Skip to main content

सुभद्राहरण २

सुभद्राहरण २

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll 

पाचही बंधू, कृष्णा अर्थात कृष्णाची मानस भगिनी द्रौपदी आणि कृष्णाची आत्या अर्थात माता कुंती यांनी अत्यंत जड अंतःकरणाने त्याला प्रस्थानाची अनुमती दिली. 

युधिष्ठिर वदला

" हे कृष्णा नरोत्तमा, अजून काही काळ आमच्यासह व्यतीत केला असतास तर अतिउत्तम झाले असते. तुझ्या मात्र असण्यानेदेखील क्लेशकारक व दुःखदायक घटनांचा थांगपत्ता देखील मनाला लागत नाही. देह सुखेनैव त्या काळात यातना भोगत असतो. परंतु मन त्याचे क्लेश आत्म्याप्रत पोहोचू देत नाही." 

कुंती धर्माच्या बोलण्याला दुजोरा देत त्वरित वदली. 

" हे पुत्र युधिष्ठिर योग्यच वदला. मला तर या दुःखदायक काळात कृष्ण सोबत असल्याचा विशेष लाभ व आनंद होतो. म्हणूनच माझीही इच्छा होती की, कृष्णा तू काही काळ अजून थांबलास तर मनाला तितकाच संतोष लाभेल." 

कुंतीचे कथन अर्धे थांबवून कृष्ण वदला

" हे पाच वीरांची माता , कुंती आत्या , मोह हा माणसाच्या अनेक रिपुंपैकी एक आहे. जे मोहक मनभावन आहे ते अधिक काळ समीप असावे असे वाटत राहते. परंतु हा मोह अवरावा व मला अनुमती दे. कारण मला येथे येऊन खूप काळ लोटला आहे, बहुत करून दोन वर्षांचा काळ सहज गेला असावा. माझी द्वारका माता पिता आणि दादा वाहिनी सह रुक्मिणी निश्चितच चिंतातुर असतील. त्यांना आपली खुशाली कळवावी लागेल, इकडील सर्व वृत्तांत कथन करावा लागेल. तद्वत प्रस्थानाची अनुमती दे. प्रस्थान ठेवण्याआधी मला पाचही भावांशी काही महत्वाचं बोलायचं आहे. "

अस म्हणून कृष्ण माता कुंतीच्या चरणांना स्पर्श करून प्रणाम करतो. माता सद्गतीत अंतःकरणाने आणि भिजलेल्या लोचनांनी अनुमती देते. माता कुंती आणि द्रौपदी निघून गेल्यावर कृष्ण पाचही बंधूना सांगतो.

" हे धर्मासह पाचही बंधूनो मी इथून गेल्यावर देवर्षी नारद येतील. ते जे काही सांगतील, ते तुमच्या हिताचंच असल्यामुळे, लक्षपूर्वक ऐकून त्याची योग्य ती अंमलबजावणी करा. मी येतो.'

कृष्ण आपला विश्वासू  सारथी दारूक यास रथ सुरू करण्याची आज्ञा देतो. कृष्णाचा रथ धुरळा उडवत मार्गक्रमण करतो. कृष्णाच्या मार्गाकडे बराच काळ पाचही बंधू एकाग्र चित्ते बघत उभे आहे. इतक्यात आवाज येतो.

"नारायण नारायण. जगत्पिता श्रीविष्णूके अवतारी पुरुष, नरश्रेष्ठ श्रीकृष्ण याचे आतेभाऊ असलेले पांडुपुत्र आणि इंद्रप्रस्थ नरेश श्रीधर्मराज यांसह पाचही बंधूना माझा प्रणाम. "

धर्मराज युधिष्ठीर पुढे होऊन मुनीराजांना चरणस्पर्श करून प्रणाम करतो. अर्थातच युधिष्ठिराचं अनुकरण बाकीचे बंधू करतात. धर्मराज विनम्रतेने हात जोडून मुनीराजांना आसनस्थ होण्याची विनंती करून विचारतो.

"देवर्षी काय कारणे आपण तसदी घेतलीत. काही विशेष कार्य असल्याशिवाय आपण येणार नाही."

आसनस्थ होत वदतात

"हे पांडुपुत्रांनो , तुम्ही द्रौपदी या एकाच नारीशी विवाह केला असल्यामुळे तुमच्याशी  त्याबाबत विशेष परामर्श करण्यास आलो आहे. कारण एका स्त्री पायी तुम्हास काही वितुष्ट यायला नको जसं हजारो वर्षांपूर्वी सत्ययुगात
सुंद आणि उपसुंद या दोन राक्षस बंधूंमध्ये आलं होतं.  ज्यायोगे दोघे आपला जीव विनाकारण गमावून बसले. "

धनंजय अर्थात अर्जुन मुनीश्वरांना म्हणतो

"हे देवर्षी कृपा करून आम्हाला ती कथा विस्ताराने ऐकण्याची इच्छा आहे. आपण ती आम्हाला सांगितलीत तर असीम कृपा होईल. "

देवर्षी नारद किंचित स्मित करत कथा सांगायला सुरवात करतात.

" हजारो वर्षांपूर्वी अर्थात सत्ययुगात हिरण्यकश्यपूचा पुत्र निकुंभ याला सुंद आणि उपसुंद नामक दोन पुत्र होते. दोन्ही असुर पुत्र अत्यंत पराक्रमी होते. संपूर्ण जगतावर आपलं राज्य असावं आणि आपल्याला मृत्यू येऊ नये या कारणे त्यांनी उग्र तपसाधना केली. ज्या योगे त्यांना श्रीब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर मागायला सांगितला."

क्रमशः 

भाग २ समाप्त 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
ll शुभम भवतू ll 
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll



Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...