लोण धडधडा 
अग्निही होय संतोषा

औक्षण करुनी रोखे
मार्ग उभयता शंके
काय हवे तुज सांगे
देईन सुभद्रे वचना

मागणे एकच रे बंधू
जी होई पहिली कन्या 
होईल तिचा संबंधु हा
जोडणे मम पुत्रासी

हरी वचन देता मग
निश्चीन्त होय ठाक
येई ओलांडून माप
आधी घ्यावे नावा

अश्यातऱ्हेने वरात येऊन लिंबलोण उतरून दोघे प्रसादाच्या प्रवेशद्वारावर उभे आहेत. आता सर्व प्रतीक्षा करत आहेत रुक्मिणीने नाव घेण्याची. नाजूक, सुंदर, रूपवान गौरवर्णी रुक्मिणी निळ्यासावळ्या हरिसमीप अत्यंत शोभून दिसत होती. रुक्मिणीने उखाणा घ्यायला सुरुवात केली. 

रूप साजिरे अत्यंत देखणे
वर्ण निळासावळाही शोभे
वरले धैर्याने मी कृष्णपदास 
प्रवेशते आज द्वारकाप्रसादात

सर्वांनी रुक्मिणीदेवीच्या नावाचा जयजयकार करत मोठ्या उत्कंठतेने कृष्णाकडे पाहिले. कृष्णाने प्रश्नार्थक नजरेने सुभद्रे कडे पाहिले. अर्थातच तिनेही आग्रह करताच हरिचा निरुपाय झाला. कृष्णानेही मग रुक्मिणीकडे एक प्रेमकटाक्ष टाकत उखाणा घेतला.

आले पत्र माझे द्वाराला
प्रेमाचा घेऊन सांगावा
रुक्मिणी सदा ममहृदयात 
प्रवेशतो उभय प्रासादात

सर्वांनी हर्षोल्हासात दोघांचाही जयजयकार केला आणि कृष्णासह देवी रुक्मिणी यांनी राजप्रासादात प्रवेश केला. संपूर्ण प्रासाद प्रत्यक्ष लक्ष्मीच्या प्रवेशाने मोहरून गेला. प्रत्येक वस्तूमात्र एकमेकांना शुभेच्छा देऊन सांगत होते, कृष्णाची सहचारी, अर्धांगी स्वये लक्ष्मी प्रासादी प्रवेशली. सर्व जनांसह प्रासादही भारलेला होता. 

सर्व आगत स्वागत झाल्या नंतर माता देवकी, रेवतीदेवी सह पाच सुवासिनींनी रुक्मिणीची ओटी भरून तिला शुभाशीर्वाद दिले. माता देवकीने तिला आश्वस्त केले की, तिला तिच्या मातेची आठवण कधीही येऊ देणार नाही. अर्थातच रुक्मिणी या अश्वासनाने अत्यंत हर्षित झाली. रेवतीदेवीनी तिला भगिनीसम माया करण्याचं वचन दिलं व सर्व प्रसंगात मन मोकळं करण्याचं वचन घेतलं. 

ज्येष्ठ  बंधू आणि रुक्मिणीचे दिर श्रीबलराम यांनी कृष्णा बाबतच्या कोणत्याही तक्रारीचं निवारण करण्याचं आश्वासन दिलं. वर हेदेखील सांगितलं की या जगात त्याचा कान धरण्याचा अधिकार आणि क्षमता फक्त माझ्यात आहे. त्यामुळे कृष्णाने काहीही त्रास दिलाच तर मी आहे तुला ज्येष्ठ भावासम. अर्थातच या वाक्याने रुक्मिणी घरच्या आठवाने गहिवरली. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०७/०३/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...