जीवन सुगंध -५
माया ही विश्वाची चालक असल्याचा आभास निर्माण करते पण प्रत्यक्ष परिस्थिति
भिन्न असली पाहिजे कारण जो चालक असतो तो जनक नियंता आणि अन्तःकर्तासुद्धा
असतो म्हणजेच निर्माता नियंता आणि उद्धारकर्ता देखील असतो . आता या निकषात
माया बसते का ते पाहू. अस समजा की एक पाण्याच्या ओहोळामध्ये एक कीड़ा
पडलाय. यात माया काय करेल ती त्या किड्याला झुलवेल आणि नंतर त्याचा अंत
काळ आला की सोडून जाईल दुसऱ्या लक्षा कड़े. आता याच जागी भगवंत काय करतील
त्याला बचावाचे काही मार्ग उपस्थित करतील. पण तेहि त्याचे काही आयुष्य
शिल्लक असेल. पण जर अंत समय निकट असेल तर त्याच्या पुण्याई नुसार काही अशी
व्यवस्था करतील की ज्यामुळे त्याचा अन्तःकाळ सुकर होईल. आणि तो प्राणी
मोक्षाला अथवा त्याच्या पूर्व कर्मा नुसार पुढील जन्मी सहज जाईल. पण हे
सर्व तेंव्हाच शक्यआहे जेंव्हा त्या प्राण्याचा स्वतःचा कर्माचा साठा
पुण्यरूपात शिल्लक असेल. असही कर्म प्राणी तेंव्हाच करेल जेंव्हा तो
मायेच्या बंधनात न अडकता कर्म करेल. आता माया कशी काम करते ते पाहू. तुम्ही
सरळ मार्गी गृहस्थ आहात अश्या वेळेला तुम्हाला विचलित करण्यासाठी तशी
व्यवस्था निर्माण केली जाईल.
प्रेरणा : श्री महाराज
Comments
Post a Comment