Skip to main content

सुभद्राहरण ५

सुभद्राहरण ५

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

अर्जुनाने युधिष्ठिराचं म्हणणं स्वीकारून प्रस्थानाची तयारी केली. माता कुंती , द्रौपदी सह चारही बंधू अत्यंत दुःखव्याप्त आहेत. साहजिक आहे सर्वांचा प्रिय धनंजय अर्थात अर्जुन एक तप अर्थात बारा वर्षांसाठी वनवासात निघाला आहे. मोठया जड व व्यथित अंतःकरणाने सर्वांचा निरोप घेऊन अर्जुन आपल्यासह काही दळभार (सैन्य) व तीर्थाटनासाठी निघालेले यात्री, भगवतभक्त, वानप्रस्थाश्रमी, पुराण वेद पठण कीर्तन करणारे,  साधू, संन्यासी, ऋषी व विप्र यांना घेऊन इंद्रप्रस्थातून प्रस्थान ठेवतो.

इंद्रप्रस्थाहून गंगा किनाऱ्याच्या मार्गाने निघालेला अर्जुन अनेक तिर्थक्षेत्रांचं दर्शन घेत , मार्गातील अनेक ग्रामातील देवालयांना दानधर्म करत करत गंगाकिनारी गंगाद्वार अर्थात हरिद्वारला पोहोचला. अर्जुनासमवेत आलेल्या सर्वांना त्याने आपण इथे आज विश्राम करणार आहोत हे सांगून सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली. अर्जुनाच्या आज्ञानुसार सर्वांनी तिथे राहण्यासाठी आपापली गाठोडी व सामान उतरवून त्यांच्या नियोजित राहुटी मध्ये प्रवेश केला.

ब्राम्हमुहूर्ती , त्यांच्या मध्ये असलेल्या साधू , ऋषींवर व विप्रानी अग्निहोत्रासाठी आपापला अग्नी प्रज्वलित केला. संपूर्ण गंगाकिनाऱ्यावर त्या अग्निहोत्राच्या अग्नीच्या पुष्पांची जणू माला गुंफून गंगेला अग्निपुष्पांची माला प्रातःप्रहरी कोणी अर्पण केली आहे असाच भास होत होता. सर्व सहभागी जनांचं स्नानसंध्या, अग्निहोत्रासह पूजाअर्चा विधिपूर्वक संपन्न झालं याची विचारपूस करून मग स्वतः स्नानकरण्यासाठी गंगेत प्रवेश करता झाला. 

गंगेत स्नानस्तोत्रादी पठण करण्यात अर्जुन  व्यग्र होता. स्नानांतर अग्निहोत्र करण्याच्या विचारात असलेल्या महापराक्रमी अर्जुनाला तिथे जलप्रवाहात क्रीडा करत असलेल्या  एका रूपवान  नागकन्येने पाहिले.  त्याला पाहताच तीच मन त्यांच्याप्रती आकृष्ट झालं.

म्हणून तिने जलातूनच अर्जुनाला आपल्यासोबत नागराजाच्या अतिसुंदर भवनात नेले. त्या नागराजाच्या प्रसादात अग्नी प्रज्वलित होता. अर्जुनाने अग्नि पाहून होमकुंड तयार करून अग्निहोत्र करून घेतले. आपला पूजाविधी पार पडल्यानंतर अर्जुनाची नजर त्या सुस्वरूप नागकन्येकडे गेली. तिला पाहून नमस्कार करत अर्जुन म्हणाला

" हे युवती, तू इतकं मोठं साहस का केलंस. हे भाविनी, तू कोण आहेस, हे सुंदर भवन कोणाचं आहे !."

ती सुंदर युवती नम्रतेने हात जोडून म्हणाली

" हे राजन, ऐरावत नावाच्या नागराजाच्या कुळात, कौरव्य नामक नागदेव जन्माला आले. त्या नागराज कौरव्य यांची कन्या आहे मी. माझं नाव उलुपी. तुम्हाला गंगेत प्रातः स्नान करताना पाहिलं.   तुमचं  राजस्वरूप तेज आणि मदनसुद्धा शिष्यत्व पत्करेल अस आपलं रूप पाहून मी माझं हे मन, जे मी कधीच कुणालाही आजपर्यंत हरले नव्हते ते, तुम्हाला हरवून बसले आहे. आपण मला आपलं करून माझं सर्वस्व स्वीकारावं, जे मी फक्त आपल्याला देऊ इच्छिते." 

उलुपीचं बोलणं ऐकून अर्जुन नम्रपणे म्हणाला

" हे सौन्दर्यवती , मी धर्मराज युधिष्ठिर यांचा अनुज, बारा वर्षे ब्रम्हाचर्य पालनासाठी निघालो आहे. त्यामुळे तुझ्या या विनंतीचा मी स्वीकार करू शकत नाही. परंतु हे सौन्दर्यावती, माझ्या धर्माची हानी न होता तुझ्या इच्छेचा सन्मान करता येईल असा काही उपाय असेल तर सांग. कारण तुला असंतुष्ट करून मी जाऊ इच्छित नाही." 

नागकन्या त्याला म्हणाली

क्रमशः 

भाग ५ समाप्त 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
ll शुभम भवतू ll 
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...