जीवन सुगंध - १
माणूस एक प्रवास आहे अनंतापासून अनंतापर्यंत. कुठून आला कुठे चाललाय हे कधीच न समाजणार कोड अखंड उरात बाळगून या प्रवासातला एक प्रवासी . हां प्रवास असाच किती काळ चालेल ते नियंत्यालाच माहित. बर तो कुणाला कळलाय तर तेही एक कोडच. या कोडयाच उत्तर सापडत त्याना जे हे सांगण्यासाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे जे माहीत नाही ते कल्पनेनेच जाणलय त्यांनी, ज्यानी हे पाहिलय हां त्यांचा विश्वास की खात्री की श्रद्धा की भ्रम हे ते स्वतः जाणतात की नाही हे कोणालाच माहीत नाही . बर आपल्या कुणाला हे बोलण्याचा अधिकार आहे की नाही ते पण कोणालाच माहित नाही
मी हे बोलतोय हे सुद्धा अधिकार नसतानाच. पण मग नक्की काय खर ते कोणी तरी कधी तरी सांगाव आणि कधीतरी आपल्याला कळाव अस वाटणारे किती हे पण ठाऊक नाही.
बर श्रद्धा खरी की तोही एक भ्रमच भुताच्या गोष्टीसारखा माहीत नाही कारण जर ती कल्पना तर देव ही कल्पना का नसेल. सर्व तर्कशास्त्राचा खेळ की अजून काही हे पण त्या नियंत्यालाच माहीत अर्थात जर तो कुठे असेल तर. कारण त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्याला कोणी पहाव ओळखाव हे पुन्हा त्यांच्या मर्जीवर म्हणजे पुन्हा खेळ शब्दांचा तर्काचा श्रद्धेचा.
प्रेरणा : श्री महाराज
Comments
Post a Comment