जीवन सुगंध - ४
आता या मायेचा विचार करुया. ही माया एका अर्थी भगवंत निर्मित म्हणजे विश्वाचा आधार, पण दुसऱ्या अर्थी वाटेच दूसर टोक, म्हणजे निश्चितच विचार करायला लावणारी गोष्ट किंवा बाब. पण ती संपूर्ण विश्वाला सुद्धा वाटेच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच भगवंताच्या विरुद्ध बाजूला अर्थातच इश्वरापासून लांब घेऊन जाते. इतकी प्रचंड ताकद तिच्यापाशी कशी. त्यासाठी तिच्या निर्मितीचा विचार करू . मुळातच हे विश्व भगवंताला झालेल्या मोहातून निर्माण झाल. त्यामुळे हाच मोह माया रुपात पूर्ण विश्वात संचारला. हीच ती माया. आता तर्काने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जेंव्हा हां मोहच जर निर्मितीच कारण आहे तर हे विश्व सुरळीत चालू राहाव यासाठी ही गरजेचीच आहे हे पटत. पण त्यात ही मेख पण आहे की जर तुम्हाला या विश्वाच्या पसाऱ्यातच अडकायच असेल तर कोणाची ना नाही. मग या मायेचा तुम्ही विचार केला नाहीत तरी चालेल. कारण प्रत्येक जण प्रत्येक क्षणी त्या मायेच्या आधीन आहे आणि जातोच आहे. ही माया म्हणजेच जिला भगवंताची सावली असही म्हटल जात. तर तर्काने हेही जाणू शकता की सावली म्हणजे काळी आणि काळी म्हणजेच याचा परिणाम हां अंततः दुःखदच असेल. कस ते पुढे पाहूच.
प्रेरणा : श्री महाराज
Comments
Post a Comment