Skip to main content

जीवन सुगंध - ४



जीवन सुगंध - ४


आता या मायेचा विचार करुया. ही माया एका अर्थी भगवंत निर्मित म्हणजे विश्वाचा आधार, पण दुसऱ्या अर्थी वाटेच दूसर टोक, म्हणजे निश्चितच विचार करायला लावणारी गोष्ट किंवा बाब. पण ती संपूर्ण विश्वाला सुद्धा वाटेच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच भगवंताच्या विरुद्ध बाजूला अर्थातच इश्वरापासून लांब घेऊन जाते. इतकी प्रचंड ताकद तिच्यापाशी  कशी. त्यासाठी तिच्या निर्मितीचा विचार करू . मुळातच हे विश्व भगवंताला  झालेल्या मोहातून निर्माण झाल. त्यामुळे हाच मोह माया रुपात पूर्ण विश्वात संचारला. हीच ती माया. आता तर्काने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जेंव्हा हां मोहच जर निर्मितीच कारण आहे तर हे विश्व सुरळीत चालू राहाव यासाठी ही गरजेचीच आहे हे पटत.  पण त्यात ही मेख पण आहे की जर तुम्हाला या विश्वाच्या पसाऱ्यातच अडकायच असेल तर कोणाची ना नाही.  मग या मायेचा तुम्ही विचार केला नाहीत तरी चालेल.  कारण प्रत्येक जण प्रत्येक क्षणी त्या मायेच्या आधीन आहे आणि जातोच आहे. ही माया म्हणजेच जिला भगवंताची सावली असही म्हटल जात.  तर तर्काने हेही  जाणू शकता की सावली म्हणजे काळी आणि काळी म्हणजेच याचा परिणाम हां अंततः दुःखदच असेल. कस ते पुढे पाहूच. 

प्रेरणा : श्री महाराज

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...