जीवन सुगंध - २
आणि हां प्रवास तरी कसा, किती, कुठे, कोणाबरोबर, किती, वाटेत कोण भेटणार, ते किती काळ बरोबर हे पण माहित नाही. बर एक प्रकारे माहित नाही हे छान आहे. कारण त्यामुळे जगण्याला एक अर्थ आहे आणि पुढे जगण्याची जिद्द कायम आहे. पण त्याची दूसरी बाजू ही की जेंव्हा निराशा दुःख अपमान या गोष्टी समोर येतात, तेंव्हा अस वाटत की हे आधीच कळल असत तर कष्टतरी वाचले असते.
पण मग या सगळ्यात जगण्याचा निश्चीत अर्थ काय, मार्ग कोणता, वाटचाल कशी करावी, या सर्व बाजूंचा थोड़ा स्वार्थी होऊन विचार करावा हे एक उत्तर सापड़तय. स्वार्थ कसा सांगतो.
त्या आधी या विश्वाच एक कोड खरच कोड आहे की एक सहज अनूभवाव अस काही आहे हे आपण पाहुया.
ही एक लेखमाला असेल अस म्हटल तर वावग ठरू नये. या विश्वाच्या निर्मितीच एक कारण जे सांगितल जाते आणि पुराणात सुद्धा लिहिलेल वाचायला मिळत ते हे की, जगननियंत्याला एक सहज पडलेल स्वप्न आहे त्यामुळेच ते भास् आणि सत्य यामधला एक जोड रस्ता आहे. त्याच एक टोक म्हणजे माया आणि दूसर टोक म्हणजे स्वतः नियंता. आता कोण कूठून निघाला यावर तो कूठे पोचणार हे ठरत. बर ही माया भगवंत निर्मित असल्याने त्या टोकाला जाणाऱ्याला या टोकाला ओढते.
प्रेरणा : श्री महाराज
Comments
Post a Comment