Skip to main content

देवभूमी

आज या संकटात अनेक हातानी ईश्वरच सहाय्य करतो आहे. ही नक्कीच दैवभूमी आहे. म्हणूनच प्रत्येक संकटात पुण्यवान माणसांच्या जाणिवा जागृत ठेवून त्यांच्या करवी सहाय्य करवून घेऊन ईश्वर या भूमीला संकटातून सहजी बाहेर काढतो. आजसुद्धा या संकटातून वैद्यकीय सेवा देणारे, सुरक्षा सेवा देणारे, अत्यावश्यक सेवा देणारे, सरकारी अधिकारी जे घरी न बसता अहोरात्र आपल्यासाठीच झटत आहेत, त्या सर्व सेवार्थीच्या माध्यमातून स्वतः ईश्वरच या भूमीवर अवतरला आहे., अशी माझी धारणा आहे. त्यांच्या मनोबलाला आपण द्विगुणित करूया. 

काही अपवाद वगळता बहुतांशी जनसामान्य घरीच राहून त्यांना व सरकारला सहकार्यच करत आहेत. त्या सर्वांना ईश्वररूप मानून खालील ओळी लिहिल्या आहेत. ईश्वर हा वेगळा सहाय्य करत नाही तर मानवरूपातील त्याच्या अंशातूनच तो मानवाला सहाय्य करतो. म्हणूनच त्या मानवरूपातील सर्व सेवार्थी ईश्वरअंशाला ही शब्दरूप पुष्पमाला सादर. 

अनंताची शक्ती पाठीशी
अनंत भजती ईश्वराला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला

निष्काळजी न आम्ही कधी
भक्ती करतो विधात्याची
कुणी म्हणती स्वामी त्यांना
महाराज म्हणती त्या स्वरूपाला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला

काळजी करी तो भक्तांची
भक्तीपुढे नमितो अनंतरश्मी
चिंता न करणे धर्म अमुचा
कृपावंत राखतो सर्वांना
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला

कोटी कोटी अणूरूप आत्मन
करिती नित्य ज्याला नमन
तो परमात्मा जाणतो काळाला
रक्षणासाठी विनवू तयाला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला

अच्युतम केशवम नारायणाय
भजन नित्य करा मनात
जन जन तळमळे जगण्याला
पोहोचते साद ईशहृदयाला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला

जाणिवेच्या पार जो आहे
सार्थ त्याची कृपादृष्टी आहे
कोटी कोटी स्मरती ज्याला
तोचि राखेल या भूमीला
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला

अनेक रूपे करी साहाय्य
सेवाव्रती राबती लाख नित्य
संकट भिते त्या मानवाला
पाठी ज्याच्या हात ईश्वराचा
अनंतरुपे पाहतो ज्याला
तोचि राखतो कृपे आम्हाला

©® कवी : प्रसन्न आठवले
३१/०३/२०२०
०९:०२

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...