जीवन सुगंध - ३
सरळ घडणारी कोणतीही गोष्ट नेमकी आपल्याच बाबतीत वाकडी का घडते हा प्रश्न पडलाय ना. आणि इतरांच्या बाबतीत सरळ कस घडत हे कोड पण पड़ल असेल तर त्याच उत्तर ऐक . त्याच खर तर खूप सोप्प उत्तर आहे की ते आधीच मायेच्या अधीन असतात प्रश्न असतो तो तुमच्या आधीन होण्याचा. त्यासाठी तुमचा बुद्धिभेद करण्याचा हां प्रयत्न असतो. ते ज्याना आपण याबाबतीत आदर्श मानतो त्यांची निर्मितीच यासाठी झालेली असते . त्याना आपसूक मिळणाऱ्या गोष्टी आणि आपल्याला न मिळालेल्या किंवा मिळून सुद्धा आपण आपल्या चूकीशिवाय गमावलेल्या गोष्टी या सर्वाची निर्मितीच मुळात आपल्याला मूळ स्वरूपाला म्हणजेच मगाशी सांगितलेल्या वाटेच्या दुसऱ्या टोकाकडे तुम्हाला जाऊ न देण्याचा मायेचा खटाटोप. बर यात तीच यशस्वी होण न होण हे तस बघितल तर आहे आपल्याच हातात. कारण विधात्याने सर्व घडवलय वा ठरवलय ते कर्माधिष्टित. म्हणजे एका अर्थाने तुझ्याच हातात. पण…… हा पणच खुप महत्वचा ठरतो आयुष्य घडवायला . पुन्हा घडल की बिघडल याची परिमाण जी जगाची वेगळी आणि नियंत्याची वेगळी. यात चूक कोण बरोबर कोण हे सुद्धा प्रत्येक जण आपल्या परीने वेगळ ठरवतो. पण खर काय ते फक्त त्यालाच ठाऊक.
प्रेरणा : श्री महाराज
Comments
Post a Comment