Skip to main content

सुभद्राहरण ९

सुभद्राहरण ९

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

आमच्या चर्येवरील भाव आणि अंतःकरणातील पश्चाताप जाणून देवर्षी म्हणाले. दक्षिण समुद्र किनाऱ्यावर पाच रमणीय तीर्थे आहेत. तुम्ही विनाविलंब  तेथे प्रस्थान करा. तिथे विश्वातील सर्वश्रेष्ठ पुरुष धनंजय अर्थात पांडुपुत्र अर्जुन लवकरच येईल आणि तुमची सुटका करेल. त्यांचे बोल ऐकून आम्ही शीघ्र गतीने या तीर्थात आलो. हे अनघ, या बाकीच्या चार तीर्थात माझ्या चारही सख्या आहेत. मी तुम्हाला हात जोडून नम्रतेने विनंती करते की आपण त्वरित त्यांचीसुद्धा या शापातून मुक्तता करावी." 

पांडुपुत्र अर्जुनाने वर्गाच्या विनंतीवरून त्या चारही ग्राह रूपातील अप्सरांना जलाबाहेर काढून त्यांना शापमुक्त केलं. बाहेर आल्याबरोबर  त्या पुनः आपलं आधीचं रूप प्राप्त कर्त्या झाल्या. अर्जुनाचे चरणस्पर्श करून त्या पाचही अप्सरांनी अर्जुनाचे आभार मानून पुनः नंदनवनात प्रस्थान करण्याची अनुमती घेतली. अर्जुन त्यांना अनुमती देऊन. त्या पाचही तीर्थात स्नानसंध्या करून पुनः मणिपूरला चित्रांगदेकडे परत आला.

अर्जुन गेल्यानंतर अर्थातच त्याच्यापासून चित्रांगदेला झालेल्या अर्जुन पुत्राचं नाम बभ्रूवाहन अस ठेवण्यात आलं होतं. अर्जुनाने काही काळ तेथे व्यतीत केला. काही काळानंतर अर्जुन राजा चित्रवाहन यांच्याकडे प्रस्थानाची अनुमती मागण्यासाठी आला आणि राजाला म्हणाला

" हे राजन,  माझ्या इप्सित हेतू व वचनानुसार मला आता प्रस्थान करणे जरुरीचे आहे. आपल्यात आधी ठरल्याप्रमाणे माझी धर्मपत्नी चित्रांगदा आपल्याकडे राहील व त्याचे शुल्कस्वरूप मी,  माझा पुत्र बभ्रूवाहन याला आपल्या  सुपूर्त करत आहे. आपण त्याचा स्वीकार , सांभाळ आणि योग्य तो राजव्यवहार करावा. माझ्या प्रायश्चित्त समाप्ती नन्तर ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिर हे राजसूय यज्ञ करतील. त्यासमयी आपणास विधिवत आमंत्रण येईलच. त्यावेळी आपण येताना माझी पत्नी चित्रांगदा आणि पुत्र बभ्रूवाहन यांनाही  घेऊन यावं अशी मी आपल्याला विनंती करतो "  

राजाने मोठ्या जड अंतःकरणाने धनंजयाला अनुमती दिली. ततपाश्चात अर्जुन चित्रांगदेला घेऊन तिच्या महालात आला. चित्रांगदेचा कंठ दाटून आला होता. अर्जुनाने तिला समीप घेतलं आणि तिला म्हणाला.

" हे अतिसुंदर चित्रांगदे, तुझी मनःस्थिती मी जाणतो परंतु मी आता प्रस्थान ठेवतो. कारण मी वचनबद्ध आहे. त्यामुळे या बारा  वर्षात मी जास्त काळ एके ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून मला निघणे अनिवार्य आहे. मला ज्ञात आहे आणि राहील की , तू येथे एकटी आहेस. परंतु आपला पुत्र बभ्रूवाहन याच्या पालनपोषणाची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि ती तू व्यवस्थित पार पाडशील हा मला विश्वास आहे. 

माझ्या प्रायश्चित्त समाप्ती नन्तर ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार आहेत. त्यासमयी महाराज चित्रवाहन यांनाही विशेष आमंत्रण असेल. त्यांना मी विनंती केली आहे की, त्या समयी येताना ते माझी पत्नी अर्थात तू व आपला पुत्र बभ्रूवाहन याला सोबत घेऊन येतील. त्यावेळी तू इंद्रप्रस्थात आल्यावर माझी माता कुंती,  ज्येष्ठ भ्राता महाराज युधिष्ठिर , भीम आणि अनुज नकुल व सहदेव यांचा व इतर बंधु बांधवांचा परिचय करून देईन. " 

चित्रांगदेच्या गालावर ओघळलेले अश्रू पुसत अर्जुन पुढे बोलणार इतक्यात, स्फुंदत, आपले शिश अर्जुनाच्या स्कंधावर ठेवत  आणि अतिव्याकुळ स्वरात चित्रांगदा म्हणाली. 

क्रमशः

भाग ९ समाप्त 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
ll शुभम भवतू ll 
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...