Skip to main content

जीवन सुगंध -५



जीवन सुगंध -५


माया ही विश्वाची चालक असल्याचा आभास निर्माण करते पण प्रत्यक्ष परिस्थिति भिन्न असली पाहिजे कारण जो चालक असतो तो जनक नियंता आणि अन्तःकर्तासुद्धा असतो म्हणजेच निर्माता नियंता आणि उद्धारकर्ता देखील असतो . आता या निकषात माया बसते का ते पाहू. अस समजा की एक पाण्याच्या ओहोळामध्ये एक कीड़ा पडलाय. यात माया काय करेल ती त्या किड्याला झुलवेल  आणि नंतर त्याचा अंत काळ आला की सोडून जाईल दुसऱ्या लक्षा कड़े. आता याच जागी भगवंत काय करतील त्याला बचावाचे काही मार्ग उपस्थित करतील. पण तेहि त्याचे काही आयुष्य शिल्लक असेल. पण जर अंत समय निकट असेल तर त्याच्या पुण्याई नुसार काही अशी व्यवस्था करतील की ज्यामुळे त्याचा अन्तःकाळ सुकर होईल. आणि तो प्राणी मोक्षाला अथवा त्याच्या पूर्व कर्मा नुसार पुढील जन्मी सहज जाईल. पण हे सर्व तेंव्हाच शक्यआहे जेंव्हा त्या प्राण्याचा स्वतःचा कर्माचा साठा पुण्यरूपात शिल्लक असेल. असही कर्म प्राणी तेंव्हाच करेल जेंव्हा तो मायेच्या बंधनात न अडकता कर्म करेल. आता माया कशी काम करते ते पाहू. तुम्ही सरळ मार्गी गृहस्थ आहात अश्या वेळेला तुम्हाला विचलित करण्यासाठी तशी व्यवस्था निर्माण केली जाईल. 
प्रेरणा : श्री महाराज 
 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...