Skip to main content

कवडसा - 23



कवडसा 

(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , 
 
तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  

कहाणी एका संघर्षाची सुरु …२२


शीतल : तुला मला या प्रकारे भेटावस का वाटल ( हसून ) का असा stunt करण्याची सवय आहे तुला. 
योगेन्द्र : (शांत पणे हसत ) मला असे सुखद वाटणारे धक्के i mean pleasant surprises द्यायला आवडत. in fact its my way of presenting things . 
शीतल : वा म्हणजे स्वतःच्या मर्जीने घडवलास की काय accident,  मला भेटण्यासाठी ( हसते)
योगेन्द्र : मी देवाला इतकंच सांगितल की मला शीतल समर यांना भेटायचय तेहि hospital मधे . Thats all i did . पुढच त्याने arrange केल . 
शीतल : देवा वर विश्वास दिसतोय तुझा.   देव भोळा वगैरे नाहीस ना. 
योगेन्द्र : नाही देवभोळा निश्चित नाही या जगात कर्म श्रेष्ठ मानतो मी. देव आणि दैव हे कर्माच्याच गती वर अवलंबून असत ही माझी धारणा आहे. sorry पहिल्याच दिवशी lecture थोड़ जास्त झाल. 
शीतल : अरे नाही पण खुप छान बोलतोस तू . अस जाणवतय की,  तुला या विषयाचीआवड अणि या विषयाचा तुझा अभ्यास असावा. (शीतल thumsup position करते आणि म्हणते) It was very nice  to meet you i think we can be good friends. 
योगेन्द्र : (तसाच response देत) certanly same here. आणि इथे आहोत तो पर्यन्त काकांमुळे भेट होइलच.
शीतल : काका ?  (योगेन्द्र आणि डॉ दोघेही हसतात) 
योगेंद्र : हो अग इथे आल्यावर आमच बोलण झाल्यावर कळल की डॉ.  साठे म्हणजेच माझ्या सख्या मावशीचे मिस्टर. पण काही कारणामुळे लांब होतो तो या निमित्ताने जवळ आलो. आणि याच पूर्ण क्रेडीट फक्त आणि फक्त तुलाच जात. 
शीतल : मी. माझा कसा काय सम्बन्ध. 
योगेंद्र : म्हणजे …. (तेवढ्यात डॉ  मधे बोलतात) 
डॉ . : जर तुझा accident  झाला नसता तर तू इथे आलीच नसतीस आणि तुला भेटायला हा आला नसता म्हणून. आणि त्याच साठी तुमची अशी भेट घडवून आणली. नाहीतर मला कूठल कळायला की तुम्ही ओळखता.  तुझ्या मूळे  आमची भेट झाली. 
शीतल : अच्छा , आता कळल की , इतक सगळ होण्यासाठी माझा एक छोटासा आणि योगेंद्रचा मोठा accident झाला. 
शीतलच्या या बोलण्यावर तिघेही मनमुराद हसतात. 

क्रमशः 











Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...